शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

मागणीअभावी राज्यातील साखर कारखानदारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चालू हंगामातील पहिल्या पाच महिन्यांत कारखान्यांना मिळालेल्या कोट्यापैकी ६७ टक्के साखर विकली गेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चालू हंगामातील पहिल्या पाच महिन्यांत कारखान्यांना मिळालेल्या कोट्यापैकी ६७ टक्के साखर विकली गेली आहे. ३३ टक्के साखर शिल्लक आहे. किमान विक्री दराने उत्तर प्रदेशातील उच्च प्रतीची साखर मिळत असल्याने महाराष्ट्रातील साखरेकडे व्यापारी पाठ फिरवत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आर्थिक संकटात सापडली आहे.

देशात दरमहा सरासरी २१ लाख टन साखर खपते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी दरमहा साखरेचा कोटा निश्चित करून दिला जातो. गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्राच्या वाट्याला सुमारे ३२ लाख टन साखर विक्रीसाठी आली होती. त्यातील केवळ २१ लाख ६६ हजार टन साखर विकली गेली आहे. हे प्रमाण एकूण कोट्याच्या ६७ टक्के आहे. उत्तर प्रदेशात एम ग्रेड साखर ३१ रुपयांच्या आसपास मिळते. ती उच्च प्रतीची असते. महाराष्ट्रात प्रामुख्याने एस ग्रेडची साखर उत्पादित होते. किमान विक्री दराने एम ग्रेड मिळत असताना एस ग्रेड कशाला घ्या, अशी व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. शिवाय साखरेची मागणी उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील राज्यांकडून प्रामुख्याने असते. उत्तर प्रदेशातील साखर वाहतुकीच्या दृष्टीने त्यांना स्वस्त पडते, हेही एक कारण महाराष्ट्रातील साखरेची मागणी कमी होण्यामागे आहे.

कोट

महाराष्ट्रातील कारखान्यांने उत्पादित साखरेवर राज्य बँकेकडून ८५ टक्के उचल घेऊन एफआरपी आणि इतर खर्च भागवीत असतात. साखर विकलीच नाही तर त्या उचलीवर त्यांना व्याज द्यावे लागते. वर्षाला क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपये हा बोजा पडतो. त्यामुळे कारखानदारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. निर्यात वाढविणे, ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवून साखरेचे उत्पादन कमी करणे हाच यावरील उपाय आहे.

- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ

चौकट

महाराष्ट्रात १०० टनांवर उत्पादन

चालू हंगामात महाराष्ट्रात साखरेचे १०४ लाख टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. आतापर्यंत ९६ लाख टनांच्या आसपास उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात मात्र आतापर्यंत ८९ लाख टनांच्या आसपास उत्पादन झाले आहे. ते हंगामाअखेरपर्यंत १०५ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे.