शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

Kolhapur: सोनियाचा दिन आला; पण मिसाळवाडीचा लाडका साताप्पा गेला; वाघा बॉर्डरवर आले वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:53 IST

सरकारी नाेकरी मिळवणारा तो गावातील पहिलाच. त्यामुळे उभ्या गावाचा त्याच्यावर मोठा जीव

कोल्हापूर : आई-वडिलांनी आयुष्यभर मोलमजुरी केली. त्याच मोलमजुरीमुळे मुलगा शिकला, सैन्यात भरती झाला. त्यामुळे आता कुठे आई-वडिलांची मजुरी थांबली, अठराविश्व दारिद्र्याची रेषाही पुसटसी झाली; मात्र नियतीलाच हे मान्य नसल्याने मिसाळ कुटुंबावर सोनियाचा दिन पाहण्याआधीच एकुलत्या एक मुलाला गमवण्याची वेळ आली. पडळपैकी मिसाळवाडी (ता. राधानगरी) येथील साताप्पा गोविंदा मिसाळ या सैन्यातील जवानाला रविवारी पंजाबच्या वाघा बॉर्डरवर वीरमरण आले. ते राहत असलेल्या घरी विजेच्या धक्क्याने साताप्पा यांना वीरगती प्राप्त झाली. अत्यंत मनमिळाऊ, होतकरू अन् कष्टाळू असलेला साताप्पा ४० ते ४५ उंबऱ्यांच्या मिसाळवाडीचा अत्यंत लाडका, गावातील तो पहिला सरकारी नोकरदार. त्यामुळे घरापासून हजारो किलोमीटर दूर देशाच्या सीमेवर झालेल्या त्याच्या अपघाती जाण्याने उभी मिसाळवाडी शोगसागरात बुडाली आहे. राऊतवाडी धबधब्यापासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या वाडीत लहानाचा मोठा झालेल्या साताप्पाला सुरुवातीपासूनच देशसेवेत जाण्याची इच्छा होती. राधानगरीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले. २०१९ मध्ये तो सैन्य दलात भरती झाला. सरकारी नाेकरी मिळवणारा तो गावातील पहिलाच. त्यामुळे उभ्या गावाचा त्याच्यावर मोठा जीव. त्यानेही भरती झाल्यानंतर मागे वळून पाहताना दातृत्वाची भावना नेहमी जागृत ठेवली. यातून गावातील इतर मुलांना शिक्षण व नोकरीसाठी तो वारंवार मदत करत होता.प्रशिक्षक हंडे यांनाही होता भारी अभिमानघरची परस्थिती अत्यंत बिकट असलेल्या साताप्पाने खिंडी व्हरवडेतील लक्ष्य भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले. त्याचा प्रमाणिकपणा, शिस्त आणि खडतर सराव पाहून प्रशिक्षण लक्ष्मीकांत हंडे यांनाही त्याचा भारी अभिमान होता. ते इतरांना नेहमी त्याचा आदर्श घेण्याचा सल्ला देत असत. साताप्पाच्या जाण्याने हंडे यांनाही मोठा धक्का बसला आहे.