शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये घेतल्याशिवाय माघार नाही; 'स्वाभिमानी'च्या आक्रोश पदयात्रेला शिरोळमधून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 11:15 IST

३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ कि.मी पदयात्रा

संदीप बावचेशिरोळ : उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये प्रतिटन या व राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिझीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश पद यात्रेस मंगळवारी शिरोळ येथून प्रारंभ झाला. स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दत्त साखर कारखान्यास मागण्यांचे निवेदन देऊन पद यात्रेस सुरुवात करण्यात आली. शिरोळ ते दत्त कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी साडेआठ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली. ढोल -हलगीच्या निनादात व घोषणाबाजी देत ही यात्रा पुढे सुरू झाली. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले, महिलांनी औक्षणही केले. शिरोळ नगरपालिकेसमोर नराराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी राजू शेट्टी यांना पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर शिवाजी तक्तापासून ही यात्रा शिरटी फाटा येथे आल्यानंतर जेसीबीतून फुलांची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. कारखानदारांकडून घामाचे दाम वसूल करूया आता माघार नाही असे फलक लक्षवेधी ठरले.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केवळ एफआरपी दिलेली आहे. साखरेचे बाजारभाव ३८०० रूपयांच्या घरात आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ४०० ते ५०० रूपये एफआरपी पेक्षा अधिक रक्कम दिली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त असताना देखील दुसरा हप्ता देण्यास नकार देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किमी पदयात्रा चालत जाऊन ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे.  जोपर्यंत ४०० रूपयांचा हप्ता दिला जात नाही. तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने