शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या गाड्यांतून फिरण्याची क्रेझ, 'फास्टॅग'चा फायदा 'एमएच-०९' लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:08 IST

खासगी प्रवासी वाहतूकदारांनाही लाभ देण्याची मागणी 

कोल्हापूर : महामार्गांवरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्याच्या उद्देशाने येत्या १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. तीन हजार रुपये किमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा २०० फेऱ्यांसाठी लागू असेल. मात्र, हा निर्णय कोल्हापूरकारंना (एमच-०९) चांगलाच फायद्याचा ठरण्याची चिन्हे आहेत. कारण येथील अनेक जणांना सतत आपल्या गाड्यातून राज्यात तसेच देशभर पर्यटनाची क्रेझ आहे. तसेच येथे उद्योजक, तसेच व्यावसायिकांचाही मोठा वर्ग असल्यांने त्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. मात्र जी खासगी वाहने केवळ सुट्टी आणि सणाच्या कालावधीत परजिल्हा, परराज्यांत जातात. त्यांना मात्र या सवलत योजनेचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे.राष्ट्रीय महामार्गावर व्यक्तिगत वापराच्या वाहनांना हा पास वापरता येणार असल्याचे धोरण आहे. साातत्यांने बाहेर पर्यटनासाठी वा इतर कारणासाठी फिरणाऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे.मात्र, खासगी वाहने दिवाळी, मे महिन्याची सुटी, नाताळ, गणपती या कालावधीतच परजिल्हा, परराज्य आणि देशात काही धार्मिक आणि पर्यटनासाठी बाहेर पडतात. हा पास काढल्यास वर्षभरात २०० वेळा प्रवास करणे शक्य होणार नसल्याचे खासगी वाहनमालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पास काढण्यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेत स्थळांवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

२०० वेळा वर्षभरात प्रवास करणे ज्या कुटुंबान बाहेर प्रवास करणे शक्य नाही त्या खासगी वाहनचालकांना मात्र ही योजना जादा फायद्याची ठरणार नाही.

खासगी वाहनांसह ओला, उबेरसह काळी पिवळी टॅक्सीचा या योजनेत समावेश करावा. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा महत्त्वाचा घटक आहे. रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या टॅक्सी आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होऊ शकेल. - सुभाष जाधव, अध्यक्ष जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन

आम्ही फक्त गणपती सण आणि सुटीसाठी कालावधीसाठी कोकणात जातो. त्यामुळे या निर्णयाचा लाभ होईल, असे वाटत नाही. गणपतीच्या काळात तर कोकणवासीयांना टोल माफी दिली जाते. तीन हजारांत वर्षभराच्या फास्टँगचा फायदा होणार नाही. - सूरज मयेकर, निवती, कोकण

पाल्यांना भेटी, दवाखाना, शिक्षणासाठी पुणे आणि मुंबईपर्यंत प्रवास होतो. मात्र, हा महिन्यातून पाच वेळा जरी हा प्रवास झाला तरी वर्षातून ६० वेळा प्रवास होतो. सातत्याने प्रवास झाल्यास हा पास काही जणांना उपयोगी पडू शकेल. - राजन चव्हाण, इचलकरंजी

ट्रान्स्पोर्टच्या वाहनांचा देशभर प्रवास सुरू असतो. त्यात काही वाहनचालक रोज राष्ट्रीय महामार्गावर असतात. सेव्हन सीटर क्षमता असलेल्या ट्रान्स्पोर्टच्या वाहनांना हा पास देणे गरजेचे आहे. कारण सर्वांधिक वाहतूक पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेट असलेली वाहने करतात. त्यांचाही नव्या धोरणात विचार करावा. - गणेश पाटील, वाहतूक व्यावसायिक