शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

लूटमार करणाऱ्या सहाजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:33 IST

कोल्हापूर : दिवसा सेंट्रिंग काम आणि रात्री लूटमार करणाºया जिल्ह्यातील सहाजणांच्या सराईत टोळीच्या मुसक्या रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...

कोल्हापूर : दिवसा सेंट्रिंग काम आणि रात्री लूटमार करणाºया जिल्ह्यातील सहाजणांच्या सराईत टोळीच्या मुसक्या रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून कार, दुचाकी, ४५ मोबाईल हॅँडसेट, आठ तलवारी, रोख रक्कम असा सुमारे दहा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.टोळीतील आणखी दोन साथीदार पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.संशयित म्होरक्या आशिष हणमंत गायकवाड (वय २३), राज अंजुम मुल्ला (१९), शंकर सुनील गायकवाड (१९, तिघे रा. राजेंद्रनगर), प्रकाश शांताराम कोकाटे (१९, मोतीनगर, कोल्हापूर), तुषार रवींद्र लोहार (२०, रा. चोकाक, ता. हातकणंगले), सुभाष विष्णू पाटील (२७, रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.या सर्वांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यांचे आणखी दोन साथीदार पसार आहेत. शिरोली एम. आय. डी. सी. येथे २६ आॅक्टोबरला कारखान्यातून घरी जाणारा परप्रांतीय कामगार राजेशकुमार पाल याला सहाजणांच्या टोळीने रात्री साडेनऊच्या सुमारास रस्त्यात अडवून, तलवारीचा धाक दाखवून मोबाईल, चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला होता. हा गुन्हा राजारामपुरी येथील एका सक्रिय टोळीने केल्याची माहिती हवालदार संतोष माने यांना मिळाली होती.ही टोळी कार (एमएच ०९ एस - ९५२२) मधून राजाराम तलाव परिसरात येणार असल्याची माहिती खबºयाकडून मिळाली. त्यानुसार पथके रवाना करून सापळा लावला असता राजाराम तलावाकडे जाणाºया रस्त्याच्या भूचुंबकत्व संस्थेसमोर कारमधून आलेल्या सहाजणांना पकडले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये आठ तलवारी, कापडात बांधलेले मोबाईल हॅँडसेटचे गाठोडे, पाकीट आढळून आले. पाच हजार ते चाळीस हजार किमतीचे मोबाईल गाठोड्यात दिसून आले.कामगार पाल यांचे आधारकार्डही आढळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या टोळीचे म्होरके आशिष गायकवाड आणि प्रकाश कोकाटे असल्याचे निष्पन्न झाले. दिवसभर सेंट्रिंग काम करायचे; त्यानंतर चोरून आणलेल्या कारमधून ते गोकुळ शिरगाव, शिरोली एम. आय. डी. सी. इचलकरंजी, शिवाजी विद्यापीठ परिसरातील परप्रांतीय कामगारांना तलवारीचा धाक दाखवून लूटमार करीत असत. आतापर्यंत त्यांची चार गुन्ह्णांची कबुली दिली आहे. सर्वजण आठवीपर्यंत शाळा शिकले आहेत. आई-वडील मोजमजुरी करतात. चैनी, मौजमजा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी ते सेंट्रिंग कामानंतर रात्री लूटमार करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.अंगाला हात लावायचा नाय!संशयित प्रकाश कोकाटे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करते. हा टोळीचा म्होरक्या असल्याने पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर तो ‘अंगाला हात लावायचा नाय...!’ अशी पोलिसांनाच दमदाटी करू लागला. शरीराने सडपातळ असलेल्या या म्होरक्याला अजून मिसरूडही फुटलेली नाही. त्याच्या अंगातील गुन्हेगारीचा माज पोलिसांनी खाकी प्रसादाने उतरविला.