शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

चोरीचा आठ कोटींचा मुद्देमाल परत, कोल्हापूर पोलिस राज्यात आघाडीवर असल्याचा पोलिस अधीक्षकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 15:29 IST

गुन्ह्यांची उकल करण्यासह चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लक्षणीय कामगिरी केली.

कोल्हापूर : गेल्या वर्षभरात चोरट्यांनी घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांमधून कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. चोरीच्या १७७९ गुन्ह्यांपैकी ४८४ घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यातील आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाला. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी असले तरी, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवण्यात कोल्हापूरपोलिस राज्यात आघाडीवर असल्याचा दावा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केला आहे.जिल्ह्यात घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षी कमालीची वाढ झाली. सन २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये घरफोडीचे गुन्हे ३१ टक्क्यांनी वाढले, तर वाहन चोरीचे गुन्हे ३८ टक्क्यांनी वाढले. या गुन्ह्यांमधून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने आणि किमती वस्तू असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास झाला. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळणार का? याची चिंता नागरिकांना असतेच. मात्र, गेल्या वर्षभरात पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आणि न्यायालयाच्या आदेशाने तो मूळ मालकांना परत केला. यामुळे चोरीची नोंद केलेल्या फिर्यादींना काहीसा दिलासा मिळाला.

दीड कोटींचे दागिने परतजिल्ह्यातील पोलिस ठाण्यांनी १५६ घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करून चोरट्यांकडून सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत केले. तसेच २७ लाखांची रोख रक्कमही परत मिळवली. न्यायालयाच्या आदेशानुसार रोख रकमेसह सुमारे दीड कोटी रुपयांचे दागिने मूळ मालकांना परत करण्यात आले.

४२ लाखांचे मोबाइल मिळालेगेल्या वर्षभरात चोरीचे मोबाइल शोधण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्या पथकाद्वारे ४२ लाख रुपये किमतीचे ४०० पेक्षा जास्त मोबाइल शोधण्यात आले. सर्व मोबाइल मूळ मालकांना परत केले आहेत.

१९० वाहने मिळालीगतवर्षी जिल्ह्यातून ८८३ वाहनांची चोरी झाली. त्यापैकी १९० वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. अंदाजे दोन कोटी रुपये किमतीची वाहने मूळ मालकांना परत केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

एलसीबीची आघाडीगुन्ह्यांची उकल करण्यासह चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लक्षणीय कामगिरी केली. गेल्या वर्षभरात एलसीबीने चोरी आणि घरफोडीचे ७७ गुन्हे उघडकीस आणून एक कोटी ४४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वाहन चोरीच्या ७८ गुन्ह्यांची उकल करून ती वाहने मूळ मालकांना परत केली.

चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाला तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतो. त्या अनुषंगाने गुन्ह्यांची उकल वाढवण्यासह चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करून कोल्हापूर पोलिसांनी राज्यात लक्षणीय कामगिरी केली. - शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस