शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

ठेकेदार, दलालांसाठी 'शक्तिपीठ'चा डाव; विनायक राऊत यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:10 IST

दिल्लीपुढे मुजरे करणारे हुजरे तयार झालेत

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग भाजपचे ठेकेदार, दलालांसाठी करून शेतकऱ्यांच्या घरावर वरवंटा फिरवला जाणार आहे. मात्र, जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग पंचगंगा नदीत विसर्जित होत नाही, तोपर्यंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये, असे आवाहन उद्धवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी रविवारी केले. यावेळी जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर मशाल उजळवावा, असेही त्यांनी सांगितले.उद्धवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. आमदार सुनील प्रभू, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर या आश्वासनाचा विसर महायुतीच्या सरकारला पडला आहे. लाडक्या बहिणींना अजून दरमहा २१०० दिले नाहीत. पण, ठेकेदारांच्या भल्यासाठी शक्तीपीठ केले जाणार आहे. याचा एक किलोमीटरचा खर्च १०० कोटी रुपये आहे. इतका खर्च करणार म्हणजे सोन्यानी रस्ता करणार आहेत का ?आमदार सुनील प्रभू म्हणाले, मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद झाले आहे. सरकार ही योजनाच गुंडाळणार आहे.प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, महाराष्ट्र कमजोर केला जात आहे. स्वत:च्या मराठी भाषेसाठी महाराष्ट्राला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. म्हणून, येत्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकववा.संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांची भाषणे झाली. मेळाव्यास माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर, विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, प्रकाश शिरोळकर आदी उपस्थित होते.संजय पवार यांची नाराजी कायमजिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यापासून संजय पवार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर न झाल्यानेच ते उपस्थित राहिले नाहीत, अशी मेळाव्याच्या ठिकाणी चर्चा होती. यामुळेच राऊत यांनी संजय पवार घरगुती कारणांमुळे गैरहजर राहिले, असा खुलासा केला.

पन्नास खोके..एकदम ओके..घोषणाशिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना गद्दार असे राऊत म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांनी पन्नास खोके, एकदम ओके, अशी घोषणाबाजी करून लक्ष वेधले.

शंभर कोटी कोणाच्या घशात ?आमदार सुनील प्रभू म्हणाले, शहरातील रस्त्यावर शंभर कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. मात्र सध्या शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. मग शंभर कोटी रुपये कोणाच्या घशात गेले ? शक्तिपीठ महामार्ग अदानीचे भले करण्यासाठी करून शेतकऱ्यांच्या घरावर वरवंटा फिरवला जाणार आहे.

दिल्लीपुढे मुजरे करणारे हुजरे तयार झालेतप्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, एकेकाळी दिल्लीच्या राजकारणावर महाराष्ट्राचा दबदबा होता. सध्या दिल्लीपुढे मुजरे करणारे हुजरे तयार झाले आहेत. ते राज्यातील उद्योग गुजरातला नेत आहेत. फोडा आणि तोडा ही नीती वापरली जात आहे.