शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

लमाण समाजाचे एक पाऊल पुढे; हुंडाबंदीचा निर्धार-: टोकाचा विरोध झुगारून चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:11 IST

नसिम सनदी । कोल्हापूर : लग्नासारख्या पवित्र बंधनासाठी कर्जबाजारी करणाऱ्या वर्षानुवर्षांच्या सामाजिक चालीरीती आणि परंपरांचे जोखड खाली उतरविण्यासाठी लमाण ...

ठळक मुद्देसुधारणेची कास ; कर्जाच्या खाईतून बाहेर येण्याचा प्रयत्न

नसिम सनदी ।कोल्हापूर : लग्नासारख्या पवित्र बंधनासाठी कर्जबाजारी करणाऱ्या वर्षानुवर्षांच्या सामाजिक चालीरीती आणि परंपरांचे जोखड खाली उतरविण्यासाठी लमाण समाज सज्ज झाला आहे. विशिष्ट प्रकारच्या कपड्यांचा हट्ट सोडल्यानंतर आता ‘हुंंडा देणार नाही, घेणारही नाही,’ असे ठणकावून सांगत त्यांनी सुधारणेच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले आहे.

मुकादमाच्या जीवावर पोटासाठी फिरता संसार थाटणाऱ्या या समाजाने हुंड्यासारख्या प्रथेला मूठमाती देण्याचा निर्धार करून अन्य भटक्या-विमुक्त समाजांसमोर आदर्श ठेवला आहे. कितीही कायदे झाले तरी चालीरीतींच्या आडून हुंड्याची प्रथा सुरूच आहे. हुंडा नाही म्हणून लग्न मोडलेली आणि लग्नच न झालेली उदाहरणे जागोजागी दृष्टीस पडतात. याला अपवाद तांड्यावर राहणारा भटका लमाण समाजही नाही. वर्षानुवर्षे बकाल आयुष्य जगणाºया या समाजाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर नाही, की हक्काचा रोजगार, ना स्वत:ची जमीन. मिळेल ते काम करून रोजची गुजराण करणाºया या समाजात हुंड्याने मात्र खोलवर हातपाय पसरले आहेत.

सोने, नाणे आणि रोख पैसा दिल्याशिवाय लग्नाची बोलणीच होत नाहीत. कमीत कमी चार ते पाच तोळे सोने, आणि रोख किमान लाखात रक्कम जातपंचायत ठरवूनच देते. श्रीमंत असो वा गरीब; मुलीच्या लग्नासाठी बापाला ५ ते १० लाख रुपये खर्च करावाच लागतो. रोजची खायची भ्रांत असणाºया या समाजात मग पैसे जमविण्यासाठी मुकादमाकडून अ‍ॅडव्हान्स घेतला जातो. लग्नानंतर त्याची परतफेड काम करून केली जाते. मुलीच्या बापाच्या वाट्याला आयुष्यभराचे कामच येते.

ही परिस्थिती पाहतच मोठे झालेल्या काहींनी सुधारणेची कास धरण्याचा निर्णय घेतला आणि सुरू झाला या समाजातील हुंडा या सर्वांत अनिष्ट प्रथा बंद पाडण्याचा उपक्रम. टोकाचा विरोध झाला; पण समाजाचे संत सेवालाल यांचीच शपथ घालून भावनिक साद घालत मन वळविण्यास सुरुवात झाली. याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे.शासकीय सुविधांपासून वंचितलमाण समाज हा मूळचा सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यातील. पिढ्यान्पिढ्या कष्टाची कामे करणारा हा समाज महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रभर स्थलांतरित झाला. विहीर खुदाई, रस्ते, गटारी, पाईपलाईन खुदाई, गवंडी, सेंट्रिंग अशी अंगमेहनतीची कामे करून या समाजात उदरनिर्वाह केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन पिढ्यांपासून लमाण समाज कायमस्वरूपी वस्ती करून राहत आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असतानाही जातीच्या दाखल्यापासून ते घरकुलापर्यंतची कोणतीही सुविधा त्यांना अजून नाही. 

माझ्या स्वत:च्या बहिणीचा संसार हुंड्यामुळे उद्ध्वस्त झाला. हुंड्याला नकार दिल्याने मुलगीचे लग्न लांबले. अखेर समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे हुंडा देऊन लग्न लावून दिले; पण मनाला कायम सल बोचत राहिली. यातूनच संघटना उभी राहिली. मराठा महासंघाच्या कार्याने प्रेरित होऊन समाजसुधारणेचा ध्यास घेतला. त्यातूनच हुंडाबंदीसारखा निर्णय पुढे आला. नशाबंदीचाही निर्णय घेतला.- रामचंद्र पोवार, लमाण संघटनेचे नेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूर