शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचे वादळी वारे.. बालविवाहाचे नगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 12:51 IST

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते..

विश्वास पाटील

कोल्हापूर : मुलगी साताऱ्याची.. मुलगा पन्हाळ्याचा..फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते.. अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पळून गेलेली मुलगी माझे त्याच्यावर प्रेम आहे.. लग्न करा नाहीतर मी आत्महत्या करणार अशी धमकी देते. जिवाचे काही बरेवाईट करून घेण्यापेक्षा लग्न लावून दिलेले बरे या मानसिकतेतून पालक मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिचा विवाह करत असल्याचे चित्र समाजात दिसत आहे.ज्या प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी शासन व समाजही अनेक वर्षे झगडत आहे, त्याच बालविवाहास सोशल मीडियामुळे नवे खतपाणी मिळत आहे. नवमाध्यमांचाही हा सामाजिक तोटा आहे. वडणगे (ता. करवीर) येथे मंगळवारी बालविवाह रोखल्यानंतर त्याचे स्वरूप किती गंभीर आहे हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. लॉकडाऊन व त्यानंतरच्या काळातही बालविवाहाच्या घटना वाढल्याचे निरीक्षण अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाचे समन्वयक प्रमोद पाटील यांनी नोंदवले. गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या संस्थेकडे किमान ६० कॉल आले. त्यातील ३० विवाह रोखण्यात संस्थेला यश आले आहे; परंतु विवाह होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव दिसते.

डॉक्टर काय म्हणतात...

डॉ. नीता कुडाळकर यांनी सांगितले की, अठरा वर्षे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुलीची मानसिक व शारीरिक वाढ पूर्णत: झालेली नसते. तिचे व्यक्तिमत्त्व माणूस म्हणून फुललेले नसते. तोपर्यंत लग्न झाल्यास शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच तिच्या नशिबी बाळंतपण येते. ज्यामध्ये तिच्या स्वत:च्या जिवालाही धोका असतो. जन्माला येणारे बाळही तितकेसे निरोगी नसते. बाळाची जबाबदारी घ्यायला आईही सक्षम नसते. त्याचा मुलाच्या संगोपनावर परिणाम होतो. गरोदरपणात अनेक महिलांना रक्तदाबाचा त्रास असतो; परंतु मुलगी अल्पवयीन असल्यास हा त्रास जास्त होऊ शकतो.

मागील तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलींची जिल्ह्यातील स्थिती अशी

 

 

वर्ष एकूण बेपत्ता परत आल्या

 

 

२०१९ - २४१ - १८३

२०२० - १२६ - १२३

२०२१ - १९८ - १४४

बालविवाह होत असल्याचे समजल्यास कुणाला फोन कराल..

बालविवाह रोखण्यासाठी कोल्हापुरातील अवनि संस्थेतर्फे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या मदतीतून जागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचे समन्वयक प्रमोद पाटील (मो-७९७२३१५४१८) आहेत. त्यांच्याशी संपर्क साधता येईल. चाइल्ड लाइनचा टोल फ्री क्रमांक १०९८ असून, त्यांच्या प्रतिनिधी अनुजा खुरंदळ-९०२८८२७४८९ यांच्याशी संपर्क साधता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते. पोलीस प्रशासनाच्या १०० नंबरवरही ही माहिती देता येऊ शकते.

शिक्षा काय होते..

बालविवाह केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित नवऱ्या मुलावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा नोंद होतो. त्याशिवाय बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये नवरा, त्याचे कुटुंबीय, लग्नाला उपस्थित पाहुणे, भटजी, लग्नातील म्होरके, आचारी, फोटोग्राफरसह मंगल कार्यालय मालक व मित्रमंडळी यांनाही प्रत्येकी १ लाखाचा दंड व २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते.

ग्रामसमित्याच नाहीत..

बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बालसंरक्षण समिती व शहरात वॉर्ड समित्या स्थापन करण्याचे २०१४ चे शासन आदेश आहेत; परंतु बहुतांशी गावात व शहरातही या समित्यांची स्थापनाच झालेली नाही. बालविवाह होत असल्याचे समजल्यास या समितीचा अध्यक्ष म्हणून सरपंच किंवा ग्रामसेवक यांची त्याबद्दल कळवण्याची व तो रोखण्याची जबाबदारी असते; परंतु स्थानिक राजकारण, कुणाचे वाकडे घ्यायला नको म्हणून हा विवाह लपवून ठेवण्याकडेच कल असतो, असे अनुभव आहेत.

बालग्राम समित्या सक्षम झाल्यास त्यातून बालविवाह, पोस्कोसारखे गुन्हे, मुलींचे कुटुंबात होणारे शोषण अशा घटना रोखणे शक्य आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण आवश्यक आहे. - ॲड. दिलशाद मुजावर, सदस्या, बाल कल्याण समिती, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट