शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

साखर उद्योगासाठी गोड बातमी, केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 17:11 IST

केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती.

विश्वास पाटील

कोल्हापूर : केंद्र शासनाने उसाच्या रसापासून थेट तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात लिटरला २ रुपये १६ पैसे वाढ करण्याचा साखर उद्योगाच्या दृष्टीने चांगला निर्णय बुधवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दरास मंजुरी दिली. देशांतर्गत साखर उद्योगातील शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे बिल जास्तीत जास्त वेळेत मिळावे, यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे केंद्र शासनाने म्हटले आहे. या निर्णयाचे महाराष्ट्रातील सहकारी व खासगी साखर उद्योगानेही स्वागत केले आहे.

साखर उद्योग तीन पद्धतीने इथेनॉलचे उत्पादन घेतो. त्यामध्ये ज्या कारखान्यांचे मुख्य उत्पादन साखर आहे, असे कारखाने सी हेवी पद्धतीने इथेनॉल उत्पादन करतात. त्याचा लिटरचा दर ४६ रुपये ६६ पैसे होता त्यात २ रुपये ७५ पैसे वाढ करण्यात आली. बी हेवी पद्धतीने होणाऱ्या इथेनॉलचा दर ५९.०८ रुपये होता त्यात १.६५ पैसे वाढ करण्यात आली आणि साखरेच्या रसापासून थेट इथेनॉल केले जाते, त्यासाठी २ रुपये १६ पैसे वाढवण्यात आले. केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती.

रसापासून जिथे थेट इथेनॉल केले जाते त्याचा दर लिटरला किमान ७ रुपयांनी वाढवावा, असे साखर उद्योगाला वाटत होते. हा दर वाढला तर जास्तीत जास्त उसापासून इथेनॉल निर्मिती होईल व त्यामुळे देशांतर्गत बाजारात गरजेइतकीच साखर राहू शकेल. तो समतोल साधल्याशिवाय साखरेला दरही चांगला मिळणार नाही व त्याशिवाय उसालाही दर देता येणार नाही; परंतु केंद्र शासनाने तेवढा दर वाढवला नसला तरी केलेली दरवाढही चांगलीच आहे.

प्रकार   -  जुना दर  -   नवा दर  -  वाढ

सी हेवी  -  ४६.६६  -  ४९.४१   - २.७५

बी हेवी  -  ५९.०८  -  ६०.७३   - १.६५

सिरप    -  ६२.६५  -  ६५.६१    - २.१६

केंद्र शासनाने इथेनॉलचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे; परंतु उसाच्या सिरपपासून जिथे इथेनॉल केले जाते, त्याचा दर आता २ रुपये १६ पैसे वाढवला आहे. तो समाधानकारक नाही. त्यामध्ये किमान लिटरला ५ रुपये वाढ अपेक्षित होते. त्याशिवाय देशांतर्गत साखर बाजाराचा समतोल नियंत्रित होऊ शकणार नाही. - विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक कोल्हापूर.

महाराष्ट्रातील इथेनॉल उद्योग

  • इथेनॉल उत्पादनाची वार्षिक क्षमता : २६४ कोटी लिटर
  • सहकारी व खासगी प्रकल्प : ११२
  • सी हेवीपासून उत्पादन : ४६.६६ कोटी लिटर
  • बी हेवीपासून उत्पादन : ५९.०८ कोटी लिटर
  • सिरपपासून उत्पादन : ६३.४५ कोटी लिटर
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकार