शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

प्रेमाचे वादळी वारे.. बालविवाहाचे नगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 12:51 IST

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते..

विश्वास पाटील

कोल्हापूर : मुलगी साताऱ्याची.. मुलगा पन्हाळ्याचा..फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते.. अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पळून गेलेली मुलगी माझे त्याच्यावर प्रेम आहे.. लग्न करा नाहीतर मी आत्महत्या करणार अशी धमकी देते. जिवाचे काही बरेवाईट करून घेण्यापेक्षा लग्न लावून दिलेले बरे या मानसिकतेतून पालक मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिचा विवाह करत असल्याचे चित्र समाजात दिसत आहे.ज्या प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी शासन व समाजही अनेक वर्षे झगडत आहे, त्याच बालविवाहास सोशल मीडियामुळे नवे खतपाणी मिळत आहे. नवमाध्यमांचाही हा सामाजिक तोटा आहे. वडणगे (ता. करवीर) येथे मंगळवारी बालविवाह रोखल्यानंतर त्याचे स्वरूप किती गंभीर आहे हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. लॉकडाऊन व त्यानंतरच्या काळातही बालविवाहाच्या घटना वाढल्याचे निरीक्षण अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाचे समन्वयक प्रमोद पाटील यांनी नोंदवले. गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या संस्थेकडे किमान ६० कॉल आले. त्यातील ३० विवाह रोखण्यात संस्थेला यश आले आहे; परंतु विवाह होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव दिसते.

डॉक्टर काय म्हणतात...

डॉ. नीता कुडाळकर यांनी सांगितले की, अठरा वर्षे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुलीची मानसिक व शारीरिक वाढ पूर्णत: झालेली नसते. तिचे व्यक्तिमत्त्व माणूस म्हणून फुललेले नसते. तोपर्यंत लग्न झाल्यास शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच तिच्या नशिबी बाळंतपण येते. ज्यामध्ये तिच्या स्वत:च्या जिवालाही धोका असतो. जन्माला येणारे बाळही तितकेसे निरोगी नसते. बाळाची जबाबदारी घ्यायला आईही सक्षम नसते. त्याचा मुलाच्या संगोपनावर परिणाम होतो. गरोदरपणात अनेक महिलांना रक्तदाबाचा त्रास असतो; परंतु मुलगी अल्पवयीन असल्यास हा त्रास जास्त होऊ शकतो.

मागील तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलींची जिल्ह्यातील स्थिती अशी

 

 

वर्ष एकूण बेपत्ता परत आल्या

 

 

२०१९ - २४१ - १८३

२०२० - १२६ - १२३

२०२१ - १९८ - १४४

बालविवाह होत असल्याचे समजल्यास कुणाला फोन कराल..

बालविवाह रोखण्यासाठी कोल्हापुरातील अवनि संस्थेतर्फे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या मदतीतून जागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचे समन्वयक प्रमोद पाटील (मो-७९७२३१५४१८) आहेत. त्यांच्याशी संपर्क साधता येईल. चाइल्ड लाइनचा टोल फ्री क्रमांक १०९८ असून, त्यांच्या प्रतिनिधी अनुजा खुरंदळ-९०२८८२७४८९ यांच्याशी संपर्क साधता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते. पोलीस प्रशासनाच्या १०० नंबरवरही ही माहिती देता येऊ शकते.

शिक्षा काय होते..

बालविवाह केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित नवऱ्या मुलावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा नोंद होतो. त्याशिवाय बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये नवरा, त्याचे कुटुंबीय, लग्नाला उपस्थित पाहुणे, भटजी, लग्नातील म्होरके, आचारी, फोटोग्राफरसह मंगल कार्यालय मालक व मित्रमंडळी यांनाही प्रत्येकी १ लाखाचा दंड व २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते.

ग्रामसमित्याच नाहीत..

बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बालसंरक्षण समिती व शहरात वॉर्ड समित्या स्थापन करण्याचे २०१४ चे शासन आदेश आहेत; परंतु बहुतांशी गावात व शहरातही या समित्यांची स्थापनाच झालेली नाही. बालविवाह होत असल्याचे समजल्यास या समितीचा अध्यक्ष म्हणून सरपंच किंवा ग्रामसेवक यांची त्याबद्दल कळवण्याची व तो रोखण्याची जबाबदारी असते; परंतु स्थानिक राजकारण, कुणाचे वाकडे घ्यायला नको म्हणून हा विवाह लपवून ठेवण्याकडेच कल असतो, असे अनुभव आहेत.

बालग्राम समित्या सक्षम झाल्यास त्यातून बालविवाह, पोस्कोसारखे गुन्हे, मुलींचे कुटुंबात होणारे शोषण अशा घटना रोखणे शक्य आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण आवश्यक आहे. - ॲड. दिलशाद मुजावर, सदस्या, बाल कल्याण समिती, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट