शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला खुळ्यात काढू नये; संभाजीराजे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:59 IST

आमची सहनशीलता पाहू नका; २५ ऑक्टोबरनंतर राज्यव्यापी दौरा करणार

कोल्हापूर : आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला खुळ्यात काढू नये. आमची सहनशिलता पाहू नये. सरकारने आरक्षणाबाबत दिलेला आपला शब्द पाळावा अन्यथा उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बुधवारी येथे दिला. आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काहीही केलेले नाही.  त्यामुळे या समितीवर काम करणारे नवीन लोक घ्यावेत अशीही मागणी देखील संभाजीराजे यांनी यावेळी केली.

राज्य सरकारला आरक्षण देण्याबाबत जाग आणण्यासाठी दि. २५ ऑक्टोबरनंतर मराठा समन्वयकांसोबत राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. येथील जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणासाठी पहिला टप्प्यात राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करणे, सर्वेक्षण करणे आवश्यक होते. पण, अद्यापही अशोक चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत काही केलेले नाही. सरकारने असा खेळ करून चालणार नाही. आरक्षणासाठीचा लढा आता पुन्हा सुरू केला जाईल. त्याची सुरूवात राज्यव्यापी दौऱ्याने होईल. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पनवेल, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दौरा होणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

आता चर्चेला जाणार नाही-

गप्प बसणे अथवा काठी हातात घेणे यावरून मवाळ आणि आक्रमकता ठरत नाही. कायदा हातात घेऊन आक्रमकता दाखवणे मला पटत नाही आणि छत्रपती घराण्याला शोभतही नाही. भविष्यात आक्रमकपणाची झलक दिसेल. आता सरकारसमवेत चर्चेला जाणार नाही. लोकांना वेठीस धरण्यापेक्षा वेळ आलीच, तर मूकमोर्चा, लाँगमार्च आणि आझाद मैदानात उपोषणाची माझी वैयक्तीक तयारी असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

खासदार संभाजीराजे म्हणाले-

१) आरक्षणाच्या लढ्यावर टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा समाजासाठी सकारात्मक दृष्टीकोन दाखवा.२) कोरोनामुळे दोन वर्षे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्याचे आश्वासन पूर्ण करावे.३) मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पाच मुलभूत सुविधा राज्य शासनाने देण्याचे मान्य केले होते. मात्र, त्या अद्याप दिलेल्या नाहीत. ‘सारथी’ सोडून अन्य काहीच शासनाने केलेले नाही.४) आरक्षणाबाबत केंद्रसरकारने काय केले पाहिजे हे पार्लमेंटमध्ये सांगितले आहे.५) निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुपर न्यूमररी अधिनियम काढून नियुक्त्या देणे गरजेचे आहे.६)आण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळाबाबत तीन महिने काहीही केलेले नाही.७) ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शिक्षणाच्या सवलती दिलेल्या नाहीत.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार