शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुबदल-- बालस्वास्थ

By admin | Updated: February 15, 2017 00:39 IST

बारावीच्या अत्यंत स्पर्धात्मक बनलेल्या व करिअरची दिशा ठरविणाऱ्या परीक्षांबाबत हा वेळ फार महत्त्वाचा ठरू शकतो.

गुलाबी थंडीने यंदा अल्पकाळातच नियोजित वेळेपूर्वी काढता पाय घेतला आहे. माघ महिना संपण्यापूर्वीच आणि वसंत ऋतूच्या आगमनापूर्वीच फाल्गून महिन्यासारख्या उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. आरोग्यदायी हिवाळ्यानंतर उन्हाळ्याकडील संक्रमणकाळाच्या प्रवासाचा हा संधीकाळ नेहमीप्रमाणेच त्रासदायक ठरणार याची चिन्हे दिसत आहेत. सध्या रात्री आणि पहाटेच्या थोड्या थंडीनंतर दिवसभर कडक उन्हाच्या झळा जाणवत आहेत. या काळात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या ऋतुसंक्रमणाच्या काळात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत असते. सर्दी, पडसे, ताप, खोकला, अशा त्रासांनी ग्रस्त मुलांची संख्या वाढली आहे. सुदैवाने गोवरासारख्या आजारांची लस शासकीय व खासगी वैद्यकीय स्तरावर बहुतांशी मुलांना दिली जात असल्याने गोवराचे रुग्ण पूर्वीसारखे साथीच्या स्वरूपात आढळून येत नाहीत. तथापि, कांजिण्याची लस शासकीय स्तरावर उपलब्ध नाही व खासगी स्तरावर काहीशी महाग असल्याने फार कमी प्रमाणात घेतली जाते. त्यामुळे गेली काही वर्षे या काळात कांजिण्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. लहान मुलांमधील कांजिण्या फारशा त्रासदायक नसल्या, तरी क्वचितप्रसंगी या आजारामुळे लहान मेंदूला व मोठ्या मेंदूला जंतूसंसर्ग होणे अशा तत्कालीन गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. कांजिण्या झालेल्या काही मुलांना भविष्यात मोठेपणी नागीणसारखे आजार उद्भवू शकतात. गालगुंडाची लस अल्प किमतीला उपलब्ध असूनही अज्ञानापोटी ही लस घेतली जात नाही. त्यामुळे यंदा गालगुंडाचे बालरुग्णही आढळून येत आहेत. अ‍ॅलर्जीमुळे होणारी सर्दी व दमा असणाऱ्या मुलांनाही हा काळ त्रासाचा ठरतो. दुपारच्या उन्हाच्या तडाख्यामध्ये शीतपेये, आईस्क्रीम खाण्याचा मोह होतो. त्यामुळे कावीळ, टायफॉईड, गॅस्ट्रो यासारखे जलजन्य आजार उद्भवू शकतात. या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक यात्रांचे नियोजन असते. अशाप्रसंगी एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न तयार केले जाते. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असण्याची खात्री असत नाही. त्यामुळे उलटी, जुलाबाच्या उद्रेकाच्या घटना घडत असतात. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने तसेच ऋतुचक्रातील बदलांना जुळवून घेण्याची प्रक्रिया संथ असल्याने त्यांना याचा फटका जास्त बसण्याची शक्यता असते. मोठ्या मुलांना याचा त्रास वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा परीक्षांचा काळ असल्याने त्यांना आजारपणात आपला मौल्यवान वेळ गमवावा लागतो. दहावी, बारावीच्या अत्यंत स्पर्धात्मक बनलेल्या व करिअरची दिशा ठरविणाऱ्या परीक्षांबाबत हा वेळ फार महत्त्वाचा ठरू शकतो.याबाबत पालकांनी थोडीफार सतर्कता दाखविल्यास बऱ्याच गोष्टी टाळता येऊ शकतील. आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा ते टाळलेले बरे. त्यामुळे लसीकरणामुळे टाळता येणारे टायफॉईड, गोवर, कांजिण्या, कावीळ, गालगुंड, इन्फ्लुएंझा यासारखे आजार वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने टाळू शकतो. शिशिर ऋतूमध्ये वाढलेला कफ वसंतामधील उष्णतेने पातळ होऊन निघून जात असल्याने पचनक्रिया हलकी झालेली असते. त्यामुळे स्निग्ध, आंबट, तुरट असे कफ वाढविणारे पदार्थ टाळून पचण्यास हलके पदार्थ द्यावेत. पिण्याचे पाणी नेहमीच उकळून थंड करून घेण्याची काळजी घेतलेली बरी. किमान परीक्षा होईपर्यंत शीतपेये, आईस्क्रीम, बाहेरचे खाणे यांचा मोह टाळलेला बरा. त्यातून मुले आजारी पडलीच तर डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार केल्यास आजारपण रेंगाळण्याची भीती राहणार नाही. --- डॉ. मोहन पाटील