शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

ssc exam: वेळ वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांतून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 12:10 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षी दहावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येत आहे. पेपरसाठी मंडळाने १५ ते ३० मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे परीक्षेत डोक्याबरोबर हातही चालत आहेत. पेपर पूर्ण सोडविण्यावर आमचा भर असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षार्थींनी शुक्रवारी सांगितले.दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे. अंतिम लेखी परीक्षेत अभ्यास होऊनही पेपर लिहिता आला नाही, पूर्ण सोडविता आला नाही, तर अडचणीचे ठरणार असल्याचे पालक, विद्यार्थ्यांना वाटत होते. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने यावर्षी पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लिहिण्याची अडचण दूर 

दहावीचा अभ्यास पूर्ण झाला. पण, ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याची थोडी अडचण वाटत होती. मात्र, वेळ वाढवून मिळाल्याने ती दूर झाली आहे. - शुभम डावरे

अर्धा तास जादा वेळ वाढवून मिळाल्याने पेपर सोडविणे अधिक सोयीस्कर झाले आहे. पहिला पेपर आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवला. - सृष्टी आणि साक्षी गुरव

बोर्डाने वेळ वाढवून दिल्याने आम्हा विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषयांच्या पेपरसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. - वेदिका पाटील

तज्ज्ञ शिक्षक म्हणतात

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग कमी झाला होता. आता वेळ वाढवून मिळाल्याने परीक्षा देणाऱ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी पूर्णपणे पेपर सोडवत आहेत. - एच. आर. लोंढे

यावर्षी बोर्डाने विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी ३०, तर ४० गुणांच्या पेपरकरिता १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे.  - विशाल सासमिले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थी