शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

दुबई, नेपाळची घडवली हवेतच सफर, टूर कंपनी लाखो रुपये घेऊन रफूचक्कर; कोल्हापुरातील शौर्य यात्रा कंपनीवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:49 IST

पर्यटकांना पश्चात्ताप

कोल्हापूर : शौर्य यात्रा कंपनीच्या माध्यमातून देश-विदेशात सहल घडविण्याचे आमिष दाखवून पर्यटकांची साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत यात्रा कंपनीचा प्रमुख मयुरेश नामदेव वाघ (वय २८, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महेश मनोहर पन्हाळकर (६१, रा. लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. २८) फिर्याद दिली.शौर्य यात्रा कंपनीचे कार्यालय लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर येथे आहे. या कंपनीकडून देश-विदेशात सहलींचे आयोजन केले जाते. कंपनीच्या जाहिराती पाहून महेश पन्हाळकर यांनी कुटुंबासह दुबई सहलीसाठी दोन लाख ३२ हजार रुपये कंपनीच्या कार्यालयात मयुरेश वाघ याच्याकडे भरले. तसेच त्यांचे मित्र नरेंद्र माधव कुलकर्णी यांनी दुबई, नेपाळ आणि चारधाम यात्रेसाठी १ लाख ५४ हजार रुपये भरले. सुरेश राजाराम देसाई यांनी नेपाळ सहलीसाठी ३८ हजार ५०० रुपये भरले. राजेंद्र रघुनाथ वेल्हाळ यांनी केरळ सहलीसाठी २३ हजार ४०० रुपये भरले, तर विश्वनाथ प्रल्हाद गुळवणी यांनी चारधाम यात्रेसाठी ३२ हजार रुपये भरले होते. मे २०२४ मध्ये पैसे घेऊन कंपनीने सहलीचे नियोजन केले नाही. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने पन्हाळकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

अनेकांना घातला गंडाशौर्य यात्रा कंपनीने राज्यातील शेकडो पर्यटकांना गंडा घातला आहे. तीन व्यक्तींचे पैसे भरल्यानंतर चौथ्या व्यक्तीला मोफत सहल घडविण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. याशिवाय वेळोवेळी सवलती जाहीर करून त्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. विविध शहरांमधील हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन त्यांनी पर्यटकांना गंडा घातला. यात शहरातील अनेकांचा समावेश आहे.

पर्यटकांना पश्चात्तापसहलीसाठी गेल्यानंतर यात्रा कंपनीकडून योग्य नियोजन केले जात नाही. राहण्याची आणि जेवणाची हेळसांड होते. प्रवासासाठी अस्वच्छ वाहनांचा वापर केला जातो. तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नाही, असे अनुभव पर्यटकांनी सांगितले. तक्रारींचा ओघ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यालयाला टाळेपोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड हे मंगळवारी तपासासाठी फोर्ड कॉर्नर येथील शौर्य यात्रा कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र, छोट्याशा गाळ्यातील कंपनीचे कार्यालय बंद होते. गेल्या महिनाभरापासून कार्यालय बंद असल्याची माहिती शेजारच्या गाळेधारकांकडून मिळाली.