शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लोककल्याणकारी प्रकल्पांचे श्रेय एकट्या शिंदेंचं नाही, सर्वेक्षणातील निष्कर्षावर मुख्यमंत्र्यांची सारवासारव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:40 IST

डबल इंजिन सरकारने विकासाचे ब्रेक काढले, स्पीडब्रेकरचे अडथळे तोडले

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आम्हा दोघांना अव्वल स्थान मिळाले आहे. हे श्रेय एकट्या एकनाथ शिंदे यांचे नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आहे, अशी सारवासारव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना केली.‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी झाला. त्यानिमित्ताने तपोवन मैदानावर सभेचेही आयोजन करण्यात आले. सभेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यांच्या न येण्यामुळे सभेच्या ठिकाणी उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सभेत सारवासारव केली.मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही गेल्या अकरा महिन्यात अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. केंद्र सरकारचे सहकार्य त्यास मिळाले. या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळवून दिला. त्यामुळे नरेद्र मोदी व मला अव्वल स्थान मिळाले. परंतु हे श्रेय एकट्या शिंदे यांचे नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आहे. कारण या सर्वांनी वेगवान निर्णय घेतले. त्याची अमंलबजावणी करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे.भाजप-शिवसेनेचे राज्य होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीत राज्याला नंबर वन वर नेऊन ठेवले होते. परंतु ‘मविआ’ सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यातील विकासाला ब्रेक लागला. अनेक स्पीडब्रेकर निर्माण केले. त्यामुळे राज्यात परकीय गुंतवणूक थांबली. अन्य राज्ये पुढे गेली. पण आपले राज्य मागे पडले. परंतु आम्ही अकरा महिन्यात राज्यात एक लाख १४ हजार कोटींची परकीय गुंतवणूक आणून पुन्हा एकदा राज्याला नंबर वन वर नेऊन ठेवले आहे. डबल इंजिन सरकारने विकासाचे ब्रेक काढले, स्पीडब्रेकरचे अडथळे तोडले, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्या सरकारने सर्वसामान्यांच्या हितापेक्षा दुसरा कोणताही निर्णय घेतला नाही. मविआ सरकारने अडीच वर्षांत सिंचनाचा एकही प्रकल्प मंजूर केला नाही. मात्र आमच्या सरकारने अकरा महिन्यात सिंचनाचे २९ प्रकल्प मंजूर केले. त्यामुळे आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यावेळी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भाषणे झाली.विरोधी पक्षाच्या आमदारांची पाठ हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीच मुख्यत: सारे प्रयत्न केले परंतु भाजपचे नेते व कार्यकर्तेही सुरुवातीपासूनच त्याच्या नियोजनापासून बाजूला राहिले. त्यामुळे शासनाचाच हा कार्यक्रम शिंदे गटाचा असे त्याला स्वरूप आले. विरोधी पक्षांच्याही सर्वच आमदारांनी त्याकडे पाठ फिरवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे