शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

नागपूर-कोल्हापूर रेल्वेतील सहा प्रवासी जखमी, : लोखंडी फलक घासून दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:31 AM

मिरज : सलगरेजवळ रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला घासल्याने रेल्वेत खिडकीकडेला बसलेले सहा प्रवासी जखमी झाले.

मिरज : सलगरेजवळ रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला घासल्याने रेल्वेत खिडकीकडेला बसलेले सहा प्रवासी जखमी झाले. बुधवारी दुपारी बारा वाजता पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर कवठेमहांकाळ ते सलगरे स्थानकादरम्यान हा विचित्र अपघात घडला. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंढरपूर ते मिरज रेल्वेमार्गावर कवठेमहांकाळ स्थानक सोडल्यानंतर सलगरे स्थानक येण्यापूर्वी रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून धावत्या रेल्वेला घासला. भरधाव निघालेल्या नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला तो घासत गेला. यामुळे काही क्षणातच एस-२, एस-४, एस-९ यासह जनरल बोगीतील खिडकीकडेला हात बाहेर काढून किंवा खिडकीत ठेवून बसलेले, दारात उभे राहिलेले सहा प्रवासी जखमी झाले.

यामुळे एक्स्प्रेसमध्ये गोंधळ उडाला. हात आणि चेहऱ्याला पत्रा कापल्याने रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशांना सलगरे स्थानकावर कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. यामुळे एक्स्प्रेस मिरजेला येईपर्यंत रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशांमुळे एक्स्प्रेसच्या डब्यांतील आसने रक्ताने भिजली होती. जखमी प्रवासी व नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. मिरज स्थानकात रेल्वे पोलीस, सुरक्षा दल व स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांनी जखमींना रिक्षांतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातात नासिरअली हसनअली सय्यद (वय ४३, रा. शिंदे मळा, सांगली), राजेश हरिश्चंद्र वरघडे (४४, रा. सौभाग्यनगर, नागपूर), सिरील डॅनियल तिरोरे (६२, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), बळवंत नानू शिंदे (३०, रा. धामोड, ता. राधानगरी) या हातावर व चेहºयावर जखमा झालेल्या चार प्रवाशांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. अन्य दोन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेमुळे नागपूर एक्स्प्रेस एक तास विलंबाने कोल्हापूरकडे रवाना झाली. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात नोंद आहे. रेल्वे अधिकºयांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्यास याप्रकरणी सबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.घातपाताचा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावाअपघातात सय्यद, तिरोरे व शिंदे या प्रवाशांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर विभागाच्या रेलपथ विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताच्या ठिकाणी रेल्वेमार्गालगत कोणताही फलक किंवा खांब तुटलेला नसून, कोणीतरी बाहेरून काहीतरी फेकल्यामुळे प्रवासी जखमी झाले असावेत, असा रेल्वे अधिकाºयांनी दावा केल्यामुळे अपघाताबाबत गूढ निर्माण झाले आहे.