शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पारदर्शकता नसेल तर ‘नेट’ परीक्षा घेताच कशाला?, विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 16:05 IST

परीक्षा रद्द केल्याने प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय

कोल्हापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा बुधवारी रद्द करण्यात आली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला. एकतर ‘नीट’चा घोळ अद्याप सुरूच असताना आता ‘ने”मध्येही गैरप्रकार आढळून आल्याने विद्यार्थी कमालीचे नाराज झाले. परीक्षांमध्ये पारदर्शकता ठेवता येत नसेल तर अशा परीक्षा घेताच कशाला? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) मंगळवारी (दि. १८) यूजीसी नेट परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी नेट परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना शंभर शंभर कि.मी. दूर परीक्षा केंद्र मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. परिणामी, जिल्ह्यात ८५५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल सायबर सिक्युरिटीकडून देण्यात आल्याने खळबळ उडाली.‘यूजीसी’ने याची दखल घेत परीक्षाच रद्द केली. मात्र, प्रामाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. नेटसाठी वर्ष-वर्ष तयारी करून अनेक विद्यार्थी परीक्षा देत असतात. मात्र, यात पारदर्शकता नसेल तर आम्ही परीक्षा द्यायच्याच कशासाठी? असा सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक हाेण्यासाठी ‘नेट’ अनिवार्य आहे. शिवाय, पीएच.डी.साठी प्रवेश मिळवण्यासाठी ‘नेट’ची गरज भासते.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाच चुकीच्याया परीक्षेत हिंदी विषयाच्या विद्यार्थ्याला उर्दूची प्रश्नपत्रिका, तर इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेऐवजी इंग्रजीची प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर हा प्रकार घडल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी थेट ‘यूजीसी’कडे मेलद्वारे तक्रार केली आहे.

नेट परीक्षेचे व्यवस्थापन नीट करता येत नसेल तर परीक्षा घेता कशाला? परीक्षेचे सेंटर ८०-८० किलोमीटर दूर असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे टाळले. दोन सत्रांत परीक्षा, त्यात केंद्र दूर यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. - डॉ. प्रवीण कोडोलीकर, परीक्षार्थी, कोल्हापूर. 

खूप मेहनत करून अनेक विद्यार्थी ‘नेट’ची परीक्षा देत असतात. मात्र, गैरप्रकारामुळे या परीक्षेबद्दलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी परीक्षा पूर्णत: पारदर्शकपणे घ्यावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. - प्रा. डॉ. आर. एल. निर्मळे-चौगुले, प्राचार्य, अशोकराव माने बी.एड.कॉलेज, पेठवडगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाStudentविद्यार्थी