शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून गोव्याकडे जाणाऱ्या १२ बसेस राधानगरीत अडकल्या, दीडशे प्रवासी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:39 IST

पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशे गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले आहेत.

कोल्हापूर - पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशे गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढत आहे. दरम्यान राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर बस पाण्यात अडकली असून त्यातील तीस प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुणे येथून सुमारे दिडशे प्रवाशांना घेऊन  बारा बसेस गोव्यात येत होत्या. काल (५ ऑगस्ट) सोमवार मध्यरात्री अडीच वाजता या बसेस कोल्हापूर येथे दाखल झाल्या. कोल्हापूरात पोहोचल्यानंतर पुढील महामार्गावर पुराचे पाणी आल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरहुन गोव्यात येण्यासाठी मॅपचा आधार घेत गारगोटी, देवगड हा अंतर्गत रस्ता धरला. या रस्यावर पूर्वीपासून पाणी आले होते. याची माहिती बस चालकांना नसल्याने त्यांनी बसेस तशाच पुढे नेल्या. राधानगरी येथे पोहोचताच त्यांना येथील सर्व गाव पाण्याखाली गेल्याचे समजले. सर्व बसेस मागे नेण्याचा प्रयत्न केला असता मागील भाग सुद्धा पाण्यात बुडल्याचे त्यांना आढळून आले.

दरम्यान बसच्या चालकाने निष्काळजी पणा दाखवत बस तशीच पुढे नेल्यामूळे सदर बस राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर पाण्यात अडकली. धोक्याचा इशारा दिलेला असतांना बस पूढे नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घेतल्यामुळे संतापलेल्या लोकांनी बस चालकाला बेदम चोप दिल्याचे समजते. 

पोलिटिकल सायन्सच्या गोव्यातील शिक्षिका संस्कृती आईर यांनी सकाळी दहाच्या दरम्यान आपात्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

जवळच्या गावातील सर्व लोकांना बचाव पथकाच्या मदतीने दुसऱ्या जागी हलवले आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कोणीच उपस्थित नाही.पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आल्या नंतर इतरांना मदत केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे आईर यानी सांगितले. अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये वृद्ध,महिला आणि मुलांचा सुद्धा समावेश आहे. त्यांना कालपासून काहीच खायला मिळालेले नाही. पाण्याचा स्तर वाढत चालल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर