शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

कोल्हापूर-बेंगळुरु महामार्गावरील टोलवसुली बंद करा, चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:08 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवारी विधानसभा अधिवेशनात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या सहापदरीकरण कामाचा मुद्दा उचलून धरला. कामे अपूर्ण आणि असुविधापूर्ण सेवारस्ते यामुळे टोलवसुलीच बंद करण्याची मागणी त्यांनी केली. ‘लोकमत’ने तीन दिवसांची मालिका लिहून या रेंगाळलेल्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.ते म्हणाले पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे सहापदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे. परिणामी पुणे ते कोल्हापूर प्रवासाला सहा तास लागत आहेत. याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. काम सुरू असल्याने नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधा या मार्गावर उपलब्ध केल्या जात नाहीत. मग या मार्गावर टोलवसुली का केली जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्याचप्रमाणे रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादनासाठी पूर्वी चारपट रक्कम दिली जात होती. मात्र, नव्या नियमानुसार आता शेतकऱ्यांना फक्त दुप्पट रक्कम दिली जात आहे, हे थांबवून पूर्वीप्रमाणे चारपट रक्कम द्यावी, याच मार्गावर केर्ले-पडळवाडी रस्ता सोडून होणाऱ्या बायपासला निधी मिळावा, कोल्हापूर येथे प्रस्तावित खंडपीठाचा विषय तत्काळ मार्गी लावून पाच जिल्ह्यांतील नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या जमिनी सुपीक आहेत. त्यामुळे तुटपुंज्या नुकसानभरपाईवर या जमिनी अधिग्रहित करणे अवघड जाईल, कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागासाठी निर्माण केलेल्या नागरी विकास प्राधिकरणाला निधी दिला गेला नाही, यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावून या प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करावी, अशा मागण्या नरके यांनी केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका