शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:42 IST

भारत चव्हाण आपल्या हिंदू धर्मातील सण, उत्सवातून अनेक चांगले संदेश दिले गेले आहेत. त्यातून सामाजिक सलोखा, एकात्मता, बंधुभाव, एकमेकांबद्दल ...

भारत चव्हाणआपल्या हिंदू धर्मातील सण, उत्सवातून अनेक चांगले संदेश दिले गेले आहेत. त्यातून सामाजिक सलोखा, एकात्मता, बंधुभाव, एकमेकांबद्दल आदर व्यक्त करणे आणि त्याद्वारे सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी निभावणे यासारखे संदेश अशा सण, उत्सवातून दिले आहेत. त्याचे अनुकरण आपण आजही करीत आहोत. नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर संक्रांतीचा सण नुकताच झाला. या सणात आपण एकमेकांना तिळगूळ देतो, गोड-गोड बोला म्हणून आवाहन करतो. वर्षभराची आपली वर्तणूक कशी असते, हा वादाचा मुद्दा असला तरी सणाच्या निमित्ताने का होईना आपण गोड बोलण्याचे आर्जव करतो. नुसत्या गोड बोलण्याने दोन व्यक्तीत किती ऊर्जा निर्माण होते. समाज जोडण्यास किती मदत होऊ शकते, हे बोलण्यातून समोर येते.समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या वर्तणुकीवर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. व्यक्तीचा निटनेटकेपणा, परिधान केलेले कपडे, त्यांच्यातील नम्रता, विनयशीलता आणि आज्ञाधारकपणा हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गाभा असतो. त्यातही त्यांचे मधुर बोलणे आणि खरं बोलणे यावरदेखील बरेच काही अवलंबून असते. तुमच्या वागण्यात टापटीपपणा आहे आणि बोलण्यात नम्रता, गोडवा नसेल, तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून तुम्ही कसे बोलता, किती चांगले बोलता, किती गोड बोलता हे फार महत्त्वाचे आहे. चांगल्या, मधुर बोलण्याने माणसांची मनं जोडली जातात. अशी अनेक मनं एकमेकांशी जोडली की, मग त्यातून एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. अशी निर्मिती राष्टÑाच्यादृष्टीने महत्त्वाची असते.तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही रोज गोड बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून तुम्हाला खरा आनंद मिळतो आणि जगण्यातील उत्साहही वाढतो. तुमचा एक गोड शब्द केवळ व्यक्तीच नाही, तर संपूर्ण समाजमन जोडण्यास कारणीभूत ठरत असतो. कटू बोलण्याने जो तिरस्कार निर्माण होतो. मनात द्वेष तयार होतो. या द्वेषातून मनात विष तयार होते आणि एकदा का विष तयार झाले की मनातून बाहेर काढणे अवघड होऊन जाते. गोड बोलण्याने तिरस्काराची जागा प्रेम आणि आपुलकी घेते. समाजात तुमच्याबद्दल एक आदरभाव निर्माण होतो. म्हणूनच जीवनात सहवासातील प्रत्येक व्यक्तीशी गोड आणि चांगले बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आजकाल आपल्या आजूबाजूला व्यावसायिकता अधिक निर्माण झाली आहे. स्वार्थी वृत्तीही पाहायला मिळते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा आपल्या ‘बॉस’ला चांगले वाटावे म्हणून काही व्यक्ती अतिशय गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यात आपुलकीपेक्षा दिखावा जास्त असतो. त्यांच्या बोलण्यात खरेपणाचा अभाव असतो. काही व्यक्ती तर इतक्या गोड बोलतात की, समोरच्या व्यक्तीला किंवा ऐकणाºयांना त्याची कीव येते. ज्याच्या बोलण्यात प्रमाणापेक्षा अधिक गोडवा असतो त्यांच्यात विश्वासार्हता कमी असते. अशा व्यक्ती कधी कधी घातकही ठरतात. काही व्यक्तींचा स्वभाव शांत असतो. त्या कमी बोलत असतात. त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. कमी बोलण्याचा हा धोका असतो. काही कमी स्पष्ट आणि परखड बोलणाºया असतात. साक्षात चिले महाराजच! जे पटत नाही त्यावर स्पष्टपणे आपले मत मांडणे हा अशा व्यक्तींचा स्वभाव असतो; पण आजकाल स्पष्ट बोललं की अनेकांना राग येतो. बोलणाºयाचे मन निखळ असतं, परंतु ज्यांना बोललं त्या व्यक्ती दूर जातात. म्हणूनच नि:स्वार्थी भावनेतून गोड आणि खरे बोलणे फार महत्त्वाचे असते. त्यातूनच तुमच्याबद्दलची विश्वासार्हता ठरते. माणसाच्या बोलण्यातील गोडवा साखरेपेक्षाही अधिक गोड असतो. हाच गोडवा जीवनात कायम टिकतो, तोच खºया अर्थाने त्या व्यक्तीची श्रीमंती असते.