शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कोल्हापुरातील रस्त्यांसाठी सहा कोटींची मागणी --:दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:29 IST

या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार स्थापन नसल्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे निवेदन

कोल्हापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर एक लाख रुपये याप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत केंद्राकडे सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.

महापुरानंतर कोल्हापुरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत. महापालिकेकडे स्वत:चा फंड नाही; मात्र कोल्हापुरातून महाराष्ट्र शासनाकडे विविध कराच्या माध्यमांतून दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा कर भरला जातो. ही रक्कम शासनाच्या नियोजित उद्दिष्ट्यांपेक्षा शेकडो कोटीने जास्त आहे; त्यामुळे शासनाने आपली जबाबदारी समजून या कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी दिला पाहिजे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून आपण केंद्र व राज्य शासनाकडून हा निधी महापालिकेस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार स्थापन नसल्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, अशोक रामचंदाणी, दादासो लाड, भरत रसाळे, सुभाष देसाई, भाऊ घोडके, राहुल ढवळे, उत्तम वंदुरे, पांडुरंग आडसुळे, किरण पडवळ, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केंद्र व राज्य शासनाकडून कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त