शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पुराचे पाणी इचलकरंजीला देण्याबाबत अभ्यास करा, मुख्यमंत्र्यांनी नवीन चार पर्याय सुचवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:53 IST

पुन्हा नव्या योजनेचे गाजर

इचलकरंजी : वाहून जाणारे पुराचे पाणी साठवून इचलकरंजी शहराला देता येईल का, याचा अभ्यास करून अहवाल सादर करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले. इचलकरंजी सुळकूड पाणी योजनेसंदर्भात शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नवीन चार पर्याय सुचविल्यामुळे सुळकूड योजना कायमस्वरूपी रद्द झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा नव्या योजनेची वाट पाहावी लागणार आहे.आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीनुसार मुंबई मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत म्हैशाळ बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करणे. दूधगंगा कॅनॉलमधून रेंदाळ येथील खणीमध्ये पाण्याची साठवण करणे. तसेच दूधगंगा कॅनॉलवरील पाझर तलावाचा स्त्रोत म्हणून उपयोग करणे, याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, सध्या जागतिक बॅँकेच्या सहकार्याने राज्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी स्ट्रक्चर उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.इचलकरंजीसाठीही असा प्रकल्प उभारता येईल का, याचा विचार करावा, असे सांगितले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हैशाळ बंधाऱ्यातून किंवा शिरटी योजनेतून शाश्वत व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या.

दूधगंगा कॅनॉलमधून येणारे पाणी रेंदाळ गावाजवळील खणीमध्ये साठवून वापरता येईल, असे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सुचविले. तर दूधगंगा कॅनॉलची दुरुस्ती व अस्तरीकरण करून तसेच कॅनॉलऐवजी बंद पाइपलाइनमधून पाणीपुरवठा करण्याचा पर्याय सुचविला. आमदार आवाडे यांनी सुचविलेल्या पर्यायावर पाटबंधारे विभागाने ८४ किलोमीटर कॅनॉलपैकी ६८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. येथे पाणी आणल्यास कॅनॉलला लायनिंग करणे आवश्यक आहे. बाष्पीभवन व वहनामध्ये पाणी वाया जाणार आहे. कॅनॉल पूर्णपणे अस्तरीकरण करावे लागेल, अशी टिप्पणी केली. तसेच कृष्णा नदीवरील मजरेवाडी उद्भव योजनेचे बळकटीकरण करण्यासंदर्भातही चर्चा झाली. यासंदर्भात पुढील बैठक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे ठरले.

खासदार धैर्यशील माने यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला. या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, असिमकुमार गुप्ता, प्रधान सचिव के.एच.गोविंदराज, अपर सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त पल्लवी पाटील, जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता वैशाली आवटी, अधीक्षक अभियंता प्रवीण पाटील, महापालिकेचे अभय शिरोलीकर, बाजीराव कांबळे आदी उपस्थित होते.

‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तबसुळकूड योजनेचा विषय संपला, अशा आशयाचे वृत्त २ मार्च २०२५ ला ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर यावर बरीचशी चर्चा झाली. शुक्रवारी सुळकूड योजनेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी झालेल्या बैठकीत सुळकूडचा नामोल्लेखही झाला नाही. अन्य पर्यायांचा विचार सुचवून सुळकूडचा विषय संपविला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस