शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नवा भूमिअधिग्रहण कायद्याबद्दल शरद पवारांची भूमिका दुटप्पीपणाची, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:10 IST

जिल्ह्यातील तिन्ही मंत्री बिनकामाचे असून शेतकरी, सर्वसामान्य लोकांशी त्यांना काही देणे-घेणे उरलेले नाही

कागल : नवा भूमिअधिग्रहण कायदा हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. एनडीएबरोबर असतानाही आपण लोकसभेत या कायद्याला कडाडून विरोध केला होता. तेव्हा शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादीने आपणाला पाठिंबा दिला होता. आता हीच मंडळी या कायद्याचे समर्थन का करीत आहेत? जेष्ठ नेते शरद पवारांची भूमिकाही या कायद्याबद्दल दुटप्पीपणाची आहे. लवकरच त्यांना याबद्दल पत्र लिहिणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

जिल्ह्यातील तिन्ही मंत्री बिनकामाचे असून शेतकरी, सर्वसामान्य लोकांशी त्यांना काही देणे-घेणे उरलेले नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.

संघटनेच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अविनाश मगदुम, शिवाजी कळमकर, संतोष बाबर, तानाजी मगदुम, प्रभू भोजे, राजू बागल, नितेश कोगनोळे आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले की, रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. पशुखाद्य महागले आहे; पण उसाला व दुधाला भाव तोच आहे. मात्र वीज वितरण कंपनी वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडत आहे. यावर तिन्ही मंत्री बोलत नाहीत. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देतो म्हणत दोन अर्थसंकल्प गेले. आता या तिसऱ्या अर्थसंकल्पात तरी ही तरतूद करावी.

प्रतिटन दोनशे रुपये जादा दर द्यावा

राजू शेट्टी म्हणाले की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखर, इथेनाॅललाही चांगला दर येत आहे. निश्चित एफआरपी देऊनही साखर कारखान्यांच्याकडे चांगले पैसे शिल्लक राहणार आहेत. म्हणून एफआरपीपेक्षा प्रतिटन दोनशे रुपये जादा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यासाठीही आंदोलन छेडणार आहोत.

..म्हणून रस्त्यावर उतरावे लागत आहे

महाविकास आघाडीमध्ये आपण असताना विरोधी पक्षासारखे मोर्चे का काढीत आहात. या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, घटक पक्षांसोबत एकही बैठक झालेली नाही म्हणून मोर्चे काढून शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तब्येतीच्या कारणास्तव बैठक होऊ शकलेली नाही म्हणून पत्र लिहित आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSharad Pawarशरद पवार