शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गडहिंग्लजला पाणी देताना पालिकेची दमछाक, देखभाल दुरुस्तीचा मेळ बसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:13 IST

दृष्टिक्षेपात नळयोजना, पाणी पुरवठ्याचा लेखाजोखा.. जाणून घ्या

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेची नळपाणी पुरवठा योजना तब्बल ४२ लाखांनी तोट्यात आहे. विशेष पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि कामगार पगार, देखभाल दुरुस्ती, जलशुद्धीकरण, वीजबिल इत्यादी खर्चाचा मेळ घालताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.आजमितीस शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजार आहे. शहरात शिकायला येणारे विद्यार्थी आणि प्रवासी मिळून सुमारे ५० हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगरपालिकेला करावी लागते. त्यासाठी हिरण्यकेशी नदीवर आधारित नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. दररोज माणसी १२० लिटर पाणीपुरवठा केला जातो. मीटर पद्धतीने पाणीपट्टी आकारली जाते. पहिल्या ७५ युनिटला घरगुती वापरासाठी केवळ २४० रूपये तर वाणिज्य वापरासाठी १०५० रूपये इतकी आकारणी केली जाते. (१ युनीट म्हणजे १००० लिटर पाणी)सध्या वाढीव हद्दीतील उपनगरांसह शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी सुमारे ४७ लाखांच्या नव्या नळयोजनेचे काम गतीने सुरू आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असली तरी त्यावरील खर्चावर आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची आवश्यकता आहे.

दृष्टिक्षेपात नळयोजना

  • शहराची लोकसंख्या : ३५८८४
  • घरगुती नळजोडण्या : ८७३९
  • वाणिज्य नळजोडण्या : २९०

पाणी पुरवठ्याचा लेखाजोखा २०२३-२४

  • मालमत्ताकराच्या उत्पन्नापैकी १५ टक्के : ७८,२५,२९९
  • विशेष पाणीपट्टीद्वारे जमा रक्कम : १,२७,३२,२४६
  • नवीन नळजोडणीची जमा रक्कम : ५०,५००
  • कामगार पगार, निवृत्तीवेतन, अंशदान इत्यादी : ३२,२०,४५९
  • देखभाल दुरुस्ती खर्च : ६९,५७,८४३
  • जलशुद्धीकरणासाठी रसायने, तुरटी, टीसीएल खरेदी : २,९४,४००
  • वीजबिलाचा खर्च : १,२३,६९,८३५
  • पाटबंधारेकडून घेतल्या जाणाऱ्या पाण्याची रक्कम : १९,९०,७७९
  • एकूण उत्पन्न : २,०६,०८,०४५
  • एकूण खर्च : २,४८,३३,३१६
  • एकूण तोटा : ४२,२५,२७१

अत्यावश्यक सेवा म्हणून नफ्या-तोट्याचा विचार न करता नळपाणी पुरवठा योजना राबवली जाते. नदीतून पाण्याचा उपसा, शुद्धीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी खूप खर्च येतो. त्यामुळे शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा, शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी.- अनिल गंदमवाड, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी