शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

कोल्हापुरातील महापूर नियंत्रणासाठी सर्वेक्षण सुरू, चारजणांचे पथक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:39 IST

पुण्यातील संस्था करणार महापुराचा अभ्यास

कोल्हापूर : प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला येणाऱ्या महापुराचा नागरी जीवनावर फारसा परिणाम होऊ नये तसेच वित्तीय नुकसानसुद्धा टाळले जावे यासाठी कराव्या लागणाऱ्या तात्पुरत्या त्याचबरोबर कायमस्वरूपी उपाययोजनांसंदर्भात पुण्यातील एका खासगी संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या संस्थेचे चार जणांचे एक पथक सर्व संबंधितांकडून त्याचबरोबर प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती घेत आहे.पंचगंगा तसेच कृष्णा नदीच्या महापुरामुळे प्रत्येक वर्षी नागरी जनजीवन विस्कळीत होत असते. शेतात, घरात महापुराचे पाणी शिरल्यामुळे शेतीसह प्रापंचिक तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. आठ दहा दिवस नागरिकांना विस्थापित ठिकाणी वास्तव्य करावे लागते. जनावरांची सोय करावी लागते. यामुळे प्रशासनावरसुद्धा मोठा ताण पडतो.प्रत्येक वर्षीच्या या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारला तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याकरिता राज्य सरकारने जागतिक बँकेकडून ३,२०० कोटी रुपयांचे कर्जाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यात पुढाकार घेतला आहे.पंचगंगा तसेच कृष्णा नदीच्या महापुरावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी पुण्यातील प्रायमो या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या संस्थेचे चार जणांचे एक पथक गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरात पूरक्षेत्रात पाहणी करून माहिती गोळा करत आहे. महापुरामुळे पर्यावरणीय तसेच सामाजिक परिणाम काय होतात, महापुराचे पाणी कोठेपर्यंत येते, महापूर आल्यानंतर नागरिकांचे स्थलांतर कोठे केले जाते, त्या ठिकाणी त्यांना कशा प्रकारे सुविधा दिल्या जातात, याची माहिती या पथकाकडून घेतली जात आहे.पूर नियंत्रणाच्या अनुषंगाने सुरू असलेले हे सर्वेक्षण आणखी काही महिने सुरू राहणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल राज्य सरकारला दिला जाईल. त्यानंतर पूरनियंत्रणासंदर्भातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरPuneपुणे