शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

अंबाबाई मंदिर पगारी पुजारी कायद्याच गुंडाळला बासनात, पाच वर्षे लोटली तरी अंमलबजावणी शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:06 IST

या कायद्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनीच पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यांनी अजून या विषयात लक्ष घातलेले नाही

इंदुमती गणेशकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी कायदा राज्य शासनाने शब्दश: बासनात गुंडाळला आहे. कायदा होऊन पाच वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा भाजप-शिवसेनेच्या काळात आणि आता महाविकास आघाडीच्या काळातदेखील नाही. कायदा झाल्यावर पेढे वाटले आणि आपली जबाबदारी संपली असे स्वत: ठरवून या लढ्यातील नेत्यांनी आणि कृती समितीने तलवारीच म्यान केल्या आहेत.श्री अंबाबाईच्या मूर्तीला जून २०१७ मध्ये घागरा चोली परिधान केल्यानंतर कोल्हापुरात पुजाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले. अंबाबाईच्या पुजेसाठी मुनिश्वर या एकाच घराण्याचे सगळे पारंपरिक पुजारी का? असा सवाल करत कोल्हापूरकरांनी रान उठवले, कृती समित्या झाल्या, सगळे राजकीय-सामाजिक नेते एकवटून यासाठी लढले. परिणामी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायदा संमत करून घेतला. त्यावेळी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आता मात्र सगळे शांत आहेत.

आंदोलनकर्त्यांना शोधण्याची वेळकायदा झाला म्हणजे आपला लढा आणि जबाबदारी संपली असे ठरवून राजकीय नेते, कृती समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या अंमलबजावणीसाठी एकदाही आंदोलन केले. पेढे वाटल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केला नाही. जे करत होते त्यापैकी शरद तांबट यांचे निधन झाले. आता ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई हे सातत्याने यावर आवाज उठवत आहे. बाकी सगळ्यांना शोधण्याची वेळ आली आहे.

कोरोनापासून फाईल बंद

काेरोना संसर्ग सुरू व्हायच्या आधी कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी काय नियम,अटी असाव्यात, कोणकोणत्या बाबी कशा अंमलात आणायच्या यावर चर्चा होत होत्या. पण कोरोना सुरू झाल्यानंतर तर चर्चादेखील बंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये अनेक घडामोडी होत आहेत. पण पगारी पुजारी कायद्यावर बोलायला कोणी तयार नाही.

पालकमंत्री कधी लक्ष घालणार?या कायद्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनीच पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यांनी अजून या विषयात लक्ष घातलेले नाही. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. देवस्थानचे कामकाज प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी पाहत आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणे अधिक सोपे होणार आहे. पण त्यासाठी पालकमंत्र्यांनी मनावर घेतले पाहिजे.

उत्पन्न दुपटीने वाढणार..

अन्य देवस्थानांमध्ये शासनाच्या विरोधात लढे उभारले गेले. कोल्हापूर हे एकमेव शहर असेल तर जिथे शहरवासीयांनी शासनाने मंदिर ताब्यात घ्यावे म्हणून आंदोलन केले, याची तरी दखल घेऊन तातडीने निर्णयाची अंमलबजावणी केली जाणे गरजेचे होते. भाविक सर्वाधिक देणगी गाभाऱ्यात देतात, कायद्याची अंमलबजावणी झाली तर शासनाचे उत्पन्न दुपटीने वाढेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंबाबाई मंदिर खऱ्या अर्थाने देवस्थान समितीकडे येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर