शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

साखर उद्योगासाठी गोड बातमी, केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 17:11 IST

केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती.

विश्वास पाटील

कोल्हापूर : केंद्र शासनाने उसाच्या रसापासून थेट तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात लिटरला २ रुपये १६ पैसे वाढ करण्याचा साखर उद्योगाच्या दृष्टीने चांगला निर्णय बुधवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दरास मंजुरी दिली. देशांतर्गत साखर उद्योगातील शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे बिल जास्तीत जास्त वेळेत मिळावे, यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे केंद्र शासनाने म्हटले आहे. या निर्णयाचे महाराष्ट्रातील सहकारी व खासगी साखर उद्योगानेही स्वागत केले आहे.

साखर उद्योग तीन पद्धतीने इथेनॉलचे उत्पादन घेतो. त्यामध्ये ज्या कारखान्यांचे मुख्य उत्पादन साखर आहे, असे कारखाने सी हेवी पद्धतीने इथेनॉल उत्पादन करतात. त्याचा लिटरचा दर ४६ रुपये ६६ पैसे होता त्यात २ रुपये ७५ पैसे वाढ करण्यात आली. बी हेवी पद्धतीने होणाऱ्या इथेनॉलचा दर ५९.०८ रुपये होता त्यात १.६५ पैसे वाढ करण्यात आली आणि साखरेच्या रसापासून थेट इथेनॉल केले जाते, त्यासाठी २ रुपये १६ पैसे वाढवण्यात आले. केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती.

रसापासून जिथे थेट इथेनॉल केले जाते त्याचा दर लिटरला किमान ७ रुपयांनी वाढवावा, असे साखर उद्योगाला वाटत होते. हा दर वाढला तर जास्तीत जास्त उसापासून इथेनॉल निर्मिती होईल व त्यामुळे देशांतर्गत बाजारात गरजेइतकीच साखर राहू शकेल. तो समतोल साधल्याशिवाय साखरेला दरही चांगला मिळणार नाही व त्याशिवाय उसालाही दर देता येणार नाही; परंतु केंद्र शासनाने तेवढा दर वाढवला नसला तरी केलेली दरवाढही चांगलीच आहे.

प्रकार   -  जुना दर  -   नवा दर  -  वाढ

सी हेवी  -  ४६.६६  -  ४९.४१   - २.७५

बी हेवी  -  ५९.०८  -  ६०.७३   - १.६५

सिरप    -  ६२.६५  -  ६५.६१    - २.१६

केंद्र शासनाने इथेनॉलचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे; परंतु उसाच्या सिरपपासून जिथे इथेनॉल केले जाते, त्याचा दर आता २ रुपये १६ पैसे वाढवला आहे. तो समाधानकारक नाही. त्यामध्ये किमान लिटरला ५ रुपये वाढ अपेक्षित होते. त्याशिवाय देशांतर्गत साखर बाजाराचा समतोल नियंत्रित होऊ शकणार नाही. - विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक कोल्हापूर.

महाराष्ट्रातील इथेनॉल उद्योग

  • इथेनॉल उत्पादनाची वार्षिक क्षमता : २६४ कोटी लिटर
  • सहकारी व खासगी प्रकल्प : ११२
  • सी हेवीपासून उत्पादन : ४६.६६ कोटी लिटर
  • बी हेवीपासून उत्पादन : ५९.०८ कोटी लिटर
  • सिरपपासून उत्पादन : ६३.४५ कोटी लिटर
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकार