शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

ऊसशेती तांबेऱ्याच्या विळख्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:17 IST

श्रीकांत ºहायकर।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : संपूर्ण राधानगरी तालुक्यासह, करवीर तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीमधील उभे ऊसपीक बºयाच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊसपिकावर पडलेला तांबेरा कसा आटोक्यात आणयचा या प्रश्नाने शेतकºयांना ग्रासले आहे. ऊस शेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली असल्याचे यावर्षी ऊस उत्पादनात ...

श्रीकांत ºहायकर।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : संपूर्ण राधानगरी तालुक्यासह, करवीर तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीमधील उभे ऊसपीक बºयाच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊसपिकावर पडलेला तांबेरा कसा आटोक्यात आणयचा या प्रश्नाने शेतकºयांना ग्रासले आहे. ऊस शेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली असल्याचे यावर्षी ऊस उत्पादनात २० टक्के घट येईल, असा शेतीतज्ज्ञांचा अंदाज आहे. परिणामी पुन्हा एकदा शेतकरीच निसर्गाच्या अस्मानी संकटात सापडला आहे .ऊसपीक हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शेतीपीक म्हणून ओळखले जाते. कारण जिल्ह्याच्या कानाकोपºयांत ऊसपिकाची लागवड झालेली दिसते. त्यामुळे बहुतांशी शेतकºयाचे जीवनमान हे ऊसशेतीवर अवलंबून आहे; पण असे असले तरी कमी खर्चाची, कमी कष्टाची शेती म्हणजे ऊसशेती ही ओळख आता ऊस शेतकºयांसाठी कालबाह्य ठरली आहे. नवनवीन प्रयोग राबवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे पण वेळोवेळी शेतीवर कोसणाºया अस्मानी संकटाने शेतकरी खचला जात आहे. यावर्षी तर ऊस शेतीवर एक भले मोठे संकटच कोसळले आहे. संपूर्ण ऊसशेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली आहे. उत्पादन घटीबरोबरच जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उसाचा हिरवा पाला हा शेतकºयांच्या पाळीव दुभत्या प्राण्यांना वैरण म्हणून उपयोगी होतो पण हा पाला कुजल्याने शेतकरी अडचणीत आहे.उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग हा बुरशीमुळे होत असतो. उसाच्या पानावर सुरवातीला तांबडे टिपके पडतात नंतर सदर टिपक्यांचा आकार वाढत जातो उसाच्या पानांचा भुगा झालेला आढळतो. ऊसपिकाची पाने तांबडी पडून पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी पानेच खराब झाल्याने ऊसरोपांतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया खंडित होण्याच्या मार्गावर असते. त्याचा फटका ऊस धाटाची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांना तांबेरा रोगाच्या सुलतानी संकटाने ग्रासले आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण ऊसशेतीचा प्लॉट खराब झालेले पाहण्यास मिळत आहेत. तांबेरा रोगावर सद्य:स्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात या विवंचनेत शेतकरी असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.सततचा रासायनिक खतांचा वापर, नवीन संकरित ऊस जाती, उसाच्या सरीतील अंतर कमी, युरिया खतांचा अधिक वापर यामुळे ऊस पिकावर तांबेरा रोग पडला आहे. सद्य:स्थितीत तांबेरा कमी होण्यासाठी पावसाची उघडीप व औषध फवारणी आहे; पण असे असले तरी उसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने औषध फवारणी कशी व कोठे-कोठे करायची हे मोठे आव्हान शेतकºयांच्या समोर आहे पण तरीही औषध फवारणी करावयाची झाल्यास डायथेन, क्लीक्झिन अशा फवारण्या केल्या नंतर तांबेरा काही प्रमाणात नियंत्रणात आणता येतो, असे शेतीतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.