शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शेंडा पार्कच्या २० एकर जागेत टेक्निकल पार्क, शाश्वत विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांच्यावतीने घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 13:00 IST

विकासात काेल्हापूरला अग्रक्रमावर नेणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील तरुणाईला रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शेंडा पार्कमधील ३२ एकरपैकी २० एकर जागेत टेक्निकल पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगळवारी केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दरडोई उत्पन्न अडीच लाखाहून सहा लाखांपर्यंत नेत जिल्हा देशात अग्रक्रमांकावर नेण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू, असे आवाहन केले.महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेमार्फत हॉटेल सयाजी येथे आयोजित शाश्वत विकास परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी मित्र संस्थेचे सीईओ प्रवीणसिंह परदेशी, जॉइंट सीईओ सुशील खोडवेकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जागतिक बँकेचे अधिकारी विजय के., आयुक्त वस्त्रोद्योग अवश्यंत पांडा, सहसचिव प्रमोद शिंदे, जॉइंट सीईओ अमन मित्तल उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या विभागांसमवेत उद्योजकांनी सामंजस्य करार केले. कोल्हापूरला शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी घोषणापत्राची निर्मिती करण्यात आली.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी शाहू मिल, उद्यमनगरी, कृषी, क्रीडा अशा अनेक मार्गातून जिल्ह्याला शाश्वत विकासाची सुरुवात करून दिली. त्यामुळेच आजही प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी कोल्हापूर सर्वोत्तम जिल्हा आहे. कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगलीत येणाऱ्या पूर निवारणासाठी ३२०० कोटी रुपये जागतिक बँकेकडून मिळणार असल्याने भविष्यात येथे पूर येणारच नाही, असे नियोजन केले जाईल.मित्राचे सीईओ प्रवीणसिंह परदेशी यांनी जिल्हा केंद्रबिंदू मानून विकास करणे शक्य आहे. त्यासाठी युवकांमधील कौशल्य वाढ शैक्षणिक काळातच होणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी येडगे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया या विषयांवर चर्चासत्र झाले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समन्वयक डॉ. अरुण धोंगडे यांनी संयोजन केले. समीर देशपांडे, चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

प्रमुख घोषणा

  • कन्व्हेन्शन सेंटरसाठी ४५० कोटी मंजूर.
  • आयटी विकासासाठी शेंडा पार्क येथील ३५.७१ हेक्टर व टेंबलाईवाडी येथील १.२९ हेक्टर जमीन एमआयडीसी किंवा आयटी संघटनेला प्लग ॲण्ड प्ले मॉडेलसाठी स्थलांतरित करणे.
  • एमआयडीसीद्वारे संपादित होणाऱ्या ५०० हेक्टर जमिनीपैकी ५० टक्के जमीन फौंड्री आणि अभियांत्रिकी कंपन्यांना देणे.
  • साहसी पर्यटनस्थळ विकासासाठी पर्यटन संचालनालयाच्या साहसी पर्यटन ऑपरेटर सोबत सामंजस्य करार. ग्रामीण पर्यटनाला चालना.

अधिकाऱ्यांचीच परिषद..या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील, अशी मागील आठवड्याभरात वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र स्थानिक नेते, प्रशासनातील अधिकारी आणि मोजके उद्योजक यांच्यापुरतीच ही परिषद मर्यादित राहिली. तीन पानांचे घोषणापत्र तयार झाले. आता त्या घोषणांचे पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर