शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची ओढ.. जीवाला घोर; कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप ३० टक्केच पेरणी, धरणात किती पाणीसाठा.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: June 19, 2024 13:44 IST

शहरात आज हलक्या सरी कोसळल्या, उद्या, गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाची शक्यता

कोल्हापूर : मान्सून वेळेवर सुरू झाल्याने आनंदित असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या चिंतेची झटा दिसत आहे. रोज उठले की पांढऱ्या आकाशाकडे पाहिले की रात्री झोप येत नाही. खरीप पिकांची उगवण झाली, पण जोरदार पाऊस नाही. जिल्ह्यात अद्याप १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर पैकी केवळ ५८ हजार ९४१ हेक्टरवर (३० टक्के) खरीपाची पेरणी झाली आहे.यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज हवामान विभाग गेली महिना-दीड महिना वर्तवत आहे. गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी मान्सूनकडे डोळे लावून बसला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनने वेळेवरच एंट्री घेतली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकरी काहीसा आनंदित होता. खरीप पूर्व मशागतीला वेग आला.त्यानंतरच्या चार-पाच दिवसात पाऊस राहिल्याने पेरण्या धुमधडाक्यात सुरू राहिल्या. मात्र, गेल्या आठवड्यापासून मान्सूनने काहीशी दडी मारली आहे. वळवासारखा पडेल त्या ठिकाणीच पडेल असा पाऊस हाेत आहे. भात, भुईमूग, सोयाबीनची उगवण झाली आहे, या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. मात्र, रोज उठले की पांढरे आकाश पहावयास मिळत आहेत.मंगळवारी सकाळी नऊपासूनच अंग भाजून काढणारे ऊन होते. साडेदहा वाजता तर अंगाकडून घामाच्या धारा वाहत होत्या. कमाल तापमान ३४ तर किमान २३ डिग्रीपर्यंत राहिल्याने वातावरणात कमालीचा उष्मा राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३० टक्के पेरणी झाली आहे.

गुरुवारपासून पावसाची शक्यताउद्या, गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर कमी अधिक राहण्याची शक्यता आहे.राधानगरी, काळम्मावाडी धरणात किती पाणीसाठा..कोल्हापूर शहराची तहान भागविणाऱ्या राधानगरीधरणात आज अखेर २.०० टी. एम.सी पाणी साठा उपलब्ध आहे. ८ टी. एम.सी.पाणी क्षमता असलेल्या राधानगरी धरणात सध्या ५६.६६ दलघमी पाणी साठा शिल्लक असून गतवर्षी याचा दिवसी धरणात ४८.०७  दलघमी म्हणजेच १.७० टी एम सी पाणी शिल्लक होते. धरणातून आजच्या घडीला ३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात चालू आहे. १ जून ते आज अखेर धरण क्षेत्रात २२३ मी. मि पावसाची नोंद झाली आहे. काळम्मावाडी धरणात अवघे ३.१४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. ८८. ८९ दलघमी पाणी साठा आहे. धरणात अवघे १२.३६ टक्के पाणी उपलब्ध आहे. तुळशी जलशयात १. २७ टी एम सी, ३५.९६ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे.

पीकनिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये अशी :पीक - एकूण पेरक्षेत्र - प्रत्यक्षात पेरणी - टक्केवारीभात - ९२ हजार ३२० - ३२ हजार ६०२ - ३५ज्वारी - ९३७ - १६५ - १७नागली - १७ हजार १०० - १ हजार ४४ - ६मका  - १३० - २८ - २१भुईमूग - ३५ हजार ३१२ - ९ हजार २२० - २६सोयाबीन - ४२ हजार २७४ - १५ हजार ७४० - ३७कडधान्य - ३ हजार ७९० - ११३ -  २

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणfarmingशेती