शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी सातवेळा भारत भ्रमण

By admin | Updated: November 16, 2015 00:37 IST

भारताची ७वेळा सायकल सफर करुन प्रबोधन करण्याचा उपक्रम ओरिसा राज्यातील बह्मपूर येथील सीबाप्रसाद दास हा यंग सिनीअर्स करत आहे.

पाली : भारतातील सर्व राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, वनसंपदा वाढून पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेसाठी जनजागृती, एडस्वर प्रबोधन कार्यक्रम या चतुसूत्री सामाजिक उपक्रमासाठी संपूर्ण भारताची ७वेळा सायकल सफर करुन प्रबोधन करण्याचा उपक्रम ओरिसा राज्यातील बह्मपूर येथील सीबाप्रसाद दास हा यंग सिनीअर्स करत आहे.आज सिबाप्रसाद दास हा सायकलने भ्रमंती करत गोवा येथे जात असताना पाली येथे थांबून त्याने सामाजिक संदेश, मार्गदर्शन व प्रबोधन केले. यावेळी त्याचे स्वागत उपसरपंच मंगेश पांचाळ, बीट शिक्षणाधिकारी भाग्यश्री हिरवे, नामदेव हितवर्धक संघाचे अध्यक्ष योगेश हिरवे, डॉ. उमेश पेठकर, अ‍ॅड. सागर पाखरे यांनी करुन निवास व्यवस्थाही केली.यावेळी दास याने सांगितले की, मी आतापर्यंत ७वेळा भारतातील सर्व राज्यांचा सायकलने सामाजिक प्रबोधनासाठी प्रवास केला असून, राज्यांमध्ये त्या ठिकाणच्या रोटरी, लायन्स क्लब, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, मार्गदर्शन याविषयीचे कार्यक्रम नि:शुल्क करत आहे. या चालू ८व्या देशव्यापी दौऱ्याची सुरुवात १५ आॅगस्ट २०१४ रोजी ओरिसामधून केली असून, तो १५ आॅगस्ट २०१६ रोजी ओरिसामध्येच समाप्त होणार आहे.तसेच सध्या भारतामध्ये सीमावर्ती राज्यांमध्ये नक्षलवादाचे प्रमाण वाढत असून, ते रोखण्यासाठी शांतता प्रस्थापित होण्यासाठी शांतीचा संदेश देणे आवश्यक आहे. तसेच सध्या भारतातील सर्वच राज्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हासही चिंताजनक पातळीवर जाऊन पोहोचल्याने वनसंपदा संवर्धन व वृक्षलागवडसाठीही प्रबोधन करत आहे. तसेच देशामध्ये एचआयव्ही विषाणुंमुळे एडस्चे प्रमाणही वाढत आहे. त्याकरिता एडस्बाबत जनजागृती करत आहे, असे ते म्हणाले.आपण स्वत: अविवाहित असून, सर्व आयुष्य हे समाज सेवेसाठीच व्यतित केले असून, ती करतच रहाणार आहे. तसेच प्रदूषण मुक्तीसाठी सायकलनेच न थकता सर्व प्रवास करत असतो. सायकलवरील बॅगेतच सर्व साहित्य, पंक्चर काढण्यासाठी एअर पंप व बॅटरी हे सर्व बरोबर घेऊनच हे कार्य सुरु ठेवले आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, लातूर, नगर, धुळे, कराड, चंद्रपूर, नागपूर येथेही कार्यक्रम केले आहेत. (वार्ताहर)सिबाप्रसाद दास यांना या अनोख्या सामाजिक उपक्रमासाठी भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही शुभसंदेश दिला असून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव ेदेशमुख व गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे ही त्यांच्या कार्यक्रमासाठी स्वत: आवर्जून उपस्थित राहत असत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठीही सहाय्य करत असत. चिपळूणच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनीही त्याचे स्वागत केले तसेच कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथेही त्यांचा मोठा कार्यक्रम पुढील दौऱ्यात आहे.