शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच घालविली रात्र, लिंगनुर-कापशीत ऊस वाहतूक धरली रोखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:36 IST

दत्ता पाटील म्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे ...

दत्ता पाटीलम्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलनास काल, गुरुवारी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी ऊस वाहतूक सुरूच होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल, गुरुवारची रात्र रस्त्यावरच जागवत वाहने रोखली. त्यामुळे महाराष्ट्रातील लिंगनुर-कापशी पासून कर्नाटकातील गायकवाडी पर्यंत शंभरहून अधिक वाहनांची रांग लागली आहे.वाहनातील ऊसासह वाहनांचे नुकसान होवू नये. यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. केवळ मुठभर कार्यकर्ते असतानही ऊस वाहतूक गेल्या १४ तासांपासून रोखून ठेवली आहे. यामागे संघटनेचे वलय असल्यानेच हे शक्य असल्याचे संघटनेचे कार्यकर्ते संभाजी यादव यांनी सांगितले. यावेळी महादेव कामते (मेतके) उत्तम भांबरे (गलगले), उत्तम आवळेकर, निपाणी तालुकाध्यक्ष भाऊसो जिनगे (आकोळ),रमेश मगदुम (सिध्दनाथ), तात्यासो पाटील, राकेश पाटील(आकोळ), शिवाजी कमळकर (यमगे), पंडीत पाटील (नंद्याळ), पांडुरंग चौगले (भडगाव), संभाजीराव यादव (लिंगनुर) यासह सीमाभागातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी, साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३५०० रुपये करावा, ऊसतोड मजुरांची नोंदणी व पुरवठा महामंडळाकडून करावी, या मागण्यांसाठी दोन दिवसांचे राज्यव्यापी ऊसतोड, वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी स्वाभिमानीच्या आवाहनानुसार बहुतांशी ऊस उत्पादकांनी ऊसतोड घेतली नाही. अनेक ऊस वाहतूकदारांनीही वाहतूक केली नाही. काही ठिकाणी ऊस वाहतूक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना