शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रामीण दिव्यांगांना एकाच वेळी सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 15:14 IST

दिव्यांगांसाठीच्या पारंपरिक योजनांना फाटा देत यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना एकाच वेळी अनुदान देण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांना प्रत्येकी ३०० रुपये देण्यात येणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही योजना मांडली असून, त्याची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामीण दिव्यांगांना एकाच वेळी सानुग्रह अनुदानसतेज पाटील यांची संकल्पना, ७५ लाखांची तरतूद

समीर देशपांडेकोल्हापूर : दिव्यांगांसाठीच्या पारंपरिक योजनांना फाटा देत यंदा कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना एकाच वेळी अनुदान देण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांना प्रत्येकी ३०० रुपये देण्यात येणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही योजना मांडली असून, त्याची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेला असतो. गेली काही वर्षे या निधीतून दिव्यांगांना कुक्कुटपालन, शेती अवजारे पुरवणे, दुचाकी पुरवणे, संगणक, लॅपटॉप पुरवणे, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, जयपूर फूट, पांढरी काठी यासारखी साहाय्यकारी साधने पुरवली जात होती.परंतु मर्यादित दिव्यांग बंधू-भगिनींना याचा लाभ होत होता. तसेच यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता, जिल्हा परिषद सदस्यांची शिफारसपत्रे, पंचायत समितीला प्रस्ताव देणे, तो जिल्हा परिषदेला येऊन मंजूर होणे ही प्रक्रिया मोठी आहे. काहीवेळा एका आर्थिक वर्षातील साधने दुसऱ्या वर्षी मिळाल्याचीही उदाहरणे आहेत.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी याबाबतच्या झालेल्या बैठकीत पारंपरिक सर्व योजनांना फाटा देऊन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या सर्वांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी सूचना मांडली. ती समाजकल्याण समितीनेही मान्य केली. त्यानुसार आता जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या २५ हजार दिव्यांग बंधू-भगिनींना एकाच वेळी प्रत्येकी ३०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे मर्यादितांना होणारा हा लाभ सर्वच दिव्यांगांना होणार आहे. 

पालकमंत्री सतेज पाटील यांनी वैयक्तिक योजनेच्या माध्यमातून मर्यादितांना लाभ देण्यापेक्षा यावेळी अधिकाधिक दिव्यांगांना लाभ देण्याबाबत ही योजना मांडली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने यासाठी ७५ लाख २७ हजार रुपयांची तरतूद केली आहे. निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करून ३०० रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील.स्वाती सासने,सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद कोल्हापूर

टॅग्स :Divyangदिव्यांगzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील