शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

एसआरपीएफ’ जवान पोलीसपदास मुकणार : शासनाचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:56 IST

राज्य राखीव पोलीस बल गटातील (एसआरपीएफ)जवानांना दहा वर्षांऐवजी पंधरा वर्षे सेवा केल्याने पोलीस दलात बदली होण्याचे स्वप्न भंगले आहे.

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : राज्य राखीव पोलीस बल गटातील (एसआरपीएफ)जवानांना दहा वर्षांऐवजी पंधरा वर्षे सेवा केल्याने पोलीस दलात बदली होण्याचे स्वप्न भंगले आहे. या नव्या धोरणामुळे शासनाने जवानांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. दहा वर्षांनंतर पोलीस दलात मिळणारी संधी हुकली आहे. शासनाच्या या नव्या धोरणाला जवानांनी विरोध केला आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा वर्षांचे नवे धोरण रद्द करण्याचे दिलेले आश्वासन फसवे ठरले आहे. या आडमुठ्या धोरणामुळे एसआरपीएफच्या जवानांच्या करिअरवर चाट आली आहे.

राज्यभरात राज्य राखीव दलाचे सोळा बलगट आहेत. कोल्हापूरसह पुणे, जालना, नागपूर, दौंड, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, गडचिरोली, हिंगोली, औरंगाबाद, गोंदिया आदी ठिकाणी सुमारे २० हजार जवान कार्यरत आहेत. कोल्हापूर बटालियनमध्ये ९५० जवान आहेत. त्यांच्या नोकरीच्या एकूण कालखंडापैकी ७५ टक्के कालावधी हा घरापासून दूर बंदोबस्तासाठी जातो. त्यांच्या खांद्यावर नक्षलग्रस्त विभाग, संवेदनशील ठिकाणी चोवीस तास पहारा ठेवण्याची जबाबदारी दिली जाते.

गोंदिया, गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात पंधरा तुकड्या तब्बल नऊ महिने तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी दोन-चार महिने कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी तैनात केल्या जातात. सण-समारंभ आणि आपत्कालीन परिस्थितीमध्येही याच जवानांना पाचारण केले जाते. मिळेल त्या जागी मुक्काम अशी अवस्था जवानांची आहे. जवान कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. असंख्य आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.जवानांच्या या परिस्थितीचा विचार करून मागील शासनाने जवानांसाठी सलग दहा वर्षे राज्य राखीव पोलीस दलात सेवा बजावल्यावर पोलीस दलात दहा टक्के आरक्षणानुसार त्यांना पुन्हा नोकरीची संधी मिळत होती.

मात्र, शासनाने २१ आॅक्टोबर २०१६ रोजी आदेशात बदल करून ही बदली दहाऐवजी पंधरा वर्षांनी केली. या नव्या धोरणामुळे एसआरपीएफच्या जवानांना पोलीस दलात जाण्याची संधी हुकली आहे. या निर्णयाच्या विरोधात जवानांनी आंदोलने करून मुख्यमंत्र्यांसह तत्कालीन अप्पर मुख्य गृहसचिवांची भेट घेऊन नवीन आदेश रद्द करण्याची मागणी केली.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा आदेश रद्द करण्याचे आश्वासन दिले खरे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. शासन जवानांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे.काही जवान या पंधरा वर्षांच्या नव्या धोरणाच्या विरोधात ‘मॅट’मध्येही गेले आहेत. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे जवानांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. 

बदलीकरिता पंधरा वर्षांच्या सेवाज्येष्ठतेचा नियम लावल्याने पोलीस दलासाठी त्याचा फायदा जवानांना घेता येत नाही. हा नवीन नियम रद्द करून दहा वर्षांची जुनी कालमर्यादा बदलीकरिता निश्चित करावी, असा प्रस्ताव गृहविभागाला पाठविणार आहे.- के. व्ही. सपकाळे, अधीक्षक, राज्य राखीव पोलीस बलगट, कोल्हापूर

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर