शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भाजप शिवसेनेच्या युतीसमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:43 IST

पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र आलो की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो हेच यातून स्पष्ट होते असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देभाजप शिवसेनेच्या युतीसमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : चंद्रकांत पाटीलकोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया

कोल्हापूर : पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र आलो की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो हेच यातून स्पष्ट होते असेही ते म्हणाले.कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर प्रतिक्रिया विचारल्यानंतर पाटील यांनी या तीन निवडणुकांचा आढावा घेतला. ते म्हणाले, पालघरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर ती कुठच्या कुठे जाते. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत विरोधी लढूनही एकूण ७ जागांपैकी भाजप शिवसेनेने ५ जिंकल्या. कालच्या निवडणुकीतही विरूध्द लढूनही भाजप शिवसेनेने ४ पैकी ३ जिंकल्या. हे गणित पाहिल्यानंतर युतीसमोर कुणीही शिल्लक रहात नाही.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत ते म्हणाले, हा रस्ता केंद्राच्या अखत्यारित आहे. त्याचे काम सुरू आहे.मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा मुद्दा मांडल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना नोटीसा निघणार आहेत. त्यांच्याकडूनही ही दुरूस्ती केली जाईल. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २२ हजार किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग केले असून जिल्हा परिषदेचे ५0 हजारकिलोमीटरचे जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकामकडे देण्याचा विचार आहे.पीककर्ज वितरणाबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुदद्यावर अतिशय संवेदनशील असून त्यांनी तसे आदेश दिले आहेत. मात्र स्टेट बँकेने कणेरी मठावर अडीच हजार शेतकऱ्यांचा कर्ज घ्या म्हणून मेळावा घेतला हा माझा अनुभव आहे असे पाटील म्हणाले. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाCrop Loanपीक कर्जPoliticsराजकारणBJPभाजपा