शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

ऊसशेती तांबेऱ्याच्या विळख्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:17 IST

श्रीकांत ºहायकर।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : संपूर्ण राधानगरी तालुक्यासह, करवीर तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीमधील उभे ऊसपीक बºयाच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊसपिकावर पडलेला तांबेरा कसा आटोक्यात आणयचा या प्रश्नाने शेतकºयांना ग्रासले आहे. ऊस शेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली असल्याचे यावर्षी ऊस उत्पादनात ...

श्रीकांत ºहायकर।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : संपूर्ण राधानगरी तालुक्यासह, करवीर तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीमधील उभे ऊसपीक बºयाच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊसपिकावर पडलेला तांबेरा कसा आटोक्यात आणयचा या प्रश्नाने शेतकºयांना ग्रासले आहे. ऊस शेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली असल्याचे यावर्षी ऊस उत्पादनात २० टक्के घट येईल, असा शेतीतज्ज्ञांचा अंदाज आहे. परिणामी पुन्हा एकदा शेतकरीच निसर्गाच्या अस्मानी संकटात सापडला आहे .ऊसपीक हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शेतीपीक म्हणून ओळखले जाते. कारण जिल्ह्याच्या कानाकोपºयांत ऊसपिकाची लागवड झालेली दिसते. त्यामुळे बहुतांशी शेतकºयाचे जीवनमान हे ऊसशेतीवर अवलंबून आहे; पण असे असले तरी कमी खर्चाची, कमी कष्टाची शेती म्हणजे ऊसशेती ही ओळख आता ऊस शेतकºयांसाठी कालबाह्य ठरली आहे. नवनवीन प्रयोग राबवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे पण वेळोवेळी शेतीवर कोसणाºया अस्मानी संकटाने शेतकरी खचला जात आहे. यावर्षी तर ऊस शेतीवर एक भले मोठे संकटच कोसळले आहे. संपूर्ण ऊसशेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली आहे. उत्पादन घटीबरोबरच जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उसाचा हिरवा पाला हा शेतकºयांच्या पाळीव दुभत्या प्राण्यांना वैरण म्हणून उपयोगी होतो पण हा पाला कुजल्याने शेतकरी अडचणीत आहे.उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग हा बुरशीमुळे होत असतो. उसाच्या पानावर सुरवातीला तांबडे टिपके पडतात नंतर सदर टिपक्यांचा आकार वाढत जातो उसाच्या पानांचा भुगा झालेला आढळतो. ऊसपिकाची पाने तांबडी पडून पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी पानेच खराब झाल्याने ऊसरोपांतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया खंडित होण्याच्या मार्गावर असते. त्याचा फटका ऊस धाटाची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांना तांबेरा रोगाच्या सुलतानी संकटाने ग्रासले आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण ऊसशेतीचा प्लॉट खराब झालेले पाहण्यास मिळत आहेत. तांबेरा रोगावर सद्य:स्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात या विवंचनेत शेतकरी असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.सततचा रासायनिक खतांचा वापर, नवीन संकरित ऊस जाती, उसाच्या सरीतील अंतर कमी, युरिया खतांचा अधिक वापर यामुळे ऊस पिकावर तांबेरा रोग पडला आहे. सद्य:स्थितीत तांबेरा कमी होण्यासाठी पावसाची उघडीप व औषध फवारणी आहे; पण असे असले तरी उसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने औषध फवारणी कशी व कोठे-कोठे करायची हे मोठे आव्हान शेतकºयांच्या समोर आहे पण तरीही औषध फवारणी करावयाची झाल्यास डायथेन, क्लीक्झिन अशा फवारण्या केल्या नंतर तांबेरा काही प्रमाणात नियंत्रणात आणता येतो, असे शेतीतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.