शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

चोरीचा आठ कोटींचा मुद्देमाल परत, कोल्हापूर पोलिस राज्यात आघाडीवर असल्याचा पोलिस अधीक्षकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 15:29 IST

गुन्ह्यांची उकल करण्यासह चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लक्षणीय कामगिरी केली.

कोल्हापूर : गेल्या वर्षभरात चोरट्यांनी घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांमधून कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. चोरीच्या १७७९ गुन्ह्यांपैकी ४८४ घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यातील आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाला. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी असले तरी, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवण्यात कोल्हापूरपोलिस राज्यात आघाडीवर असल्याचा दावा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केला आहे.जिल्ह्यात घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षी कमालीची वाढ झाली. सन २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये घरफोडीचे गुन्हे ३१ टक्क्यांनी वाढले, तर वाहन चोरीचे गुन्हे ३८ टक्क्यांनी वाढले. या गुन्ह्यांमधून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने आणि किमती वस्तू असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास झाला. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळणार का? याची चिंता नागरिकांना असतेच. मात्र, गेल्या वर्षभरात पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आणि न्यायालयाच्या आदेशाने तो मूळ मालकांना परत केला. यामुळे चोरीची नोंद केलेल्या फिर्यादींना काहीसा दिलासा मिळाला.

दीड कोटींचे दागिने परतजिल्ह्यातील पोलिस ठाण्यांनी १५६ घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करून चोरट्यांकडून सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत केले. तसेच २७ लाखांची रोख रक्कमही परत मिळवली. न्यायालयाच्या आदेशानुसार रोख रकमेसह सुमारे दीड कोटी रुपयांचे दागिने मूळ मालकांना परत करण्यात आले.

४२ लाखांचे मोबाइल मिळालेगेल्या वर्षभरात चोरीचे मोबाइल शोधण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्या पथकाद्वारे ४२ लाख रुपये किमतीचे ४०० पेक्षा जास्त मोबाइल शोधण्यात आले. सर्व मोबाइल मूळ मालकांना परत केले आहेत.

१९० वाहने मिळालीगतवर्षी जिल्ह्यातून ८८३ वाहनांची चोरी झाली. त्यापैकी १९० वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. अंदाजे दोन कोटी रुपये किमतीची वाहने मूळ मालकांना परत केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

एलसीबीची आघाडीगुन्ह्यांची उकल करण्यासह चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लक्षणीय कामगिरी केली. गेल्या वर्षभरात एलसीबीने चोरी आणि घरफोडीचे ७७ गुन्हे उघडकीस आणून एक कोटी ४४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वाहन चोरीच्या ७८ गुन्ह्यांची उकल करून ती वाहने मूळ मालकांना परत केली.

चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाला तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतो. त्या अनुषंगाने गुन्ह्यांची उकल वाढवण्यासह चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करून कोल्हापूर पोलिसांनी राज्यात लक्षणीय कामगिरी केली. - शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस