शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ssc exam: वेळ वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांतून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 12:10 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षी दहावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येत आहे. पेपरसाठी मंडळाने १५ ते ३० मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे परीक्षेत डोक्याबरोबर हातही चालत आहेत. पेपर पूर्ण सोडविण्यावर आमचा भर असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षार्थींनी शुक्रवारी सांगितले.दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे. अंतिम लेखी परीक्षेत अभ्यास होऊनही पेपर लिहिता आला नाही, पूर्ण सोडविता आला नाही, तर अडचणीचे ठरणार असल्याचे पालक, विद्यार्थ्यांना वाटत होते. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने यावर्षी पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लिहिण्याची अडचण दूर 

दहावीचा अभ्यास पूर्ण झाला. पण, ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याची थोडी अडचण वाटत होती. मात्र, वेळ वाढवून मिळाल्याने ती दूर झाली आहे. - शुभम डावरे

अर्धा तास जादा वेळ वाढवून मिळाल्याने पेपर सोडविणे अधिक सोयीस्कर झाले आहे. पहिला पेपर आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवला. - सृष्टी आणि साक्षी गुरव

बोर्डाने वेळ वाढवून दिल्याने आम्हा विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषयांच्या पेपरसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. - वेदिका पाटील

तज्ज्ञ शिक्षक म्हणतात

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग कमी झाला होता. आता वेळ वाढवून मिळाल्याने परीक्षा देणाऱ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी पूर्णपणे पेपर सोडवत आहेत. - एच. आर. लोंढे

यावर्षी बोर्डाने विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी ३०, तर ४० गुणांच्या पेपरकरिता १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे.  - विशाल सासमिले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थी