शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

इचलकरंजीतील सहा नगरसेवक सेनेच्या गळाला -: आठवड्यात ‘मातोश्री’वर प्रवेशाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:08 AM

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश

ठळक मुद्दे लोकसभेचे पडसाद

राजाराम पाटील ।इचलकरंजी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या पवित्र्यात आहेत. आठवड्याभरात हा प्रवेश ‘मातोश्री’वर पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रामध्ये खळबळजनक घडामोडी घडल्या. पूर्वाश्रमीचा माने गट पुन्हा संघटित झाला. शिवसेनेचे धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तब्बल ३५ हजार मताधिक्य मिळाले. साहजिकच निवडणुकीतील या घडामोडीचे परिणाम आता शहरातील आणि पर्यायाने नगरपालिकेतील राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहेत.

शिवसेनेकडून श्रीमती निवेदिता माने यांनीही लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी शिवसेनेच्याच उमेदवारीवर त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी निवडणूक लढविली आणि त्यांनी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला. ही घटना इचलकरंजीच्या नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरली. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपालिकेतील सत्तारूढ अगर विरोधी आघाडीमध्ये असलेल्या अनेक नगरसेवकांनी माने यांना या निवडणुकीत मदत केली. त्याचेच परिणाम आता येथील राजकीय गोटामध्ये दिसू लागले आहेत.

माने यांच्यापाठोपाठ शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांपैकी एका प्रमुख नगरसेवकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे, असे ‘त्या’ नगरसेवकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. प्रवेश करू इच्छिणाऱ्यांमध्ये चार नगरसेवक सत्तारूढ आघाडीतील आहेत. त्यापैकी एकजण पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. तसेच एक नगरसेवक अपक्ष आणि दोन नगरसेवक ‘ताराराणी’चे आहेत. उर्वरित दोघे नगरसेवक शाहू आघाडीतील आहेत. कारण हे दोघे त्यांच्याच पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याने ते माने यांच्याबरोबरीनेच शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छितात, असेही ‘त्या’ नगरसेवकाने स्पष्ट केले. मात्र, या राजकीय घडामोडींबाबत कमालीची गुप्तता राखली जात आहे.सत्तारूढ आघाडी अबाधितचइचलकरंजी नगरपालिकेमध्ये सत्तारूढ आघाडीमध्ये भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेसमधील जांभळे गट व ताराराणी आघाडी यांचा समावेश आहे, तर विरोधात कॉँग्रेस व शाहू विकास आघाडी आहे. पालिकेमधील या सहाही नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तरी पालिकेतील सत्तेमध्ये शिवसेना असल्यामुळे नगरपालिकेतील सत्तारूढ आघाडी अबाधित राहणार आहे. शिवसेना प्रवेशामुळे सत्तारूढ आघाडीची संख्या दोनने वाढवून ती ३६ होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण