शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Kolhapur: उत्तूरमधील ऊस पिके करपली, शेतकरी चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 6:15 PM

उत्कर्षा पोतदार  उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची ...

उत्कर्षा पोतदार उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची उसनवारी करून ऊस पिक जगवण्यासाठी धडपडत आहेत. आजूबाजूच्या गावात वळीव पाऊस झाला असला तरी उत्तूरला वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस  झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पिक घेतले. विहिरी व कुपनलिकेचे अपुरे पाणी असले तरी वळीव पावसाच्या जोरावर ऊस पिक चांगले आले होते. यावर्षी मात्र वळीव पावसाने पाठ फिरवल्याने ऊसकरी शेतकरी त्रस्त झाले आहेत. चार दिवस दिवसपाळी व तीन दिवस रात्रपाळी असा शेतीसाठीचा वीजपुरवठा असल्याने ऊसाला पाणी देण्यात देखील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. कुपनलिकेतील पाण्याची पातळीही उष्णतेने खाली जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीला भेगा पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण पिकाला पाणी देणे अशक्य होऊन बसले आहे. शेतकरी वळीव पाऊस कधी पडेल याकडे डोळे लावून बसले आहेत. सायंकाळी ढगाळ वातावरण होते. काही वेळेला विजांचा कडकडाट होतो. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. परिणामी यावर्षी उत्तूर  परिसरातील ऊस उत्पादन घटल्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

सूर्यकिरणांची तीव्रता वाढलेल्या उष्णतेमुळे ऊस पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. वळीव पाऊस नसल्याने उसाने काही ठिकाणी मान टाकली आहे. शेजारच्या उपनलिकेचे पाणी उसणवारीने घेऊन पीक जगवण्याची धडपड सुरू आहे. - सुरेश कुंभार- शेतकरी 

आजरा, गडहिंग्लज व गारगोटी अशा उत्तुरच्या सभोवतीच्या गावात वळीव पाऊस झाला. मात्र उत्तुरला अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऊस पिक वाचवणे जिकरीचे झाले आहे. अजूनही पावसाला दीड दोन महिने असल्याने ऊस पीकासाठी पाणी कुठून आणणार अशी अडचण आहे. - आयेशा ढालाईत  - शेतकरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी