शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

कोल्हापुरातील रस्त्यांसाठी सहा कोटींची मागणी --:दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:29 IST

या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार स्थापन नसल्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे निवेदन

कोल्हापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर एक लाख रुपये याप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत केंद्राकडे सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.

महापुरानंतर कोल्हापुरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत. महापालिकेकडे स्वत:चा फंड नाही; मात्र कोल्हापुरातून महाराष्ट्र शासनाकडे विविध कराच्या माध्यमांतून दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा कर भरला जातो. ही रक्कम शासनाच्या नियोजित उद्दिष्ट्यांपेक्षा शेकडो कोटीने जास्त आहे; त्यामुळे शासनाने आपली जबाबदारी समजून या कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी दिला पाहिजे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून आपण केंद्र व राज्य शासनाकडून हा निधी महापालिकेस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार स्थापन नसल्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, अशोक रामचंदाणी, दादासो लाड, भरत रसाळे, सुभाष देसाई, भाऊ घोडके, राहुल ढवळे, उत्तम वंदुरे, पांडुरंग आडसुळे, किरण पडवळ, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केंद्र व राज्य शासनाकडून कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त