शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

तालमी पुन्हा ओस पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:22 IST

कोल्हापूर : एकेकाळी मल्लांच्या शड्डूंचा खणखणाट अन् हुंकार अशा ईर्ष्येच्या वातावरणात गंगावेश, मोतीबाग, काळाईमाम, शाहूपुरी, आदी तालमी मल्लांनी गजबजून ...

कोल्हापूर : एकेकाळी मल्लांच्या शड्डूंचा खणखणाट अन् हुंकार अशा ईर्ष्येच्या वातावरणात गंगावेश, मोतीबाग, काळाईमाम, शाहूपुरी, आदी तालमी मल्लांनी गजबजून गेल्या होत्या. मात्र, मागील वर्षापासून कोरोनाच्या कहरामुळे एकही कुस्ती स्पर्धा झाली नाही. त्यामुळे मल्लांना मिळणारे खुराकाचे पैसे अर्थात मानधन दानशूरांकडून आटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी असा आघात झाल्यामुळे सुमारे तीन हजार मल्लांनी घरची वाट धरली आहे.

संस्थानकाळापासून फुटबाॅल, कुस्ती हे जणू कोल्हापूरकरांच्या रक्तातच भिनले आहे. मात्र, डिजिटलच्या युगात कुस्ती काही प्रमाणात मागे पडू लागली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कुस्तीप्रेमींकडून मल्लांना यात्रा, जत्रा आणि साखर कारखान्यांकडून मानधनाच्या रूपाने मदतीचा हात दिला जातो. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा मदतीचा हात आखडला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सुमारे तीन हजार मल्लांनी गावाकडची वाट धरली आहे.

मल्लांना महाराष्ट्र केसरीची आस

महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून अनेक मल्ल लाखो रुपये खर्च करून कोल्हापूरच्या नामांकित मोतीबाग, शाहूपुरी, गंगावेश, न्यू मोतीबाग, कळंब्याच्या राष्ट्रकुल, शिंगणापुरातील मुंडे आण्णांच्या तालमीत येतात. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, महान भारत केसरी, अशा नावाजलेल्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व व त्या जोडीची ताकद कमावण्यासाठी या तालमीत मल्ल जिवाचे रान करून प्रवेश घेतात. मात्र, गेल्यावर्षीपासून मल्लांकरिता एकही स्पर्धा झालेली नाही. स्पर्धाच होत नसेल तर नुसता सराव करून काय करायचे, असाही प्रश्न मल्लांना पडत आहे. जे स्वप्न म्हणून बघितलेल्या महाराष्ट्र केसरीसारख्या स्पर्धांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे अनेक मल्लांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे.

खुराकचा खर्च असा,

लोणी, केळी, थंडाईसाठी बदाम, दोन वेळचा चिकू शेक, सफरचंद, अंडी, मांसाहार अशा प्रकारचा खुराक सर्वसाधारण ७० ते १२० किलो वजनाच्या खुल्या गटातील मल्लांना लागतो. याचा दिवसाचा खर्च काढला तर ८०० ते १००० रुपये मोजावे लागतात. हा खर्च हे मल्ल काही प्रमाणात कर्ज, आई-वडिलांकडून किंवा यात्रा, जत्रांतून मिळणाऱ्या बक्षीस, मानधनातून काढत होते. हे सर्व बंद असल्यामुळे कोठून खर्च करायचा, असा प्रश्न मल्लांना पडला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्त्या विनाप्रेक्षक घ्या

प्रत्येक मल्लाचे स्वप्न असणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा तरी विनाप्रेक्षक घ्यावी. जे मल्ल पात्र होतील, त्यांची सर्व पद्धतीने आरोग्य चाचणी घ्यावी. त्यानंतरच विनाप्रेक्षक स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र कुस्ती मल्ल विद्याचे प्रवक्ते संग्राम कांबळे यांनी केली आहे.

कोट

एक मल्ल दोन प्रहराच्या अंग मेहनतीतून प्रत्येक अवयव आणि फुप्फुसांमध्ये भरपूर ऑक्सिजन शोषून घेतो. त्यांच्यामध्ये सर्वसामान्यांपेक्षा रोग प्रतिकार शक्ती अधिक तयार होते. आरोग्य तपासणीत हे तज्ज्ञांनाही कळू शकते. तरीसुद्धा कुस्तीचा सराव, स्पर्धा शासनाने बंद केल्या आहेत. मग आयपीएलसारख्या स्पर्धा , उत्तर प्रदेशातील मैदाने, परदेशातील कुस्तीपटूंचे दौरे कसे चालतात. - राम सारंग, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते