शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:42 IST

भारत चव्हाण आपल्या हिंदू धर्मातील सण, उत्सवातून अनेक चांगले संदेश दिले गेले आहेत. त्यातून सामाजिक सलोखा, एकात्मता, बंधुभाव, एकमेकांबद्दल ...

भारत चव्हाणआपल्या हिंदू धर्मातील सण, उत्सवातून अनेक चांगले संदेश दिले गेले आहेत. त्यातून सामाजिक सलोखा, एकात्मता, बंधुभाव, एकमेकांबद्दल आदर व्यक्त करणे आणि त्याद्वारे सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी निभावणे यासारखे संदेश अशा सण, उत्सवातून दिले आहेत. त्याचे अनुकरण आपण आजही करीत आहोत. नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर संक्रांतीचा सण नुकताच झाला. या सणात आपण एकमेकांना तिळगूळ देतो, गोड-गोड बोला म्हणून आवाहन करतो. वर्षभराची आपली वर्तणूक कशी असते, हा वादाचा मुद्दा असला तरी सणाच्या निमित्ताने का होईना आपण गोड बोलण्याचे आर्जव करतो. नुसत्या गोड बोलण्याने दोन व्यक्तीत किती ऊर्जा निर्माण होते. समाज जोडण्यास किती मदत होऊ शकते, हे बोलण्यातून समोर येते.समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या वर्तणुकीवर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. व्यक्तीचा निटनेटकेपणा, परिधान केलेले कपडे, त्यांच्यातील नम्रता, विनयशीलता आणि आज्ञाधारकपणा हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गाभा असतो. त्यातही त्यांचे मधुर बोलणे आणि खरं बोलणे यावरदेखील बरेच काही अवलंबून असते. तुमच्या वागण्यात टापटीपपणा आहे आणि बोलण्यात नम्रता, गोडवा नसेल, तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून तुम्ही कसे बोलता, किती चांगले बोलता, किती गोड बोलता हे फार महत्त्वाचे आहे. चांगल्या, मधुर बोलण्याने माणसांची मनं जोडली जातात. अशी अनेक मनं एकमेकांशी जोडली की, मग त्यातून एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. अशी निर्मिती राष्टÑाच्यादृष्टीने महत्त्वाची असते.तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही रोज गोड बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून तुम्हाला खरा आनंद मिळतो आणि जगण्यातील उत्साहही वाढतो. तुमचा एक गोड शब्द केवळ व्यक्तीच नाही, तर संपूर्ण समाजमन जोडण्यास कारणीभूत ठरत असतो. कटू बोलण्याने जो तिरस्कार निर्माण होतो. मनात द्वेष तयार होतो. या द्वेषातून मनात विष तयार होते आणि एकदा का विष तयार झाले की मनातून बाहेर काढणे अवघड होऊन जाते. गोड बोलण्याने तिरस्काराची जागा प्रेम आणि आपुलकी घेते. समाजात तुमच्याबद्दल एक आदरभाव निर्माण होतो. म्हणूनच जीवनात सहवासातील प्रत्येक व्यक्तीशी गोड आणि चांगले बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आजकाल आपल्या आजूबाजूला व्यावसायिकता अधिक निर्माण झाली आहे. स्वार्थी वृत्तीही पाहायला मिळते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा आपल्या ‘बॉस’ला चांगले वाटावे म्हणून काही व्यक्ती अतिशय गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यात आपुलकीपेक्षा दिखावा जास्त असतो. त्यांच्या बोलण्यात खरेपणाचा अभाव असतो. काही व्यक्ती तर इतक्या गोड बोलतात की, समोरच्या व्यक्तीला किंवा ऐकणाºयांना त्याची कीव येते. ज्याच्या बोलण्यात प्रमाणापेक्षा अधिक गोडवा असतो त्यांच्यात विश्वासार्हता कमी असते. अशा व्यक्ती कधी कधी घातकही ठरतात. काही व्यक्तींचा स्वभाव शांत असतो. त्या कमी बोलत असतात. त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. कमी बोलण्याचा हा धोका असतो. काही कमी स्पष्ट आणि परखड बोलणाºया असतात. साक्षात चिले महाराजच! जे पटत नाही त्यावर स्पष्टपणे आपले मत मांडणे हा अशा व्यक्तींचा स्वभाव असतो; पण आजकाल स्पष्ट बोललं की अनेकांना राग येतो. बोलणाºयाचे मन निखळ असतं, परंतु ज्यांना बोललं त्या व्यक्ती दूर जातात. म्हणूनच नि:स्वार्थी भावनेतून गोड आणि खरे बोलणे फार महत्त्वाचे असते. त्यातूनच तुमच्याबद्दलची विश्वासार्हता ठरते. माणसाच्या बोलण्यातील गोडवा साखरेपेक्षाही अधिक गोड असतो. हाच गोडवा जीवनात कायम टिकतो, तोच खºया अर्थाने त्या व्यक्तीची श्रीमंती असते.