शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

सहा लाख क्विंटल साखर उत्पादन

By admin | Updated: April 10, 2015 23:40 IST

नवीद मुश्रीफ : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना चाचणी हंगाम

कागल : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चाचणी हंगामातच चार लाख ७६ हजार ४८८ मे. टन उसाचे गाळप करून सहा लाख १५ हजार ६२५ क्विंटल साखर उत्पादन करून कारखानदारीत एक नवीन मानांकन निर्माण केले आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय चाचणी हंगाम यशस्वी केला आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी दिली.ते म्हणाले, न्यायालयीन स्थगितीमुळे या कारखान्याचा पहिलाच चाचणी गळीत हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला. तरीसुद्धा शेतकरी वर्ग, सभासद, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांनी कारखान्याचे प्रवर्तक हसन मुश्रीफ साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून कारखाना सुरू होण्याची वाट पाहिली. कारखाना सुरू झाल्यानंतर गाळपक्षमता ३५०० मे. टन इतकी असताना सरासरी ४१०० मे. टन रोज उसाचे गाळप करून नवीन तंत्रज्ञानाची क्षमता सिद्ध करून दाखविली.सरासरी साखर उतारा १२.९२ टक्के इतका मिळाला आहे. कारखान्याच्या सहवीज प्रकल्पातून २३ मेगावॅट विजेचे रोज उत्पादन झाले आहे. एक मेगावॅट वीज निर्मितीसाठी ४.९ टक्के इतक्या कमी स्टिमचा वापर झाला आहे. दि. ९ एप्रिलअखेर चार कोटी ४१ लाख ३७ हजार युनिट वीज विद्युत वितरण कंपनीला विक्री करण्यात आली आहे. आजरा आणि गडहिंग्लज साखर कारखान्यांकडून दहा हजार मे. टन बगॅस प्राप्त झाला आहे. अद्याप सहवीज प्रकल्प १५ दिवस चालणार आहे. (प्रतिनिधी)पुढील हंगामात गाळप क्षमता ६५00 मे. टननवीद मुश्रीफ म्हणाले, इजॅक कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असा हा साखर कारखाना उभारला आहे. हंगामकाळात हा कारखाना पाहण्यासाठी विविध मान्यवर, साखर उद्योगातील तज्ज्ञांनी कार्यस्थळाला भेट देऊन कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. पुढील हंगामात प्रतिदिन ६००० त ६५०० मे. टन ऊस गाळपाची जबाबदारी या इजॅक कंपनीने घेतली आहे.