शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवा भूमिअधिग्रहण कायद्याबद्दल शरद पवारांची भूमिका दुटप्पीपणाची, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:10 IST

जिल्ह्यातील तिन्ही मंत्री बिनकामाचे असून शेतकरी, सर्वसामान्य लोकांशी त्यांना काही देणे-घेणे उरलेले नाही

कागल : नवा भूमिअधिग्रहण कायदा हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. एनडीएबरोबर असतानाही आपण लोकसभेत या कायद्याला कडाडून विरोध केला होता. तेव्हा शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादीने आपणाला पाठिंबा दिला होता. आता हीच मंडळी या कायद्याचे समर्थन का करीत आहेत? जेष्ठ नेते शरद पवारांची भूमिकाही या कायद्याबद्दल दुटप्पीपणाची आहे. लवकरच त्यांना याबद्दल पत्र लिहिणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

जिल्ह्यातील तिन्ही मंत्री बिनकामाचे असून शेतकरी, सर्वसामान्य लोकांशी त्यांना काही देणे-घेणे उरलेले नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.

संघटनेच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अविनाश मगदुम, शिवाजी कळमकर, संतोष बाबर, तानाजी मगदुम, प्रभू भोजे, राजू बागल, नितेश कोगनोळे आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले की, रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. पशुखाद्य महागले आहे; पण उसाला व दुधाला भाव तोच आहे. मात्र वीज वितरण कंपनी वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडत आहे. यावर तिन्ही मंत्री बोलत नाहीत. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देतो म्हणत दोन अर्थसंकल्प गेले. आता या तिसऱ्या अर्थसंकल्पात तरी ही तरतूद करावी.

प्रतिटन दोनशे रुपये जादा दर द्यावा

राजू शेट्टी म्हणाले की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखर, इथेनाॅललाही चांगला दर येत आहे. निश्चित एफआरपी देऊनही साखर कारखान्यांच्याकडे चांगले पैसे शिल्लक राहणार आहेत. म्हणून एफआरपीपेक्षा प्रतिटन दोनशे रुपये जादा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यासाठीही आंदोलन छेडणार आहोत.

..म्हणून रस्त्यावर उतरावे लागत आहे

महाविकास आघाडीमध्ये आपण असताना विरोधी पक्षासारखे मोर्चे का काढीत आहात. या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, घटक पक्षांसोबत एकही बैठक झालेली नाही म्हणून मोर्चे काढून शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तब्येतीच्या कारणास्तव बैठक होऊ शकलेली नाही म्हणून पत्र लिहित आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSharad Pawarशरद पवार