शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस, कोकणात जाणारी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:55 IST

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासूनच धुवांधार पाऊस कोसळत आहे. कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग बंद झाला असून वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार इतर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस, कोकणात जाणारी वाहतूक बंदपन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीत अतिवृष्टी कायम: बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासूनच धुवांधार पाऊस कोसळत आहे. कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग बंद झाला असून वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार इतर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज आदी तालुक्यात अतिवृष्टी कायम असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. राधानगरीतून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. विविध नद्यांवरील ४0 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिरोळ तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाढले आहे. कुरुंदवाड-जयसिंगपूर रस्ता सकाळी ७.४५ वाजता झार पडल्याने बंद आहे.शनिवारी (दि. २७), रविवारी (दि. २८) कोल्हापुरात पावसाचा जोर काहिसा कमी होता; पण सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला. दिवसभर एकसारखी संततधार सुरु असून धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ८६ टक्के, तर वारणा ७६ टक्के भरले आहे.कोल्हापूर गगनबावडा मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर १.५ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कळे मार्गे गगनबावड्याकडे जाणारी वाहतूक, तसेच कोल्हापूर कडून जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. याशिवाय वैभववाडीकडून कोल्हापूरकडे येणारी वाहतूकही गगनबावडा येथे थांबविण्यात आली आहे. टेकवाडी (ता. गगनबावडा) येथील रस्त्यावर पाणी आल्याने गावाची पूर्णत: वाहतूक बंद आहे. दुसऱ्यांदा हे गाव संपर्काबाहेर गेले आहे.पन्हाळा तालुक्यातही पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. केर्ली येथे कासारी नदीचे पाणी रस्त्यावर आले असून पाण्याची पातळी वाढलेली आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.कुंभी नदीवरील गोठे-परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बाजार भोगाव तसेच पोहाळे तर्फ बोरगाव याच्या मध्यभागी कासारी नदीच्या बाजूला अंदाजे तीन फूट पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद आहे मात्र, पोहाळवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.चंदगड तालुक्यातही पावसामुळे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळी ६.३0 वाजता घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डे, आडकूर, कानडेवाडी, तारेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तालुक्यातील ताम्रपर्णी नदीवरील कुरतनवाडी, हल्लारवाडी हे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी मार्ग बंद असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या चंदगड आगाराची चंदगड-हेरे, चंदगड-गवसे, चंदगड -भोगोली, चंदगड- मानगांव, चंदगड- कोनेवाडी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.राधानगरीतून पाण्याच्या विसर्गात वाढराधानगरीतून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे पुलावर पाणी आले आहे, तसेच शेणगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. याबाबत पुर नियंत्रण कक्षास कळविण्यात आले आहे. किटवाड नंबर २ लघु पाटबंधारे तलाव सकाळी ७ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.कोल्हापूर शहरात पाणीच पाणीकोल्हापूर शहरातही जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. राजाराम बंधाºयाची पाणी पातळी ३२ फुट ९ इंच इतकी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी गुढघाभर पाणी साचले आहे. यामुळे बहुतेकांनी चारचाकी वाहने बाहेर काढली आहेत, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाणीच पाणी झाले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूकीची कोंडी झाली आहे. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते उखडले असून पादचारी आणि दुचाकी चालकांना कसरत करावी लागत आहे. पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, तर काही शाळांना सुटीच देण्यात आली आहे.कळंबा तलाव भरला, मासेमारी जोरातकळंबा तलाव पाण्याचा विसर्ग वाढला असून सांडव्या वरून एक फुटाने पाणी बाहेर पडू लागले आहे. सांडव्यावरून मोठे मासे बाहेर पडू लागल्याने पर्यटकांची मासेमारी जोरात सुरु आहे.अलमट्टी धरण ९५ टक्के भरलेअलमट्टी धरण मंगळवारी ९५ टक्के (११७ टी.एम.सी) भरले असून अलमट्टी धरणामध्ये होनारी आवक ७६000 क्यूसेक व अलमट्टी धरण मधून विसर्ग १0१000 क्यूसेक इतका आहे. कृष्णा नदीमधून होणारा विसर्ग वाढल्यास पुढील विसर्ग वाढविणार आहेत असे अलमट्टी प्रशासन यांनी कळविले आहे.,

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर