शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच घालविली रात्र, लिंगनुर-कापशीत ऊस वाहतूक धरली रोखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:36 IST

दत्ता पाटील म्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे ...

दत्ता पाटीलम्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलनास काल, गुरुवारी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी ऊस वाहतूक सुरूच होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल, गुरुवारची रात्र रस्त्यावरच जागवत वाहने रोखली. त्यामुळे महाराष्ट्रातील लिंगनुर-कापशी पासून कर्नाटकातील गायकवाडी पर्यंत शंभरहून अधिक वाहनांची रांग लागली आहे.वाहनातील ऊसासह वाहनांचे नुकसान होवू नये. यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. केवळ मुठभर कार्यकर्ते असतानही ऊस वाहतूक गेल्या १४ तासांपासून रोखून ठेवली आहे. यामागे संघटनेचे वलय असल्यानेच हे शक्य असल्याचे संघटनेचे कार्यकर्ते संभाजी यादव यांनी सांगितले. यावेळी महादेव कामते (मेतके) उत्तम भांबरे (गलगले), उत्तम आवळेकर, निपाणी तालुकाध्यक्ष भाऊसो जिनगे (आकोळ),रमेश मगदुम (सिध्दनाथ), तात्यासो पाटील, राकेश पाटील(आकोळ), शिवाजी कमळकर (यमगे), पंडीत पाटील (नंद्याळ), पांडुरंग चौगले (भडगाव), संभाजीराव यादव (लिंगनुर) यासह सीमाभागातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी, साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३५०० रुपये करावा, ऊसतोड मजुरांची नोंदणी व पुरवठा महामंडळाकडून करावी, या मागण्यांसाठी दोन दिवसांचे राज्यव्यापी ऊसतोड, वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी स्वाभिमानीच्या आवाहनानुसार बहुतांशी ऊस उत्पादकांनी ऊसतोड घेतली नाही. अनेक ऊस वाहतूकदारांनीही वाहतूक केली नाही. काही ठिकाणी ऊस वाहतूक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना