शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

कोल्हापुरातील महापूर नियंत्रणासाठी सर्वेक्षण सुरू, चारजणांचे पथक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:39 IST

पुण्यातील संस्था करणार महापुराचा अभ्यास

कोल्हापूर : प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला येणाऱ्या महापुराचा नागरी जीवनावर फारसा परिणाम होऊ नये तसेच वित्तीय नुकसानसुद्धा टाळले जावे यासाठी कराव्या लागणाऱ्या तात्पुरत्या त्याचबरोबर कायमस्वरूपी उपाययोजनांसंदर्भात पुण्यातील एका खासगी संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या संस्थेचे चार जणांचे एक पथक सर्व संबंधितांकडून त्याचबरोबर प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती घेत आहे.पंचगंगा तसेच कृष्णा नदीच्या महापुरामुळे प्रत्येक वर्षी नागरी जनजीवन विस्कळीत होत असते. शेतात, घरात महापुराचे पाणी शिरल्यामुळे शेतीसह प्रापंचिक तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. आठ दहा दिवस नागरिकांना विस्थापित ठिकाणी वास्तव्य करावे लागते. जनावरांची सोय करावी लागते. यामुळे प्रशासनावरसुद्धा मोठा ताण पडतो.प्रत्येक वर्षीच्या या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारला तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याकरिता राज्य सरकारने जागतिक बँकेकडून ३,२०० कोटी रुपयांचे कर्जाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यात पुढाकार घेतला आहे.पंचगंगा तसेच कृष्णा नदीच्या महापुरावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी पुण्यातील प्रायमो या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या संस्थेचे चार जणांचे एक पथक गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरात पूरक्षेत्रात पाहणी करून माहिती गोळा करत आहे. महापुरामुळे पर्यावरणीय तसेच सामाजिक परिणाम काय होतात, महापुराचे पाणी कोठेपर्यंत येते, महापूर आल्यानंतर नागरिकांचे स्थलांतर कोठे केले जाते, त्या ठिकाणी त्यांना कशा प्रकारे सुविधा दिल्या जातात, याची माहिती या पथकाकडून घेतली जात आहे.पूर नियंत्रणाच्या अनुषंगाने सुरू असलेले हे सर्वेक्षण आणखी काही महिने सुरू राहणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल राज्य सरकारला दिला जाईल. त्यानंतर पूरनियंत्रणासंदर्भातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरPuneपुणे