शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

कोल्हापूर-बेंगळुरु महामार्गावरील टोलवसुली बंद करा, चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:08 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवारी विधानसभा अधिवेशनात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या सहापदरीकरण कामाचा मुद्दा उचलून धरला. कामे अपूर्ण आणि असुविधापूर्ण सेवारस्ते यामुळे टोलवसुलीच बंद करण्याची मागणी त्यांनी केली. ‘लोकमत’ने तीन दिवसांची मालिका लिहून या रेंगाळलेल्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.ते म्हणाले पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे सहापदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे. परिणामी पुणे ते कोल्हापूर प्रवासाला सहा तास लागत आहेत. याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. काम सुरू असल्याने नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधा या मार्गावर उपलब्ध केल्या जात नाहीत. मग या मार्गावर टोलवसुली का केली जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्याचप्रमाणे रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादनासाठी पूर्वी चारपट रक्कम दिली जात होती. मात्र, नव्या नियमानुसार आता शेतकऱ्यांना फक्त दुप्पट रक्कम दिली जात आहे, हे थांबवून पूर्वीप्रमाणे चारपट रक्कम द्यावी, याच मार्गावर केर्ले-पडळवाडी रस्ता सोडून होणाऱ्या बायपासला निधी मिळावा, कोल्हापूर येथे प्रस्तावित खंडपीठाचा विषय तत्काळ मार्गी लावून पाच जिल्ह्यांतील नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या जमिनी सुपीक आहेत. त्यामुळे तुटपुंज्या नुकसानभरपाईवर या जमिनी अधिग्रहित करणे अवघड जाईल, कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागासाठी निर्माण केलेल्या नागरी विकास प्राधिकरणाला निधी दिला गेला नाही, यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावून या प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करावी, अशा मागण्या नरके यांनी केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका