शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

NCP: ‘संकल्प’ तडीस नेण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान, यात्रेत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या गाऱ्हाण्यांची सोडवणूक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 11:43 IST

परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील २८८ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मांडलेली गाऱ्हाण्यांची सोडवणूक होऊन पक्षाने अधिक मजबुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन केले तर ती यात्रेची फलश्रुती ठरेल.

राजाराम लोंढेकोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोल्हापुरातील विराट सभेने राज्यात नंबर वन होण्याचा संकल्प केला असला तरी तो तडीस नेण्याचे आव्हान पक्षासमोर निश्चितच आहे. परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील २८८ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मांडलेली गाऱ्हाण्यांची सोडवणूक होऊन पक्षाने अधिक मजबुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन केले तर ती यात्रेची फलश्रुती ठरेल.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी पक्षाचे ५६ आमदार निवडून आले होते, स्थापनेनंतर सलग पंधरा वर्षे सत्तेत राहिला. सत्तेच्या सुरुवातीच्या काळात पक्ष झपाट्याने वाढला, खेडोपाडी पक्षाची ताकद झाल्याने २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ७१ जागा जिंकत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. मात्र, सत्तेचे केंद्रीकरण काही ठरावीक गटापुरतेच मर्यादित राहिल्याने पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला जाऊ लागला. हे जरी खरे असले तरी आजही पक्षाचा कार्यकर्ता गावोगावी उभा आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही २०१४ ला पक्षाचे ४१ आमदार निवडून आले. आता पक्षाचे ५३ आमदार आहेत, अनपेक्षितपणे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.गेली अडीच वर्षे पक्ष सत्तेत आहे, मात्र या सत्तेची फळे नेत्यांपुरतीच सीमित राहिल्याची खदखद सामान्य कार्यकर्त्यात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद परिवार यात्रेच्या माध्यमातून २८८ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. या दरम्यान कार्यकर्त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली, अडचणी सांगितल्या. त्याची सोडवणूक करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत यश संपादन केले तरच या १४ हजार किलो मीटर परिवार संवाद यात्रेची फलश्रुती ठरेल. या निवडणुकांवरच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नंबर वन बनण्याचा पक्षाध्यक्षांनी केलेला संकल्प तडीस जाईल.

जयंतरावांची दूरदृष्टी पक्षाला बळ देणारी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांनी पक्षाला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सक्षम सेलची बांधणी केवळ राष्ट्रवादीकडे आहे. तरुण आक्रमक चेहरे त्यांनी तयार केले आहेत. बूथ कमिट्याची बांधणी करताना त्यांनी २०२९ व २०३४ च्या विधानसभेचे दृष्टी ठेवून कामाला सुरुवात केली आहे.आघाडी एकसंध राहिलीतर बंडखोरी अटळ

विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढविण्याच्या हालचाली सध्या तरी तिन्ही पक्षात दिसत आहेत. तिन्ही पक्षाचे सध्या १५३ विद्यमान आमदार आहेत, उर्वरित १३५ जागांचा तिढा सोडवावा लागेल. या जागा तिघांना समान दिल्यातर प्रत्येकाला आणखी ४५ जागा मिळू शकतात. शिवसेनेला १०१, राष्ट्रवादीला ९८ तर कॉंग्रेसला ८९ जागांवर लढावे लागेल. यातून नाराजीची संख्या अधिक होऊन बंडखोरी अटळ आहे. ती थोपवण्याचे आव्हानही आघाडीसमोर असेल.कोल्हापुरातून राजकीय दिशा

कोल्हापूर ही जशी शाहूंची पुरोगामी भूमी तशीच ती राष्ट्रवादीच्या स्थापनेची साक्षीदारही आहे. त्यामुळे आताच्या देशभर भेदरलेल्या वातावरणात देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला दिशा देण्यासाठी शरद पवार यांनी कोल्हापूरची निवड केली. २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची काय दिशा असेल याची पायाभरणी या संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने झाली. आता हीच दिशा घेऊन पुढील राजकीय वाटचाल होणार आहे, हे निश्चित आहे. फक्त आता याचे सारथ्य काेण करणार, महाविकास आघाडी एकसंघ राहणार, देशपातळीवर यूपीए बळकट होणार, हे येणारा काळच ठरवेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील