शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

कोल्हापुरातून १८९ कोटींच्या सॉफ्टवेअरची निर्यात, लोकप्रतिनिधींनी आयटी पार्कसाठी जोर लावण्याची गरज

By समीर देशपांडे | Updated: December 28, 2024 13:10 IST

अजित पवार यांची सूचना पण..

समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्राच्या एका बाजूला असणाऱ्या, रांगड्या परंतु देशभरात दरडोई उत्पन्नात अग्रगण्य असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आयटी उद्योगानेही बाळसे धरले आहे. सन २०२३-२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून १८९ कोटी रुपयांच्या सॉफ्टवेअरची निर्यात झाली आहे. या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ एकीकडे देश-विदेशात सेवा देत असताना कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी मंत्री, खासदार, आमदारांनी आता जोर लावण्याची गरज आहे.कोल्हापूरच्या आयटी क्षेत्रासाठी असलेली ही निर्यातवृद्धीची सुखद वार्ता थेट लोकसभेत देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातून २०१९-२० मध्ये १२८ कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात झाली होती. त्यामध्ये ५० टक्के वाढ होऊन सन २०२३-२४ मध्ये ती १८९ कोटींवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात पुणे आयटीमध्ये अव्वल असून, त्यानंतर नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरेही आयटी नकाशावर ठळकपणे पुढे येत आहेत.गेली १२ वर्षे कोल्हापूरच्या आयटी पार्कबाबत नेतेमंडळींकडून घोषणा होत आहेत. परंतु, यातील प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील किमान ५० हजाराहून अधिक युवक-युवती याच क्षेत्रात पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबादसह अन्य शहरांमध्ये नोकरीस आहेत. जर का आयटी कंपन्या कोल्हापूरमध्येच आल्या तर निश्चित स्थानिकांना याच ठिकाणी रोजगार मिळणार असून, यातून कोल्हापूरच्या अर्थकारणालाही आणखी पाठबळ मिळणार आहे.

अजित पवार यांची सूचना पण..उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जागा हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या बदल्यात कृषी विद्यापीठाला शहराजवळ ५० हेक्टर जागा द्यावी, अशीही सूचना करण्यात आली होती. यानंतर महसूल विभागाने कृषी विभागाला पर्यायी जागा दाखवल्या. परंतु, त्या गैरसोयीच्या असल्याने कृषी विद्यापीठाने या जागेचे हस्तांतरण करण्यास मान्यता दिलेली नाही.

गेली १२ वर्षे कोल्हापूरमध्ये आयटी पार्क व्हावे, यासाठी आयटी असोसिएशन प्रयत्नशील आहे. सुरुवातीला टेंबलाई येथील जागा पार्कसाठी देणार, असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर शेंडा पार्कमधील जागा देण्याची घोषणा करण्यात आली. कोल्हापूर परिसरात ३५० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. परंतु, शासनाचे पाठबळ नसल्यामुळे कोल्हापूरला आयटी पार्क उभारण्यावर मर्यादा येत आहेत.- शांताराम सुर्वे अध्यक्ष, आयटी असोसिएशन, कोल्हापूर 

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही क्षेत्रांत कोल्हापूरमधील अनेक युवक-युवती देश-विदेशात कार्यरत आहेत आणि आयआयटीमध्ये शिक्षणही घेत आहेत. पण कोल्हापूरमध्ये संधी नसल्याने सर्वजण बाहेर कार्यरत आहेत. कोल्हापूरमध्ये जर आयटी हब झाले तर फक्त कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचाही विकास होणार आहे. स्थानिक व देशातील तंत्रज्ञांना संधीही मिळेल आणि पुणे, बंगळुरूसारख्या शहरांवरचा ताणही कमी होईल. समतोल विकासासाठी कोल्हापूरला आयटी हब होणे ही काळाची गरज आहे. - रविकिरण केसरकर, आरएमजी इंडिया हेड, एटॉस इविडेन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSoftware Technology Parkआयटी पार्क नागपूरITमाहिती तंत्रज्ञान