शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचे वादळी वारे.. बालविवाहाचे नगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 12:51 IST

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते..

विश्वास पाटील

कोल्हापूर : मुलगी साताऱ्याची.. मुलगा पन्हाळ्याचा..फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते.. अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पळून गेलेली मुलगी माझे त्याच्यावर प्रेम आहे.. लग्न करा नाहीतर मी आत्महत्या करणार अशी धमकी देते. जिवाचे काही बरेवाईट करून घेण्यापेक्षा लग्न लावून दिलेले बरे या मानसिकतेतून पालक मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिचा विवाह करत असल्याचे चित्र समाजात दिसत आहे.ज्या प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी शासन व समाजही अनेक वर्षे झगडत आहे, त्याच बालविवाहास सोशल मीडियामुळे नवे खतपाणी मिळत आहे. नवमाध्यमांचाही हा सामाजिक तोटा आहे. वडणगे (ता. करवीर) येथे मंगळवारी बालविवाह रोखल्यानंतर त्याचे स्वरूप किती गंभीर आहे हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. लॉकडाऊन व त्यानंतरच्या काळातही बालविवाहाच्या घटना वाढल्याचे निरीक्षण अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाचे समन्वयक प्रमोद पाटील यांनी नोंदवले. गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या संस्थेकडे किमान ६० कॉल आले. त्यातील ३० विवाह रोखण्यात संस्थेला यश आले आहे; परंतु विवाह होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव दिसते.

डॉक्टर काय म्हणतात...

डॉ. नीता कुडाळकर यांनी सांगितले की, अठरा वर्षे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुलीची मानसिक व शारीरिक वाढ पूर्णत: झालेली नसते. तिचे व्यक्तिमत्त्व माणूस म्हणून फुललेले नसते. तोपर्यंत लग्न झाल्यास शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच तिच्या नशिबी बाळंतपण येते. ज्यामध्ये तिच्या स्वत:च्या जिवालाही धोका असतो. जन्माला येणारे बाळही तितकेसे निरोगी नसते. बाळाची जबाबदारी घ्यायला आईही सक्षम नसते. त्याचा मुलाच्या संगोपनावर परिणाम होतो. गरोदरपणात अनेक महिलांना रक्तदाबाचा त्रास असतो; परंतु मुलगी अल्पवयीन असल्यास हा त्रास जास्त होऊ शकतो.

मागील तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलींची जिल्ह्यातील स्थिती अशी

 

 

वर्ष एकूण बेपत्ता परत आल्या

 

 

२०१९ - २४१ - १८३

२०२० - १२६ - १२३

२०२१ - १९८ - १४४

बालविवाह होत असल्याचे समजल्यास कुणाला फोन कराल..

बालविवाह रोखण्यासाठी कोल्हापुरातील अवनि संस्थेतर्फे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या मदतीतून जागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचे समन्वयक प्रमोद पाटील (मो-७९७२३१५४१८) आहेत. त्यांच्याशी संपर्क साधता येईल. चाइल्ड लाइनचा टोल फ्री क्रमांक १०९८ असून, त्यांच्या प्रतिनिधी अनुजा खुरंदळ-९०२८८२७४८९ यांच्याशी संपर्क साधता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते. पोलीस प्रशासनाच्या १०० नंबरवरही ही माहिती देता येऊ शकते.

शिक्षा काय होते..

बालविवाह केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित नवऱ्या मुलावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा नोंद होतो. त्याशिवाय बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये नवरा, त्याचे कुटुंबीय, लग्नाला उपस्थित पाहुणे, भटजी, लग्नातील म्होरके, आचारी, फोटोग्राफरसह मंगल कार्यालय मालक व मित्रमंडळी यांनाही प्रत्येकी १ लाखाचा दंड व २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते.

ग्रामसमित्याच नाहीत..

बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बालसंरक्षण समिती व शहरात वॉर्ड समित्या स्थापन करण्याचे २०१४ चे शासन आदेश आहेत; परंतु बहुतांशी गावात व शहरातही या समित्यांची स्थापनाच झालेली नाही. बालविवाह होत असल्याचे समजल्यास या समितीचा अध्यक्ष म्हणून सरपंच किंवा ग्रामसेवक यांची त्याबद्दल कळवण्याची व तो रोखण्याची जबाबदारी असते; परंतु स्थानिक राजकारण, कुणाचे वाकडे घ्यायला नको म्हणून हा विवाह लपवून ठेवण्याकडेच कल असतो, असे अनुभव आहेत.

बालग्राम समित्या सक्षम झाल्यास त्यातून बालविवाह, पोस्कोसारखे गुन्हे, मुलींचे कुटुंबात होणारे शोषण अशा घटना रोखणे शक्य आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण आवश्यक आहे. - ॲड. दिलशाद मुजावर, सदस्या, बाल कल्याण समिती, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट