शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

तळगाव ग्रामस्थ करणार रस्त्यासाठी उपोषण, लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:27 IST

Road Kolhapur :  बुरंबाळी फाटा ते दुर्गमानवाड या रस्त्याला जोडणारा तळगाव - कुदळवाडी रस्ता येत्या महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा आज येथील तरुणांनी दिला. रस्त्याबद्दलच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत तरुणांनी  लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक आमच्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देरस्ता महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास लोकप्रतिनिधीला फिरू देणार नाहीरस्ता खड्डेमुक्त न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा 

श्रीकांत ऱ्हायकरधामोड/कोल्हापूर :  बुरंबाळी फाटा ते दुर्गमानवाड या रस्त्याला जोडणारा तळगाव - कुदळवाडी रस्ता येत्या महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा आज येथील तरुणांनी दिला. रस्त्याबद्दलच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत तरुणांनी  लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक आमच्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. हा रस्ता म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळेना असे झाल्याची प्रतिक्रिया नोंदवत तरुणांनी रस्ता खड्डेमुक्त न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा  प्रशासनाला दिला आहे.बुरंबाळी दुर्गमानवाड रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे तळगाव अत्यंत ग्रामीण व दुर्गम गाव. गेल्या कित्येक वर्षापासून या गावाला रस्ताच झालेला नाही. एकदा डांबरीकरण झालेले आहे. पण या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून या रस्त्या डांबरीकरण झालेले आहे का असा प्रश्न पडतो.

२०१८-१९ रोजी गावातील अंतर्गत रस्त्याचा सात लाख पन्नास हजार रुपयाचा निधी मुख्य रस्त्यावरती वळवत ग्रामपंचायतीने स्वतःहून या रस्त्याची डागडुजी केली होती. पण तोही रस्ता गुणवत्ते अभावी कुचकामी ठरला. अवघ्या वर्षातच त्याच्यावरचे डांबर बाजूला गेले आहे. आमदार फंडातून २०१९ रोजी या रस्त्यावरती नऊ लाख नव्व्यानव हजार रुपये खर्च केल्याचा रस्त्यावरती लावलेला बोर्ड सांगतो. पण या रस्त्याकडे बघितले असता खरंच हा निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे का? असा प्रश्न पडतो.  पावसाळ्याचे दिवस सुरू होतील, तेव्हा या रस्त्याची अजून दयनीय अवस्था होईल.

या मार्गावर एकच बस ये-जा करत असते. पण रस्त्याची अवस्था फार दयनीय झाल्याने एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्या आहेत . त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील सर्व तरुण मंडळाच्या तरुणांनी एकत्र येऊन आज रस्त्यावर आंदोलन केले. येत्या महिनाभरात या रस्त्याची डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे इशारा या तरुणांनी आज दिला.

यावेळी संजय तवनकर, विठ्ठल पाटील, मारुती पाटील, रमेश कांबळे, सुनील पाटील,शशांक पाटील, साताप्पा नाळे, धनाजी पाटील,सतीश पाटील, युवराज पाटील, किरण पाटील, आदींसह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते .