शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

मागणीअभावी राज्यातील साखर कारखानदारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चालू हंगामातील पहिल्या पाच महिन्यांत कारखान्यांना मिळालेल्या कोट्यापैकी ६७ टक्के साखर विकली गेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चालू हंगामातील पहिल्या पाच महिन्यांत कारखान्यांना मिळालेल्या कोट्यापैकी ६७ टक्के साखर विकली गेली आहे. ३३ टक्के साखर शिल्लक आहे. किमान विक्री दराने उत्तर प्रदेशातील उच्च प्रतीची साखर मिळत असल्याने महाराष्ट्रातील साखरेकडे व्यापारी पाठ फिरवत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आर्थिक संकटात सापडली आहे.

देशात दरमहा सरासरी २१ लाख टन साखर खपते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी दरमहा साखरेचा कोटा निश्चित करून दिला जातो. गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्राच्या वाट्याला सुमारे ३२ लाख टन साखर विक्रीसाठी आली होती. त्यातील केवळ २१ लाख ६६ हजार टन साखर विकली गेली आहे. हे प्रमाण एकूण कोट्याच्या ६७ टक्के आहे. उत्तर प्रदेशात एम ग्रेड साखर ३१ रुपयांच्या आसपास मिळते. ती उच्च प्रतीची असते. महाराष्ट्रात प्रामुख्याने एस ग्रेडची साखर उत्पादित होते. किमान विक्री दराने एम ग्रेड मिळत असताना एस ग्रेड कशाला घ्या, अशी व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. शिवाय साखरेची मागणी उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील राज्यांकडून प्रामुख्याने असते. उत्तर प्रदेशातील साखर वाहतुकीच्या दृष्टीने त्यांना स्वस्त पडते, हेही एक कारण महाराष्ट्रातील साखरेची मागणी कमी होण्यामागे आहे.

कोट

महाराष्ट्रातील कारखान्यांने उत्पादित साखरेवर राज्य बँकेकडून ८५ टक्के उचल घेऊन एफआरपी आणि इतर खर्च भागवीत असतात. साखर विकलीच नाही तर त्या उचलीवर त्यांना व्याज द्यावे लागते. वर्षाला क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपये हा बोजा पडतो. त्यामुळे कारखानदारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. निर्यात वाढविणे, ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवून साखरेचे उत्पादन कमी करणे हाच यावरील उपाय आहे.

- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ

चौकट

महाराष्ट्रात १०० टनांवर उत्पादन

चालू हंगामात महाराष्ट्रात साखरेचे १०४ लाख टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. आतापर्यंत ९६ लाख टनांच्या आसपास उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात मात्र आतापर्यंत ८९ लाख टनांच्या आसपास उत्पादन झाले आहे. ते हंगामाअखेरपर्यंत १०५ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे.