शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

भाजप शिवसेनेच्या युतीसमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:43 IST

पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र आलो की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो हेच यातून स्पष्ट होते असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देभाजप शिवसेनेच्या युतीसमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : चंद्रकांत पाटीलकोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया

कोल्हापूर : पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र आलो की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो हेच यातून स्पष्ट होते असेही ते म्हणाले.कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर प्रतिक्रिया विचारल्यानंतर पाटील यांनी या तीन निवडणुकांचा आढावा घेतला. ते म्हणाले, पालघरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर ती कुठच्या कुठे जाते. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत विरोधी लढूनही एकूण ७ जागांपैकी भाजप शिवसेनेने ५ जिंकल्या. कालच्या निवडणुकीतही विरूध्द लढूनही भाजप शिवसेनेने ४ पैकी ३ जिंकल्या. हे गणित पाहिल्यानंतर युतीसमोर कुणीही शिल्लक रहात नाही.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत ते म्हणाले, हा रस्ता केंद्राच्या अखत्यारित आहे. त्याचे काम सुरू आहे.मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा मुद्दा मांडल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना नोटीसा निघणार आहेत. त्यांच्याकडूनही ही दुरूस्ती केली जाईल. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २२ हजार किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग केले असून जिल्हा परिषदेचे ५0 हजारकिलोमीटरचे जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकामकडे देण्याचा विचार आहे.पीककर्ज वितरणाबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुदद्यावर अतिशय संवेदनशील असून त्यांनी तसे आदेश दिले आहेत. मात्र स्टेट बँकेने कणेरी मठावर अडीच हजार शेतकऱ्यांचा कर्ज घ्या म्हणून मेळावा घेतला हा माझा अनुभव आहे असे पाटील म्हणाले. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाCrop Loanपीक कर्जPoliticsराजकारणBJPभाजपा