शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ssc exam: वेळ वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांतून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 12:10 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षी दहावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येत आहे. पेपरसाठी मंडळाने १५ ते ३० मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे परीक्षेत डोक्याबरोबर हातही चालत आहेत. पेपर पूर्ण सोडविण्यावर आमचा भर असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षार्थींनी शुक्रवारी सांगितले.दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे. अंतिम लेखी परीक्षेत अभ्यास होऊनही पेपर लिहिता आला नाही, पूर्ण सोडविता आला नाही, तर अडचणीचे ठरणार असल्याचे पालक, विद्यार्थ्यांना वाटत होते. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने यावर्षी पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लिहिण्याची अडचण दूर 

दहावीचा अभ्यास पूर्ण झाला. पण, ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याची थोडी अडचण वाटत होती. मात्र, वेळ वाढवून मिळाल्याने ती दूर झाली आहे. - शुभम डावरे

अर्धा तास जादा वेळ वाढवून मिळाल्याने पेपर सोडविणे अधिक सोयीस्कर झाले आहे. पहिला पेपर आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवला. - सृष्टी आणि साक्षी गुरव

बोर्डाने वेळ वाढवून दिल्याने आम्हा विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषयांच्या पेपरसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. - वेदिका पाटील

तज्ज्ञ शिक्षक म्हणतात

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग कमी झाला होता. आता वेळ वाढवून मिळाल्याने परीक्षा देणाऱ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी पूर्णपणे पेपर सोडवत आहेत. - एच. आर. लोंढे

यावर्षी बोर्डाने विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी ३०, तर ४० गुणांच्या पेपरकरिता १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे.  - विशाल सासमिले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थी