शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सावरणारे हात !

By admin | Updated: April 2, 2017 22:16 IST

कचरा करणाऱ्यांचे हात हजार, सावरणाऱ्यांचे अगदीच अपुरे, तोकडे हात.

दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालणारी गिरनारची परिक्रमा. ही परंपरा किती जुनी? तर अगदी श्रीकृष्णाच्या काळातली. इतकी प्राचीन. संगीत सौभद्राची नव्याने उजळणी केली तर यतिवेशातील अर्जुनाने सुभद्राहरण करण्यासाठी जो दुर्गम गिरीशिखरांचा प्रदेश निवडला, जी यात्रेची पर्वणी साधली ना, तीच ही परिक्रमा. गुजरातच्या कानाकोपऱ्यातले भाविक आपल्या कुटुंबकबिल्यासह या यात्रेत सामील होतातच. परंपरेने चालत आलेला त्यांचा वारसा आहे तो. त्यांच्या जोडीला आता महाराष्ट्रातून विशेष करून पुण्या-मुंबईकडच्या भक्तजनांची भर वाढतच आहे. वाचनसंस्कृती फोफावल्याचा की सोशल मीडियाचा फायदा-तोटा न कळे. भवनाथ येथील दुधेश्वर मंदिरापासून परिक्रमेला सुरुवात होते, पण गर्दीचा महापूर जुनागडपासूनच उसळलेला असतो आणि भवनाथाच्या पायथ्याशी त्याचा महासागर होतो. संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा दाट जंगलातून जातो. आम्हीही उत्साहाने आणि उत्सुकतेने सकाळी सहा वाजता परिक्रमेच्या जत्थ्यात सामील झालो. चालायला सुरुवात झाली आणि दहा-पंधरा मिनिटांतच एके ठिकाणी लांबच लांब रांग लावावी लागली. थांबून ओळखपत्र काढायला लागलो तर लक्षात आलं की, तिथं यात्रेकरूंच्या पाठपिशव्या, हातपिशव्या तपासत आहेत. त्यातले सामान, खाण्याचे जिन्नस कागदी पिशव्यात भरून परत देत आहेत. या अस्पर्श जंगलात, दऱ्याखोऱ्यात प्लास्टिक कचरा टाकू नका, सहकार्य करा, अशी कळकळीची विनंती करणारी ही मंडळी स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आहेत. विद्यार्थीपण आहेत. भल्या पहाटे, ऐन थंडीत अतिशय शांतपणे, शिस्तीत त्यांचे हे काम सुरू आहे.आपल्या कोल्हापुरातही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ६० हजार कागदी पिशव्यांचे वाटप केल्याची बातमी आपल्या वाचनात आली होती. एकीकडे कसल्या तरी उन्मादाने, बेफिकीर, बेमूर्वत होऊन बिनधास्तपणे वावरणारी तथाकथित हौशी भाविक यात्रेकरू किंवा पर्यटकमंडळी आणि दुसरीकडे पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरू पाहणारी जागरूक मंडळी. कचरा करणाऱ्यांचे हात हजार, सावरणाऱ्यांचे अगदीच अपुरे, तोकडे हात.असाच अनुभव कर्दळीवनाच्या यात्रेतही आलेला. अक्कमहादेवीच्या नैसर्गिक गुहेत, वन्यजिवांच्या रात्रवस्तीच्या जागी हौशी भाविकांनी कब्जा केलेला. काही ‘पुण्ययात्रा’ घडविणारे ‘पुण्य क्षेत्रा’तले ठेकेदार शेकडोंच्या घरात भाविकांना घेऊन जातात. त्यांनी मागे ठेवलेल्या असंख्य प्लास्टिकखुणा त्या गुहेत विखुरलेल्या. बाटल्या, टीन, पत्रावळी, द्रोण, शाम्पू सॅचेट, प्लास्टिकची पोती आम्ही गोळा केली आणि दरीत डोकावलो तर गुहेसमोरच्या दरीतले ते रंगीबेरंगी चमकदार ढीग आमच्याकडे दात विचकून हसताहेत असेच वाटले. या अनैसर्गिक कचऱ्याची कशी विल्हेवाट लावावी ते समजेना. जाळून तरी कसा टाकणार? एखाद्-दुसरी ठिणगी बाहेर उडून गेली तर त्या नि:शब्द जंगलातल्या वणव्याचे चांगलेच फावणार!जमेल तेवढा कचरा तिथेच गाडून आम्ही पुढे निघालो. कधी शहाणे होणार? कधी सावरणार, कसे सावरणार याचा विचार करीत. - डॉ. सुप्रिया जोशी. (‘महिलांनो लिहित्या व्हा’ लेखन चळवळीतील प्रतिनिधी)‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे