शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर पगारी पुजारी कायद्याच गुंडाळला बासनात, पाच वर्षे लोटली तरी अंमलबजावणी शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:06 IST

या कायद्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनीच पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यांनी अजून या विषयात लक्ष घातलेले नाही

इंदुमती गणेशकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी कायदा राज्य शासनाने शब्दश: बासनात गुंडाळला आहे. कायदा होऊन पाच वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा भाजप-शिवसेनेच्या काळात आणि आता महाविकास आघाडीच्या काळातदेखील नाही. कायदा झाल्यावर पेढे वाटले आणि आपली जबाबदारी संपली असे स्वत: ठरवून या लढ्यातील नेत्यांनी आणि कृती समितीने तलवारीच म्यान केल्या आहेत.श्री अंबाबाईच्या मूर्तीला जून २०१७ मध्ये घागरा चोली परिधान केल्यानंतर कोल्हापुरात पुजाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले. अंबाबाईच्या पुजेसाठी मुनिश्वर या एकाच घराण्याचे सगळे पारंपरिक पुजारी का? असा सवाल करत कोल्हापूरकरांनी रान उठवले, कृती समित्या झाल्या, सगळे राजकीय-सामाजिक नेते एकवटून यासाठी लढले. परिणामी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायदा संमत करून घेतला. त्यावेळी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आता मात्र सगळे शांत आहेत.

आंदोलनकर्त्यांना शोधण्याची वेळकायदा झाला म्हणजे आपला लढा आणि जबाबदारी संपली असे ठरवून राजकीय नेते, कृती समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या अंमलबजावणीसाठी एकदाही आंदोलन केले. पेढे वाटल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केला नाही. जे करत होते त्यापैकी शरद तांबट यांचे निधन झाले. आता ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई हे सातत्याने यावर आवाज उठवत आहे. बाकी सगळ्यांना शोधण्याची वेळ आली आहे.

कोरोनापासून फाईल बंद

काेरोना संसर्ग सुरू व्हायच्या आधी कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी काय नियम,अटी असाव्यात, कोणकोणत्या बाबी कशा अंमलात आणायच्या यावर चर्चा होत होत्या. पण कोरोना सुरू झाल्यानंतर तर चर्चादेखील बंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये अनेक घडामोडी होत आहेत. पण पगारी पुजारी कायद्यावर बोलायला कोणी तयार नाही.

पालकमंत्री कधी लक्ष घालणार?या कायद्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनीच पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यांनी अजून या विषयात लक्ष घातलेले नाही. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. देवस्थानचे कामकाज प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी पाहत आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणे अधिक सोपे होणार आहे. पण त्यासाठी पालकमंत्र्यांनी मनावर घेतले पाहिजे.

उत्पन्न दुपटीने वाढणार..

अन्य देवस्थानांमध्ये शासनाच्या विरोधात लढे उभारले गेले. कोल्हापूर हे एकमेव शहर असेल तर जिथे शहरवासीयांनी शासनाने मंदिर ताब्यात घ्यावे म्हणून आंदोलन केले, याची तरी दखल घेऊन तातडीने निर्णयाची अंमलबजावणी केली जाणे गरजेचे होते. भाविक सर्वाधिक देणगी गाभाऱ्यात देतात, कायद्याची अंमलबजावणी झाली तर शासनाचे उत्पन्न दुपटीने वाढेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंबाबाई मंदिर खऱ्या अर्थाने देवस्थान समितीकडे येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर