दोन रुपये जादा देण्यासाठीच हा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:49+5:302021-04-27T04:25:49+5:30
चंदगड : चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांत म्हशीचे दूध ७० टक्के आहे. या दुधावरच ‘गोकुळ’चा ब्रँड निर्माण ...

दोन रुपये जादा देण्यासाठीच हा संघर्ष
चंदगड :
चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांत म्हशीचे दूध ७० टक्के आहे. या दुधावरच ‘गोकुळ’चा ब्रँड निर्माण झाला आहे. त्यामुळे मी सहा संचालक पद मागितली होती. त्यात मला यश मिळाले नाही. शेतकरी उत्पादकांना दोन रुपये जास्त मिळावे यासाठी ही लढाई आहे. पॅनल टू पॅनल मतदान करा, असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले.
यशवंतनगर (ता. चंदगड) येथे गोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित ठरावदारांच्या बैठकीत ते बोलत होते. चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर यांनी स्वागत केले. शिवानंद हुंबरवाडी यांनी प्रास्ताविक केले.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेतकरी उत्पादकांना दोन रुपये जादा मिळवून देण्यासाठी हा संघर्ष असून यावेळी ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन निश्चित आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेली २०-२५ वर्षे सत्ताधाऱ्यांचा कारभार बघितलाय. आता आम्हाला ५ वर्षे सत्ता द्या, आम्ही दोन रुपये नक्की वाढवून देऊ. गेली २५ वर्षे ‘गोकुळ’साठी संघर्ष करत आलो आहे. सत्ताधाऱ्यांनी दुधाची बिले दिली म्हणजे उपकार केले नाहीत. खासदार संजय मंडलिक म्हणाले, सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी एक चांगल पॅनल आम्ही उभे केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारामध्ये परिवर्तन करण्यासाठी ही निवडणूक आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या मंडळींनी पाठिंबा दिल्याने विजय निश्चित झाला आहे. अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सुस्मिता पाटील, विद्याधर गुरबे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, विक्रम चव्हाण-पाटील, संग्रामसिंह नलवडे, एम. जे. पाटील, भरमाना गावडा, विशाल पाटील, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, अरुण सुतार, पं. स. दयानंद काणेकर, बाळासाहेब बांदिवडेकर, विलास पाटील, शिवाजी सावंत यांच्यासह ठरावदार उपस्थित होते. एम. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भिकू गावडे यांनी आभार मानले.
------------------------
--
सर्वात चांगल्या दर्जाचे दूध असेल तर ते चंदगडचे. मात्र, तरीही चंदगडवरच अन्याय झाला आहे. दरम्यान, माघार घेतलेले सगळे गेले. मात्र आम्ही मात्र पाठीशी राहिलो. जिथे जाईल तिथे आमची गळचेपी झाली. आम्ही आता किती अन्याय सहन करायचा असा प्रश्न भाजपमधून कॉग्रेस मध्ये प्रवेश केलेले दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी उपस्थित केला.
-
* फोटो ओळी : यशवंतनगर (ता. चंदगड) येथे गोकुळ निवडणुकीच्या प्रचारार्थ मेळाव्यात आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
क्रमांक : २६०४२०२१-गड-०८