शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

उमेदवारीचा घोर; बैठकांचा मात्र जोर, लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:39 IST

दोन्ही आघाड्यांच्या पातळ्यांवर मात्र उमेदवार कोण याबाबतच कमालीचा संभ्रम

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणूका जाहीर होण्याचा कालावधी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. बैठका, भेटीगाठी, जाहीर कार्यक्रमांचा धडाका सुरू झाला आहे. दोन्ही आघाड्यांच्या पातळ्यांवर मात्र उमेदवार कोण याबाबतच मुख्यत: कमालीचा संभ्रम आहे. महायुतीचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना भाजपकडूनच पर्याय शोधला जात असल्याची हवा जास्तच जोर धरू लागली आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजपमध्येही सारेच काय होईल सांगता येत नाही अशा पवित्र्यात आहेत.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिल्यानेच राज्यात सत्ताबदल झाला हे खरे आहे. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांसमवेत गेलेल्या खासदारांची उमेदवारी बदलली जाणार नाही, असा दावा शिंदे शिवसेनेतून केला जात आहे. परंतु, भाजपच्या सर्व्हेमध्ये दोन्ही खासदारांबद्दल नकारात्मक चित्र असल्याचे वारंवार सांगण्यात येते.
  • दुसरे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या कोणत्याच नेत्याकडून आम्ही शिंदे गटाचे जे १३ खासदार आहेत त्या जागा त्यांच्याकडेच राहणार याबद्दल ठामपणे कोणी सांगायला तयार नाही. परिणामी उमेदवार बदलाच्या हवेला जोर मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच सोमवारी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी इचलकरंजीत येऊन खासदार माने यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे जाहीर करून टाकले.
  • भाजपला राज्याच्या सत्तेपेक्षा या घडीला लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार बदलायचे झाल्यास संभाव्य नावे म्हणून कोल्हापुरातून खासदार धनंजय महाडिक यांचे नाव वारंवार पुढे येत आहे. आता त्या जोडीला समरजित घाटगे यांचेही नाव चर्चेत येऊ लागले आहे. घाटगे यांनी कागलची विधानसभाच लढवायची हे पक्के केले आहे, परंतु तरीही जिल्हाध्यक्ष म्हणून सगळीकडे निर्माण झालेली ओळख, शाहू कारखान्यामुळे तयार झालेली प्रतिमा, उच्चशिक्षण आणि राजघराण्याची पार्श्वभूमी म्हणून त्यांचेही नाव चर्चेत असल्याचे भाजपच्याच गोटातून सांगण्यात आले.
  • इचलकरंजीतून राहुल आवाडे हे गेली दोन-तीन महिन्यांपासून बूथपर्यंतचे प्लॅनिंग करू लागले आहेत. त्यांनाही आपल्याला नेतृत्वाकडून न्याय मिळेल असे वाटते, परंतु ते अजून भाजपमध्येच नाहीत आणि उमेदवारी कशी मिळेल असाही प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
  • महाविकास आघाडीचा उमेदवार तिथे अनिश्चितच आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी ही जागा सोडली जाऊ शकते. महाविकास आघाडीच्या दृष्टीने आता भाजपची एकेक जागा कमी करणे हे ध्येय आहे, तिथे निवडून कोण येणार हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही.
  • कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवारीसंबंधी सोमवारीच मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी प्रमुख कार्यकर्त्यांनी केली. त्या जागेवर जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील लढायला तयार असल्याचे जाहीर करण्यात आले.
  • शिवसेना ठाकरे गटाकडून चेतन नरके यांनीही साऱ्या शहरभर चैतन्यदायी कर्तृत्व हवं... अशी कॅचलाइन घेऊन फलक लावले आहेत. पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आज मंगळवारी कोल्हापुरात येणार असून त्यांच्या स्वागताचे फलकही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा त्यांनीच जास्त लावले आहेत. कोल्हापूरची जागा काही झाली तरी शिवसेना आपल्याकडेच घेणार असून तुम्ही तयारीला लागा, असा मेसेज आपल्याला स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिल्याचा दावा ते करत आहेत.
  • काँग्रेसकडून उमेदवारांचा घोळ अर्ज प्रक्रिया सुरू होईपर्यंत सुरू राहील अशी चिन्हे आहेत. अजूनही महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे मागून घेणे व मग त्यासाठी उमेदवार अशा दोन लढाया त्यांना लढायच्या आहेत. या पक्षाकडून संजय घाटगे यांच्या बरोबरीने आता संभाजीराजे यांचेही नाव चर्चेत आले आहे. आमदार सतेज पाटील यांची भूमिका यामध्ये निर्णायक असेल.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा