शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही - : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:46 IST

चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

ठळक मुद्देएका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात असू द्या, असा दमच त्यांनी दिला.

कोल्हापूर : ‘शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही. डोक्यात खूप काही चालू असतं. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पेटाळा आणि शाहू स्मारक भवन येथे आयोजित मेळाव्यांमध्ये ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी पवारांवर सडकून टीका करीत बंडखोरांनाही इशारा दिला.

पाटील म्हणाले, पवार यांना वाटले की, मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवता येईल; पण तसे होणार नाही. मी परवा येऊन प्रकाश आबिटकर यांचा अर्ज दाखल करून गेलो. आत्ता आलोय. अमित शहा यांच्याबरोबर रविवारी येणार आहे. नंतर सांगली, सातारा जिल्ह्यांतील सभा आहेत. त्यामुळे मी कोथरूडमध्ये अडकलो नाही. मी उच्चांकी मतांनी निवडून येणार आहे. मी निवडणूक युद्ध म्हणूनच लढतो. त्यामुळे कोथरूडमध्ये शेवटचे मत पडेपर्यंत मी थांबणार आहे.

पक्षाचे आणि युतीचे कार्य यांकडे मी धर्मकार्य म्हणून पाहतो. मला अहंकार नाही. मी संदीप देसार्इंच्या घरीही जाईन; परंतु त्यांनी जे चालले आहे ते थांबवावे. लोकसभेला माझ्याविरोधात कंड्या पिकविल्या गेल्या; परंतु प्रामणिकपणाने काम केले म्हणूनच संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य मिळाले. आताही राजेश क्षीरसागर यांना विजयी करून हॅट्ट्रिक करूया.

राजेश क्षीरसागर म्हणाले, प्रचंड विकासकामे केली, रस्त्यावरील चळवळी केल्या, सामाजिक कामे उभारली, विधानसभेत प्रश्न मांडले. ज्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीने कोल्हापूरच्या मानगुटीवर टोलचे भूत आणून बसवले होते, तो टोल रद्द करण्यासाठी आक्रमक आंदोलन केले. ३० वर्षे असलेल्या युतीची जाणीव ठेवत भाजपचे कार्यकर्ते माझ्यासाठी राबतील असा विश्वास आहे.

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे भाग्य आम्हांला चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मिळाले. त्यांचा आदेश मानून आम्ही काम करणार आहोत. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांनी विरोधी उमेदवाराला संबोधलेले ‘घोसाळकर रिटर्न’ हे शब्द जनताच खरे करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, उदय पवार,नंदकुमार मोरे, बाबा पार्टे, नगरसेवक राहुल चव्हाण, आर. डी. पाटील, अशोक जाधव, रवी चौगुले, दीपक गौड, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.जखम बरी झाली नाही तर हात काढावा लागतोपाटील म्हणाले, हाताला जखम झाली तर सुरुवातीला मलम, गोळ्या दिल्या जातात; परंतु अशी वेळ येते की हात काढावाच लागतो. त्यामुळे सुरुवातीला विरोधी काम करणाऱ्यांना समजून सांगू. तरीही आडमुठेपणा सुरूच ठेवला तर मात्र कारवाई अटळ आहे.हिंदुत्ववादी मतदारसंघ कॉँग्रेसच्या ताब्यात देऊ नकापाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तर हा हिंदुत्ववादी विचारांचा मतदारसंघ आहे. तो कॉँग्रेसच्या हातात देऊ नका. ज्यांनी कॉँग्रेसची सभासदत्वाची पावतीही फाडली नाही, घरात दोन भाजपचे नगरसेवक आहेत, अशांनी संधी मिळतेय म्हणून कॉँग्रेसची उमेदवारी घेतली. परंतु ज्या कॉँग्रेसला स्वत:चा जिल्हाध्यक्ष टिकवता आला नाही, त्या मरणप्राय झालेल्या कॉँग्रेसमध्ये प्राणवायू फुंकु नका.संजय घाटगेंनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेटमेळाव्यानंतर शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कागलचे शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांनी भेट घेतली. या मतदारसंघात तुम्ही एक-दोन सभा घ्याव्यात, अशी विनंती घाटगे यांनी पाटील यांना केली. त्यावर पालकमंत्र्यांनी सभेसाठी तारीख देतो, असे सांगितले. सध्या कागल तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय घाटगे असताना त्या ठिकाणी भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे पाठबळ आपल्यासोबत आहे, याचा संदेश देण्यासाठी घाटगे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मंडलिकांनी सोयीचे राजकारण थांबवावेआम्ही साधे-भोळे आहोत, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, भलेभलेही आम्हाला घाबरतात. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी युतीधर्म पाळावा आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांचा प्रचार करावा, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. मंडलिकांनी सोयीचे राजकारण संपवावे. कारण शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात आठ जागा जिंकायच्या आहेत, याची आठवणही पाटील यांनी करून दिली. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात असू द्या, असा दमच त्यांनी दिला.

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक