शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या केल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:55 IST

St Maharastra karnatka- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्याच बंद करण्याचा निर्णय एस. टी महामंडळाने शनिवारी घेतला. त्यानुसार दुपारपासून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद झाल्या. दिवसभरात कोल्हापूर-बेळगाव मार्गावर २६ गाड्या धावतात. कागलपर्यंत कोल्हापूर आगाऱाच्या बसेस धावत असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

ठळक मुद्देकर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या केल्या बंद दगडफेकीनंतर महामंडळाचा निर्णय : सीमाप्रश्नात होते गाड्यांचे नुकसान

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्याच बंद करण्याचा निर्णय एस. टी महामंडळाने शनिवारी घेतला. त्यानुसार दुपारपासून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद झाल्या. दिवसभरात कोल्हापूर-बेळगाव मार्गावर २६ गाड्या धावतात. कागलपर्यंत कोल्हापूर आगाऱाच्या बसेस धावत असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.कर्नाटकातील एकाने महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फलाटावर लावलेल्या कोल्हापूर-स्वारगेट(पुणे) बसवर दगडफेक केली. त्यात बसचे पंचवीस हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी एकनाथ सोमाण्णा हलगीकर यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी एमएच १३ सीए ७३६८ क्रमांकाची बस कोल्हापूर-स्वारगेट(पुणे) मार्गासाठी फलाटवर उभी होती. या दरम्यान संशयित हलगीकर याने खिशातून आणलेली दगडे बसच्या पुढील काचेवर फेकली. त्यात २५ हजारांचे नुकसान झाले.

दगडफेक करणाऱ्या संशयिताला बसस्थानकातील अन्य चालक, वाहकांनी पकडून प्रथम आगारप्रमुखाच्या स्वाधीन केले. त्यानंतर महामंडळाच्या प्रशासनाने शाहूपुरी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. तत्काळ पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकात धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या चारचाकीवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र -कर्नाटक वाद पुन्हा उफाळला. त्यानंतर शुक्रवारी रात्री स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बससेवा बंद पाडली. या दरम्यान शिवसैनिकांनी मध्यवर्ती बसस्थानकात जोरदार घोषणाबाजी करीत कन्नड रक्षण वेदिकेच्या कृतीचा निषेध करीत प्रत्युत्तर दिले.तोपर्यंत बससेवा बंदकर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळला आहे. प्रत्येकवेळी दोन्ही राज्यांच्या बसेस आंदोलक टार्गेट करीत फोडतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन राज्य मार्ग महामंडळाच्या कोल्हापूर आगाराने जोपर्यंत वाद निवळत नाही, तोपर्यंत कर्नाटकात बससेवा सुरू करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :state transportएसटीKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र