शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पावसाची ओढ.. जीवाला घोर; कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप ३० टक्केच पेरणी, धरणात किती पाणीसाठा.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: June 19, 2024 13:44 IST

शहरात आज हलक्या सरी कोसळल्या, उद्या, गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाची शक्यता

कोल्हापूर : मान्सून वेळेवर सुरू झाल्याने आनंदित असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या चिंतेची झटा दिसत आहे. रोज उठले की पांढऱ्या आकाशाकडे पाहिले की रात्री झोप येत नाही. खरीप पिकांची उगवण झाली, पण जोरदार पाऊस नाही. जिल्ह्यात अद्याप १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर पैकी केवळ ५८ हजार ९४१ हेक्टरवर (३० टक्के) खरीपाची पेरणी झाली आहे.यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज हवामान विभाग गेली महिना-दीड महिना वर्तवत आहे. गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी मान्सूनकडे डोळे लावून बसला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनने वेळेवरच एंट्री घेतली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकरी काहीसा आनंदित होता. खरीप पूर्व मशागतीला वेग आला.त्यानंतरच्या चार-पाच दिवसात पाऊस राहिल्याने पेरण्या धुमधडाक्यात सुरू राहिल्या. मात्र, गेल्या आठवड्यापासून मान्सूनने काहीशी दडी मारली आहे. वळवासारखा पडेल त्या ठिकाणीच पडेल असा पाऊस हाेत आहे. भात, भुईमूग, सोयाबीनची उगवण झाली आहे, या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. मात्र, रोज उठले की पांढरे आकाश पहावयास मिळत आहेत.मंगळवारी सकाळी नऊपासूनच अंग भाजून काढणारे ऊन होते. साडेदहा वाजता तर अंगाकडून घामाच्या धारा वाहत होत्या. कमाल तापमान ३४ तर किमान २३ डिग्रीपर्यंत राहिल्याने वातावरणात कमालीचा उष्मा राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३० टक्के पेरणी झाली आहे.

गुरुवारपासून पावसाची शक्यताउद्या, गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर कमी अधिक राहण्याची शक्यता आहे.राधानगरी, काळम्मावाडी धरणात किती पाणीसाठा..कोल्हापूर शहराची तहान भागविणाऱ्या राधानगरीधरणात आज अखेर २.०० टी. एम.सी पाणी साठा उपलब्ध आहे. ८ टी. एम.सी.पाणी क्षमता असलेल्या राधानगरी धरणात सध्या ५६.६६ दलघमी पाणी साठा शिल्लक असून गतवर्षी याचा दिवसी धरणात ४८.०७  दलघमी म्हणजेच १.७० टी एम सी पाणी शिल्लक होते. धरणातून आजच्या घडीला ३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात चालू आहे. १ जून ते आज अखेर धरण क्षेत्रात २२३ मी. मि पावसाची नोंद झाली आहे. काळम्मावाडी धरणात अवघे ३.१४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. ८८. ८९ दलघमी पाणी साठा आहे. धरणात अवघे १२.३६ टक्के पाणी उपलब्ध आहे. तुळशी जलशयात १. २७ टी एम सी, ३५.९६ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे.

पीकनिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये अशी :पीक - एकूण पेरक्षेत्र - प्रत्यक्षात पेरणी - टक्केवारीभात - ९२ हजार ३२० - ३२ हजार ६०२ - ३५ज्वारी - ९३७ - १६५ - १७नागली - १७ हजार १०० - १ हजार ४४ - ६मका  - १३० - २८ - २१भुईमूग - ३५ हजार ३१२ - ९ हजार २२० - २६सोयाबीन - ४२ हजार २७४ - १५ हजार ७४० - ३७कडधान्य - ३ हजार ७९० - ११३ -  २

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणfarmingशेती