शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

कोल्हापूर-बेंगळुरु महामार्गावरील टोलवसुली बंद करा, चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:08 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवारी विधानसभा अधिवेशनात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या सहापदरीकरण कामाचा मुद्दा उचलून धरला. कामे अपूर्ण आणि असुविधापूर्ण सेवारस्ते यामुळे टोलवसुलीच बंद करण्याची मागणी त्यांनी केली. ‘लोकमत’ने तीन दिवसांची मालिका लिहून या रेंगाळलेल्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.ते म्हणाले पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे सहापदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे. परिणामी पुणे ते कोल्हापूर प्रवासाला सहा तास लागत आहेत. याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. काम सुरू असल्याने नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधा या मार्गावर उपलब्ध केल्या जात नाहीत. मग या मार्गावर टोलवसुली का केली जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्याचप्रमाणे रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादनासाठी पूर्वी चारपट रक्कम दिली जात होती. मात्र, नव्या नियमानुसार आता शेतकऱ्यांना फक्त दुप्पट रक्कम दिली जात आहे, हे थांबवून पूर्वीप्रमाणे चारपट रक्कम द्यावी, याच मार्गावर केर्ले-पडळवाडी रस्ता सोडून होणाऱ्या बायपासला निधी मिळावा, कोल्हापूर येथे प्रस्तावित खंडपीठाचा विषय तत्काळ मार्गी लावून पाच जिल्ह्यांतील नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या जमिनी सुपीक आहेत. त्यामुळे तुटपुंज्या नुकसानभरपाईवर या जमिनी अधिग्रहित करणे अवघड जाईल, कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागासाठी निर्माण केलेल्या नागरी विकास प्राधिकरणाला निधी दिला गेला नाही, यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावून या प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करावी, अशा मागण्या नरके यांनी केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका