शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

कोल्हापूर-बेंगळुरु महामार्गावरील टोलवसुली बंद करा, चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:08 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवारी विधानसभा अधिवेशनात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या सहापदरीकरण कामाचा मुद्दा उचलून धरला. कामे अपूर्ण आणि असुविधापूर्ण सेवारस्ते यामुळे टोलवसुलीच बंद करण्याची मागणी त्यांनी केली. ‘लोकमत’ने तीन दिवसांची मालिका लिहून या रेंगाळलेल्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.ते म्हणाले पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे सहापदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे. परिणामी पुणे ते कोल्हापूर प्रवासाला सहा तास लागत आहेत. याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. काम सुरू असल्याने नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधा या मार्गावर उपलब्ध केल्या जात नाहीत. मग या मार्गावर टोलवसुली का केली जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्याचप्रमाणे रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादनासाठी पूर्वी चारपट रक्कम दिली जात होती. मात्र, नव्या नियमानुसार आता शेतकऱ्यांना फक्त दुप्पट रक्कम दिली जात आहे, हे थांबवून पूर्वीप्रमाणे चारपट रक्कम द्यावी, याच मार्गावर केर्ले-पडळवाडी रस्ता सोडून होणाऱ्या बायपासला निधी मिळावा, कोल्हापूर येथे प्रस्तावित खंडपीठाचा विषय तत्काळ मार्गी लावून पाच जिल्ह्यांतील नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या जमिनी सुपीक आहेत. त्यामुळे तुटपुंज्या नुकसानभरपाईवर या जमिनी अधिग्रहित करणे अवघड जाईल, कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागासाठी निर्माण केलेल्या नागरी विकास प्राधिकरणाला निधी दिला गेला नाही, यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावून या प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करावी, अशा मागण्या नरके यांनी केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका