शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

दुपारी अक्षताचा मुहूर्त... पै-पाहुणेही जमले, तोपर्यंत कळालं मुलगी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 17:38 IST

नवरी मुलीस चुडा भरला होता... नवऱ्या मुलाच्या दारात मुहूर्तमेढ सजली होती... सोमवारी रात्री नऊ वाजता साखरपुडा करून घेतला... मंगळवारी दुपारी १ वाजता अक्षताचा मुहूर्त... पै-पाहुणेही जमलेले... तोपर्यंत

कोल्हापूर : नवरी मुलीस चुडा भरला होता... नवऱ्या मुलाच्या दारात मुहूर्तमेढ सजली होती... सोमवारी रात्री नऊ वाजता साखरपुडा करून घेतला... मंगळवारी दुपारी १ वाजता अक्षताचा मुहूर्त... पै-पाहुणेही जमलेले... तोपर्यंत मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस पाटील उमेश नांगरे यांना मिळाली व वडणगे (ता. करवीर) येथे होणारा बालविवाह रोखण्यात येथील अवनि संस्थेला यश आले. महानायक अमिताभ बच्चन यांंच्या सहकार्याने सुरु असलेल्या जागर प्रकल्पांतर्गत ही कारवाई करण्यात आली. प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील व ग्रामविकास अधिकारी प्रकाश बागुल यांनी ही माहिती दिली.

असा विवाह होणार असल्याची माहिती पोलीसपाटील यांना पहाटे सहा वाजता समजली. त्यांनी अवनि संस्थेला त्याबाबत कळविले. त्यानुसार अवनिच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड. दिलशाद मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीच्या घरी भेट देण्यात आली. मुलीचे वय १५ वर्षे ३ महिने व २९ दिवस होते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. मुलीचे गावातील एका २४ वर्षाच्या मुलावर प्रेम आहे. म्हणून मुलीच्या संमतीनेच दुपारी एक वाजता लग्न होणार होते. भटजीसह अक्षताही तयार होत्या.परंतु संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही कुटुंबातील लोकांना या गंभीर गुन्ह्याबद्दल माहिती दिली. आता तुम्ही लग्नात विघ्न आणू नका... आम्ही अक्षता टाकून घेतो व मुलगी सज्ञान होईपर्यंत माहेरीच ठेवतो, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु अवनिच्या कार्यकर्त्यांनी ते धुडकावून लावले. मुलीसह दोन्ही कुटुंबातील प्रमुखांना दुपारी तीन वाजता बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. तिथे त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून मुलगी सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लेखी बंधपत्र घेतले. तसा प्रकार घडल्यास रितसर गुन्हा नोंद केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली. या मोहिमेत गावचे पोलीसपाटील यांच्यासह सिध्दांत घोरपडे, चाईल्ड लाईन हेल्पलाईन व करवीर पोलिसांची मदत झाली.

संवेदनशील गाव तरीही...

कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले वडणगे हे गाव राजकीय - सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. तरीही मागील वर्षात गावातील तीन बालविवाह रोखण्यात आले आहेत. बालविवाह करू नयेत, यासाठी प्रबोधनात्मक चार कार्यक्रम अवनि संस्थेने घेतले. पथनाट्य करूनही लोकांत जागृती करण्याचा प्रयत्न केला, तरीही पुन्हा बालविवाहाचा प्रयत्न झाला. अशा कृत्यांना आता गावानेच पायबंद घालण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न