शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

सर्व्हरचे स्पीड नसल्याने तलाठी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:55 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आॅनलाईन सातबाऱ्यासाठी दिलेल्या सर्व्हरला स्पीडच नसल्याने करवीर, पन्हाळा, हातकणंगले व राधानगरी तालुक्यांतील तलाठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी दिवसरात्र थांबूनच आॅनलाईन सातबाºयाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिन्याभरात शंभर टक्के आॅनलाईन सातबाºयाचे काम होईल, अशी घोषणा ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आॅनलाईन सातबाऱ्यासाठी दिलेल्या सर्व्हरला स्पीडच नसल्याने करवीर, पन्हाळा, हातकणंगले व राधानगरी तालुक्यांतील तलाठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी दिवसरात्र थांबूनच आॅनलाईन सातबाºयाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिन्याभरात शंभर टक्के आॅनलाईन सातबाºयाचे काम होईल, अशी घोषणा केली आहे; परंतु अद्याप त्यांच्याच जिल्ह्यात ८५ टक्केच काम झाले आहे. आजरा, गगनबावडा व भुदरगड तालुक्यांचे काम १०० टक्के झाले आहे.आॅनलाईन सातबारातील तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाईन सातबाराचे जिल्ह्याचे उद्दिष्ट अद्याप अपूर्णच राहिले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१६ मध्ये आॅनलाईन सातबाराच्या कामाला सुरुवात होेऊन याचवेळी हस्तलिखित सातबारे देण्याचे बंद करण्यात आले. सुरुवातीपासूनच आॅनलाईन सातबाराचा विषय वादात राहिला आहे. ग्रामीण भागातील काही ठिकाणी रेंजची अडचण व सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे वेळेवर नागरिकांना सातबारे उतारे देण्यास वेळ लागत होता.वेळोवेळी सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी राहिल्याने त्याला वरचेवर मुदतवाढ देण्यात आली. १ मे २०१८ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्टÑ दिनाच्या समारंभात महिन्याभरात आॅनलाईन सातबाºयाचे काम शंभर टक्के पूर्ण होईल, असे जाहीर केले होते; परंतु, अद्याप कोल्हापूर जिल्ह्याचे काम सरासरी ८० टक्क्यांच्या पुढे गेलेले नाही. त्यांच्या जिल्ह्यातच ही स्थिती असून, हे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे.सध्या तलाठ्यांना सर्वांत मोठा प्रश्न सतावत आहे, तो म्हणजे सर्व्हरचे ‘स्पीड.’ ग्रामीण भागात सर्व्हरला स्पीड नसल्याने आॅनलाईन सातबाराचे काम करण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १२ लाखांचा सर्व्हर विकत घेतला असून, त्यातून स्पीड देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे करवीरसह हातकणंगले, राधानगरी व पन्हाळा तालुक्यांतील तलाठ्यांचे आॅनलाईन सातबाºयाचे काम हे जिल्हाधिकारी कार्यालयातूनच सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून येथील तलाठी दिवसरात्र थांबून आॅनलाईन सातबाराचे काम करीत आहेत. तरीही या ठिकाणी त्यांना अडचणी येत आहेत. साप्ताहिक सुट्ट्यांदिवशीही तलाठी तालुक्याच्या कानाकोपºयातून येऊन या ठिकाणी काम करीत आहेत; परंतु अद्यापही अडचणींनी त्यांच्या पिच्छा सोडलेला नाही. तीन महिने होऊनही या चार तालुक्यांचे काम शंभर टक्के झालेले नाही.दीडशे तलाठ्यांचा तळ जिल्हाधिकारी कार्यालयातजिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरला स्पीड उपलब्ध करून दिल्याने ‘करवीर’मधील ६७, हातकणंगलेमधील ३८, पन्हाळा व राधानगरीतील प्रत्येकी २० तलाठी दिवसरात्र या ठिकाणी थांबून आॅनलाईन सातबाराचे काम करीत आहेत. येथील डाटा ‘एनआयसी’कडून कलेक्ट करून तो संबंधित यंत्रणेकडून पाठविण्याचे काम केले जात आहे. शासनाने तालुकास्तरावरच तलाठ्यांना चांगल्या स्पीडचा सर्व्हर उपलब्ध करून दिला असता तर हे काम यापूर्वीच पूर्ण झाले असते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.तालुका एकूण खाते रिएडिटचे टक्केवारीगावे प्रक्रिया पूर्ण काम पूर्णआजरा ९८ ९८ ९८ १००करवीर १३२ १३२ ९५ ७१.९७कागल ८५ ८५ ७६ ८९.४१गगनबावडा ४२ ४२ ४२ १००गडहिंग्लज ९३ ९३ ८० ८६.०२चंदगड १५५ १५३ ११४ ७३.५५पन्हाळा १२८ १२८ ११९ ९२.९७भुदरगड ११४ ११४ ११४ १००राधानगरी १३१ १३० १०३ ७८.६३शाहूवाडी १४२ १४२ १२२ ८५.९२शिरोळ ५२ ५२ ४५ ८६.५४हातकणंगले ६२ ६२ ३५ ५६.४५१२३४ १२३१ १०४३ ८४.५२