शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

पारदर्शकता नसेल तर ‘नेट’ परीक्षा घेताच कशाला?, विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 16:05 IST

परीक्षा रद्द केल्याने प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय

कोल्हापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा बुधवारी रद्द करण्यात आली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला. एकतर ‘नीट’चा घोळ अद्याप सुरूच असताना आता ‘ने”मध्येही गैरप्रकार आढळून आल्याने विद्यार्थी कमालीचे नाराज झाले. परीक्षांमध्ये पारदर्शकता ठेवता येत नसेल तर अशा परीक्षा घेताच कशाला? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) मंगळवारी (दि. १८) यूजीसी नेट परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी नेट परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना शंभर शंभर कि.मी. दूर परीक्षा केंद्र मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. परिणामी, जिल्ह्यात ८५५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल सायबर सिक्युरिटीकडून देण्यात आल्याने खळबळ उडाली.‘यूजीसी’ने याची दखल घेत परीक्षाच रद्द केली. मात्र, प्रामाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. नेटसाठी वर्ष-वर्ष तयारी करून अनेक विद्यार्थी परीक्षा देत असतात. मात्र, यात पारदर्शकता नसेल तर आम्ही परीक्षा द्यायच्याच कशासाठी? असा सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक हाेण्यासाठी ‘नेट’ अनिवार्य आहे. शिवाय, पीएच.डी.साठी प्रवेश मिळवण्यासाठी ‘नेट’ची गरज भासते.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाच चुकीच्याया परीक्षेत हिंदी विषयाच्या विद्यार्थ्याला उर्दूची प्रश्नपत्रिका, तर इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेऐवजी इंग्रजीची प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर हा प्रकार घडल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी थेट ‘यूजीसी’कडे मेलद्वारे तक्रार केली आहे.

नेट परीक्षेचे व्यवस्थापन नीट करता येत नसेल तर परीक्षा घेता कशाला? परीक्षेचे सेंटर ८०-८० किलोमीटर दूर असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे टाळले. दोन सत्रांत परीक्षा, त्यात केंद्र दूर यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. - डॉ. प्रवीण कोडोलीकर, परीक्षार्थी, कोल्हापूर. 

खूप मेहनत करून अनेक विद्यार्थी ‘नेट’ची परीक्षा देत असतात. मात्र, गैरप्रकारामुळे या परीक्षेबद्दलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी परीक्षा पूर्णत: पारदर्शकपणे घ्यावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. - प्रा. डॉ. आर. एल. निर्मळे-चौगुले, प्राचार्य, अशोकराव माने बी.एड.कॉलेज, पेठवडगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाStudentविद्यार्थी