शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

अंबाबाई मंदिर पगारी पुजारी कायद्याच गुंडाळला बासनात, पाच वर्षे लोटली तरी अंमलबजावणी शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:06 IST

या कायद्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनीच पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यांनी अजून या विषयात लक्ष घातलेले नाही

इंदुमती गणेशकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी कायदा राज्य शासनाने शब्दश: बासनात गुंडाळला आहे. कायदा होऊन पाच वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा भाजप-शिवसेनेच्या काळात आणि आता महाविकास आघाडीच्या काळातदेखील नाही. कायदा झाल्यावर पेढे वाटले आणि आपली जबाबदारी संपली असे स्वत: ठरवून या लढ्यातील नेत्यांनी आणि कृती समितीने तलवारीच म्यान केल्या आहेत.श्री अंबाबाईच्या मूर्तीला जून २०१७ मध्ये घागरा चोली परिधान केल्यानंतर कोल्हापुरात पुजाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले. अंबाबाईच्या पुजेसाठी मुनिश्वर या एकाच घराण्याचे सगळे पारंपरिक पुजारी का? असा सवाल करत कोल्हापूरकरांनी रान उठवले, कृती समित्या झाल्या, सगळे राजकीय-सामाजिक नेते एकवटून यासाठी लढले. परिणामी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायदा संमत करून घेतला. त्यावेळी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आता मात्र सगळे शांत आहेत.

आंदोलनकर्त्यांना शोधण्याची वेळकायदा झाला म्हणजे आपला लढा आणि जबाबदारी संपली असे ठरवून राजकीय नेते, कृती समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या अंमलबजावणीसाठी एकदाही आंदोलन केले. पेढे वाटल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केला नाही. जे करत होते त्यापैकी शरद तांबट यांचे निधन झाले. आता ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई हे सातत्याने यावर आवाज उठवत आहे. बाकी सगळ्यांना शोधण्याची वेळ आली आहे.

कोरोनापासून फाईल बंद

काेरोना संसर्ग सुरू व्हायच्या आधी कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी काय नियम,अटी असाव्यात, कोणकोणत्या बाबी कशा अंमलात आणायच्या यावर चर्चा होत होत्या. पण कोरोना सुरू झाल्यानंतर तर चर्चादेखील बंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये अनेक घडामोडी होत आहेत. पण पगारी पुजारी कायद्यावर बोलायला कोणी तयार नाही.

पालकमंत्री कधी लक्ष घालणार?या कायद्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनीच पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यांनी अजून या विषयात लक्ष घातलेले नाही. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. देवस्थानचे कामकाज प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी पाहत आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणे अधिक सोपे होणार आहे. पण त्यासाठी पालकमंत्र्यांनी मनावर घेतले पाहिजे.

उत्पन्न दुपटीने वाढणार..

अन्य देवस्थानांमध्ये शासनाच्या विरोधात लढे उभारले गेले. कोल्हापूर हे एकमेव शहर असेल तर जिथे शहरवासीयांनी शासनाने मंदिर ताब्यात घ्यावे म्हणून आंदोलन केले, याची तरी दखल घेऊन तातडीने निर्णयाची अंमलबजावणी केली जाणे गरजेचे होते. भाविक सर्वाधिक देणगी गाभाऱ्यात देतात, कायद्याची अंमलबजावणी झाली तर शासनाचे उत्पन्न दुपटीने वाढेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंबाबाई मंदिर खऱ्या अर्थाने देवस्थान समितीकडे येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर