शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

'स्वाभिमानी'चे चक्काजाम आंदोलन: पुणे-बेंगळुरू महामार्गावरच बसल्या पंगती; तोडगा काढण्यासाठी शाहू महाराजांचा पुढाकार

By उद्धव गोडसे | Updated: November 23, 2023 17:21 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराचे आंदोलन तीव्र केले असून, गुरुवारी दुपारपासून पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला. शिरोली पुलाची ...

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराचे आंदोलन तीव्र केले असून, गुरुवारी दुपारपासून पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला. शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथे हजारो शेतक-यांची महामार्गावरच पंगत बसली. घरातून बांधून आणलेली शिदोरी आणि आंदोलकांनी रस्त्यावर शिजवलेली भात-आमटी खावून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतक-यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेतक-यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली.मागील हंगामातील प्रतिटन ४०० रुपये आणि नवीन हंगामात उसाला एकरकमी ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. गुरुवारी दुपारी पुणे-बेंगळुरू महामार्गावर आंदोलकांना रास्ता रोको केला. हजारो आंदोलकांनी महामार्गावरच ठाण मांडल्यामुळे पोलिसांनी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवावी लागली. तरीही महामार्गावर दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा आहेत. पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलकांनी महामार्गावर भात आणि आमटी तयार केली. तसेच सोबत आणलेली शिदोरी सोडून महामार्गावर पंगती बसवल्या. अनेक आंदोलक येताना तांदूळ आणि भाज्या घेऊन आले आहेत, त्यामुळे ऊस दरावर तोडगा निघेपर्यंत महामार्गावरच ठाण मांडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. श्रीमंत शाहू महाराज यांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली. ऊस दराच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, काही साखर कारखानदारांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक सुरू असून, शेट्टी यांच्या मागणीवर चर्चा सुरू आहे. लवकरच तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाhighwayमहामार्ग